01-07-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुमच्या बुद्धीमध्ये आता सर्व ज्ञानाचे सार आहे, त्यामुळे तुम्हाला चित्रांची देखील आवश्यकता नाही, तुम्ही बाबांची आठवण करा आणि दुसऱ्यांनाही आठवण करून द्या”

प्रश्न:-
शेवटच्या काळामध्ये तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये कोणते ज्ञान असेल?

उत्तर:-
त्यावेळी बुद्धीमध्ये हेच असेल की, आता आपण परत घरी जात आहोत. तिथून मग चक्रामध्ये येणार. हळू-हळू शिडी उतरणार आणि नंतर मग बाबा येतील चढत्या कलेमध्ये घेऊन जाण्यासाठी. आता तुम्ही जाणता आधी आपण सूर्यवंशी होतो नंतर चंद्रवंशी बनलो… यामध्ये चित्रांची गरज नाही.

ओम शांती।
मुलांनो आत्म-अभिमानी होऊन बसला आहात? ८४ चे चक्र बुद्धीमध्ये आहे अर्थात आपल्या व्हरायटी जन्मांचे ज्ञान आहे. विराट रूपाचे देखील चित्र आहे ना. याचे देखील ज्ञान बुद्धीमध्ये आहे की, कसे आपण ८४ जन्म घेतो. मूलवतनमधून सर्वात आधी आपण देवी-देवता धर्मामध्ये येतो. हे ज्ञान बुद्धीमध्ये आहे, यामध्ये चित्रांची काही आवश्यकता नाही. आपल्याला काही कोणत्या चित्र इत्यादीची आठवण करायची नाहीये. अंताला फक्त याचीच आठवण राहील की आपण आत्मा आहोत, मूलवतनचे राहणारे आहोत, इथे आपला पार्ट आहे, हे विसरता कामा नये. या सर्व मनुष्य सृष्टीचक्राच्याच गोष्टी आहेत आणि खूप सोप्या आहेत. यामध्ये चित्रांची अजिबात गरज नाही कारण ही चित्रे इत्यादी सर्व आहेत भक्तीमार्गाच्या गोष्टी. ज्ञानमार्गामध्ये तर आहे अभ्यास. अभ्यासामध्ये चित्रांची आवश्यकता नाही. या चित्रांना फक्त दुरुस्त केले गेले आहे. जसे ते म्हणतात - गीतेचा भगवान श्रीकृष्ण आहे, आपण म्हणतो - शिव आहेत. ही देखील बुद्धीने समजून घेण्याची गोष्ट आहे. बुद्धीमध्ये हे नॉलेज असते, आपण ८४ चे चक्र पूर्ण केले आहे. आता आपल्याला पवित्र बनायचे आहे. पवित्र बनून परत नव्याने चक्र फिरणार. हे आहे सार जे लक्षात ठेवायचे आहे. जसे दुनियेचा इतिहास-भूगोल किंवा ८४ जन्मांचे चक्र कसे फिरते हे बाबांच्या बुद्धीमध्ये आहे, तसे तुमच्या बुद्धीमध्ये आहे की, आधी आपण सूर्यवंशी मग चंद्रवंशी बनतो. चित्रांची गरजच नाहीये. फक्त लोकांना समजावून सांगण्यासाठी ही बनवली आहेत. ज्ञानमार्गामध्ये तर बाबा फक्त एवढेच म्हणतात - ‘मनमनाभव’. जसे हे चतुर्भुजचे चित्र आहे, रावणाचे चित्र आहे, ही सर्व समजावून सांगण्यासाठी दाखवावी लागतात. तुमच्या बुद्धीमध्ये तर यथार्थ ज्ञान आहे. तुम्ही चित्रा शिवाय सुद्धा समजावून सांगू शकता. तुमच्या बुद्धीमध्ये ८४ चे चक्र आहे. चित्रांद्वारे फक्त सोपे करून सांगितले जाते, याची आवश्यकता नाही. बुद्धीमध्ये आहे आधी आपण सूर्यवंशी घराण्याचे होतो मग चंद्रवंशी घराण्याचे बनलो. तिथे खूप सुख आहे, ज्याला स्वर्ग म्हटले जाते, हे चित्रांवरून समजावून सांगतो. शेवटच्या काळामध्ये बुद्धीमध्ये हे ज्ञान राहील. आता आपण जात आहोत, मग पुन्हा चक्र फिरणार. शिडीच्या चित्रावर समजावून सांगितले गेले तर लोकांना सोपे होईल. तुमच्या बुद्धीमध्ये हे देखील सारे ज्ञान आहे की कसे आपण शिडी उतरतो. मग बाबा चढत्या कलेमध्ये घेऊन जातात. बाबा म्हणतात - मी तुम्हाला चित्रांचे सार समजावून सांगतो. जसे हे गोळ्याचे चित्र आहे तर त्यावर समजावून सांगू शकता - हे ५००० वर्षांचे चक्र आहे. जर लाखो वर्षांचे चक्र असते तर संख्या किती वाढली असती. ख्रिश्चन लोकांचा कालावधी दोन हजार वर्षे दाखवतात. त्यांच्या धर्मामध्ये किती मनुष्य असतात. ५००० वर्षांमध्ये किती मनुष्य असतात. हा सारा हिशोब तुम्ही सांगता. सतयुगामध्ये पवित्र असल्या कारणाने फार थोडे मनुष्य असतात. आता तर किती असंख्य आहेत. लाखो वर्षांचा कालावधी असता तर संख्या देखील अगणित होईल. ख्रिश्चनांच्या तुलनेमध्ये लोकसंख्येचा हिशोब तर काढतात ना. हिंदूंची लोकसंख्या कमी दाखवतात. ख्रिश्चन पुष्कळ झाले आहेत. जी चांगली हुशार मुले आहेत ती चित्रांशिवाय देखील समजावून सांगू शकतात. विचार करा यावेळी किती असंख्य मनुष्य आहेत. नवीन दुनियेमध्ये किती थोडे मनुष्य असतील. आता तर जुनी दुनिया आहे, ज्यामध्ये इतके सारे मनुष्य आहेत. मग नवीन दुनिया कशी स्थापन होते. कोण स्थापन करतात, हे बाबाच समजावून सांगतात. तेच ज्ञानाचा सागर आहेत. तुम्हा मुलांना फक्त हे ८४ चे चक्रच बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. आता आपण नरकामधून स्वर्गामध्ये जात आहोत, तर आतून आनंद होणार ना. सतयुगामध्ये दुःखाची कोणती गोष्ट असत नाही. अशी कोणतीही अप्राप्त वस्तू नाही ज्याच्या प्राप्तीसाठी पुरुषार्थ करावा लागेल. इथे पुरुषार्थ करावा लागतो. ही मशीन पाहिजे, हे पाहिजे… तिथे तर सर्व सुख उपलब्ध आहे. जसे कोणता महाराजा असतो ना तर त्याच्याकडे सर्व सुखे उपलब्ध असतात. गरिबांकडे काही सर्व सुखे उपलब्ध नसतात. परंतु हे तर आहे कलियुग, तर रोगराई इत्यादी सर्वकाही आहे. आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी. स्वर्ग-नरक इथेच असतो.

या सूक्ष्मवतनची जी गंमत-जंमत आहे, ती देखील वेळ घालवण्यासाठी आहे. जोपर्यंत कर्मातीत अवस्था होत नाही तोपर्यंत वेळ घालवण्यासाठी हे खेळणे-बागडणे आहे. कर्मातीत अवस्था झाली की, बस्स. तुम्हाला हेच लक्षात राहील की, मज आत्म्याने आता ८४ जन्म पूर्ण केले आहेत, आता मी घरी जातो. मग येऊन सतोप्रधान दुनियेमध्ये सतोप्रधान पार्ट बजावणार. हे ज्ञान बुद्धीमध्ये पक्के झालेले आहे, यामध्ये चित्रे इत्यादींची गरजच नाही. जसे बॅरिस्टर किती शिकतात, बॅरिस्टर झाले की बस्स, जो अभ्यास शिकले तो संपला. रिझल्ट निघतो प्रारब्धाचा. तुम्ही देखील शिकून मग जाऊन राज्य कराल. तिथे नॉलेजची आवश्यकता नाही. या चित्रांमध्ये देखील योग्य-अयोग्य काय आहे, ते आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे. बाबा बसून समजावून सांगतात, लक्ष्मी-नारायण कोण आहेत? हा विष्णू कोण आहे? विष्णूच्या चित्रामध्ये मनुष्य गोंधळून जातात. समजून न घेता केलेली पूजा देखील जशी की फालतू ठरते, समजत काहीच नाहीत. जसे विष्णूविषयी कळत नाही, तसे लक्ष्मी-नारायणा विषयी देखील कळत नाहीत. ब्रह्मा-विष्णू-शंकरा विषयी देखील समजत नाहीत. ब्रह्मा तर इथे आहे, हे पवित्र बनून शरीर सोडून निघून जाणार. या जुन्या दुनियेचे वैराग्य आहे. इथले कर्मबंधन दुःख देणारे आहे. आता बाबा म्हणतात - आपल्या घरी चला. तिथे दुःखाचे नामोनिशाणही नसेल. आधी तुम्ही आपल्या घरामध्ये होता नंतर मग राजधानीमध्ये आलात, आता बाबा पुन्हा आले आहेत पावन बनविण्यासाठी. यावेळी लोकांचे खाणे-पिणे इत्यादी किती घाणेरडे आहे. काय-काय पदार्थ खात राहतात. तिथे देवता अशा घाणेरड्या गोष्टी थोडेच खातात. भक्तीमार्गामध्ये बघा कसे आहे, मानवाचा देखील बळी चढतो. बाबा म्हणतात -हा देखील ड्रामा पूर्वनियोजित आहे. जुन्या दुनियेपासून परत नवीन जरूर बनणार आहे. आता तुम्ही जाणता - आपण सतोप्रधान बनत आहोत. हे तर बुद्धीला समजते ना, यामध्ये चित्र नसतील तर अजूनच चांगले. नाहीतर लोकं खूपच प्रश्न विचारतात. बाबांनी ८४ जन्मांचे चक्र समजावून सांगितले आहे. आपण असे सूर्यवंशी, चंद्रवंशी, वैश्य वंशी बनतो, इतके जन्म घेतो. हे लक्षात ठेवायचे आहे. तुम्ही मुले सूक्ष्मवतनचे रहस्य देखील समजता, ध्यानामध्ये सूक्ष्मवतनमध्ये जाता, परंतु यामध्ये ना योग आहे, ना ज्ञान आहे. हा तर फक्त एक रिवाज आहे. समजावून सांगितले जाते, कसे आत्म्याला बोलावले जाते आणि जेव्हा येते तेव्हा रडतात, पश्चाताप होतो, आम्ही बाबांचे म्हणणे ऐकले नाही. हे सर्व आहे मुलांना समजावून सांगण्यासाठी जेणेकरून पुरुषार्थ करायला लागावेत, कोणतीही चूक करू नये. मुलांनो, कायम हेच अटेंशन ठेवावे की आपल्याला आपला वेळ सफल करायचा आहे, वेस्ट करायचा नाहीये म्हणजे मग माया चुका करायला लावू शकत नाही. बाबा देखील समजावून सांगत राहतात - मुलांनो, वेळ वाया घालवू नका. खूप जणांना रस्ता सांगण्याचा पुरुषार्थ करा. महादानी बना. बाबांची आठवण कराल तर विकर्म विनाश होतील. जे पण येतात त्यांना हे समजावून सांगा आणि ८४ चे चक्र सांगा. वर्ल्डचा इतिहास-भूगोल कसा रिपीट होतो, नटशेलमध्ये (शॉर्टमध्ये) सर्व चक्र बुद्धीमध्ये राहिले पाहिजे.

तुम्हा मुलांना आनंद झाला पाहिजे की आपण या घाणेरड्या दुनियेपासून सुटतो. मनुष्य तर समजतात स्वर्ग-नरक इथेच आहे. जे खूप धनवान आहेत ते समजतात की आपण तर स्वर्गामध्येच आहोत. चांगली कर्म केली आहेत म्हणून सुख मिळाले आहे. आता तुम्ही खूप चांगली कर्म करता ज्यामुळे २१ जन्मांसाठी तुम्ही सुख प्राप्त करता. ते (या दुनियेतील लोक) तर एका जन्मासाठी असे समजतात की आपण स्वर्गामध्ये आहोत. बाबा म्हणतात - ते आहे अल्पकाळाचे सुख, तुमचे आहे २१ जन्मांसाठी. यासाठी बाबा म्हणतात सर्वांना रस्ता सांगत जा. बाबांच्या आठवणीनेच निरोगी बनाल आणि स्वर्गाचे मालक बनाल. स्वर्गामध्ये आहे राजाई. त्याची देखील आठवण करा. राजाई होती, आता नाहीये. भारताचीच गोष्ट आहे. बाकी सर्व तर आहेत बाई-प्लॉट्स (उपकथा). शेवटाला सर्वजण निघून जातील आणि आपण येणार नवीन दुनियेमध्ये. आता हे समजावून सांगण्यासाठी चित्रांची आवश्यकता थोडीच आहे. हे फक्त समजावून सांगण्यासाठी मूलवतन, सूक्ष्मवतन दाखवतात. समजावून सांगितले जाते बाकी ही तर भक्तीमार्ग वाल्यांनी चित्रे इत्यादी बनवली आहेत. तर आपल्याला देखील मग दुरुस्त करून बनवावी लागतात. नाहीतर म्हणतील की तुम्ही तर नास्तिक आहात म्हणून दुरुस्त करून बनवली आहेत. ब्रह्मा द्वारे स्थापना, शंकरा द्वारे विनाश… वास्तविक हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. कोणी काही करू शकतात थोडेच. वैज्ञानिक देखील आपल्या बुद्धीने या सर्व गोष्टी बनवतात. भले कितीही कोणी सांगितले की, बॉम्ब्स बनवू नका; परंतु ज्यांच्याकडे असे पुष्कळ बॉम्ब्स आहेत ते समुद्रामध्ये फेकून द्यावेत म्हणजे मग दुसरे कोणीही बनवणार नाही. त्यांनी बनवून ठेवले आहेत तर जरूर बाकीचे देखील बनवतील. आता तुम्ही मुले जाणता सृष्टीचा विनाश तर जरूर होणारच आहे. युद्ध देखील जरूर सुरु होणार आहे. विनाश होतो, आणि मग तुम्ही आपले राज्य घेता. आता बाबा म्हणतात - मुलांनो, सर्वांचे कल्याणकारी बना.

मुलांना आपले श्रेष्ठ भाग्य बनविण्यासाठी बाबा श्रीमत देतात - ‘गोड मुलांनो, सर्वकाही धनीच्या (शिवबाबांच्या) नावावर करून सफल करा’. ‘किनकी दबी रहेगी धूल में, किनकी राजा खाए…’ धनी (बाबा) स्वतः म्हणतात - मुलांनो, यासाठी खर्च करावा, हे रूहानी हॉस्पिटल, युनिव्हर्सिटी उघडा म्हणजे मग अनेकांचे कल्याण होईल. धन्याच्या (शिवबाबांच्या) नावाने तुम्ही खर्च करता ज्याचे मग २१ जन्मांसाठी तुम्हाला रिटर्नमध्ये मिळते. ही दुनियाच नष्ट होणार आहे म्हणून धनीच्या नावाने की जितके शक्य असेल सफल करा. धनी शिवबाबा आहेत ना. भक्तीमार्गामध्ये देखील धनीच्या नावाने करत होता. आता तर आहे डायरेक्ट. धनीच्या नावाने मोठ-मोठ्या युनिव्हर्सिटी उघडत जा म्हणजे अनेकांचे कल्याण होईल. २१ जन्मांसाठी राज्य-भाग्याचे चक्र घ्याल. नाहीतर ही धन-दौलत इत्यादी सर्व नष्ट होणार आहे. भक्तीमार्गामध्ये नष्ट होत नाही. आता तर नष्ट होणार आहे. तुम्ही खर्च करा, मग तुम्हालाच रिटर्न मिळेल. धनीच्या नावावर सर्वांचे कल्याण कराल तर २१ जन्मांचा वारसा मिळेल. किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात; मग ज्यांच्या भाग्यामध्ये आहे ते खर्च करत राहतात. आपले घरदार सुद्धा सांभाळायचे आहे. यांचा (ब्रह्मा बाबांचा) पार्टच असा होता. एकदम जोराने नशा चढला. बाबा बादशाही देत आहेत मग हे गाढवासारखे काम का करायचे. तुम्ही सर्व बादशाही घेण्यासाठी बसला आहात तर फॉलो करा ना. जाणता यांनी कसे सर्वकाही सोडून दिले. नशा चढला, ओहो! राजाई मिळत आहे, अल्फला अल्लाह मिळाला तर बे (भागीदार) ला सुद्धा राजाई दिली. राजाई होती, कमी नव्हते. चांगला भरभराटीचा धंदा होता. आता तुम्हाला ही राजाई मिळत आहे, तर अनेकांचे कल्याण करा. आधी भट्टी बनली मग कोणी शिजून तयार झाले, कोणी कच्चे राहिले. गव्हर्मेंट नोटा बनवते आणि जर ठीक बनल्या नाहीत तर मग गव्हर्मेंटला जाळून टाकाव्या लागतात. आधी तर चांदीचे रुपये चालत होते. सोने आणि चांदी खूप होते. आता तर काय चालले आहे. कोणाची राजा खातात, कोणाची डाकू खातात, दरोडे देखील बघा किती पडतात. दुष्काळ देखील पडेल. हे आहेच रावण राज्य. रामराज्य सतयुगाला म्हटले जाते. बाबा म्हणतात - तुम्हाला इतके श्रेष्ठ बनवले मग गरीब कसे बनलात! आता तुम्हा मुलांना इतके नॉलेज मिळाले आहे तर आनंद झाला पाहिजे. दिवसेंदिवस आनंद वृद्धिंगत होईल. जितके यात्रेमध्ये जवळ जाल तितका आनंद होईल. तुम्ही जाणता शांतीधाम-सुखधाम समोर उभे आहे. वैकुंठातील झाडे दिसून येत आहेत. बस्स, आता पोहोचलो की पोहोचलो. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपला वेळ सफल करण्यावर लक्ष ठेवायचे आहे. माया चुका करायला लावू नये - यासाठी महादानी बनून अनेकांना रस्ता सांगण्यामध्ये बिझी रहायचे आहे.

२) आपले श्रेष्ठ भाग्य बनविण्यासाठी धनीच्या नावावर सर्वकाही सफल करायचे आहे. रुहानी युनिव्हर्सिटी उघडायची आहे.

वरदान:-
उच्च ते उच्च बाबांना प्रत्यक्ष करणारे शुभ आणि श्रेष्ठ कर्मधारी भव

जसे उजव्या हाताने नेहमी शुभ आणि श्रेष्ठ कर्म करतात. तसे तुम्ही राईट हॅन्ड मुले सदैव शुभ अथवा श्रेष्ठ कर्मधारी बना, तुमचे प्रत्येक कर्म उच्च ते उच्च बाबांना प्रत्यक्ष करणारे असावे. कारण कर्मच संकल्प अथवा शब्दांना प्रत्यक्ष पुराव्याच्या रूपामध्ये स्पष्ट करणारी असतात. कर्माला सर्व बघू शकतात, कर्माद्वारे अनुभव करू शकतात त्यामुळे रूहानी दृष्टी द्वारे, आपल्या आनंदाद्वारे, आत्मिक भावाच्या चेहऱ्याद्वारे बाबांना प्रत्यक्ष करा - हे देखील कर्मच आहे.

बोधवाक्य:-
रुहानीयत (आत्मिक भाव) याचा अर्थ आहे - डोळ्यांमध्ये पवित्रतेची झलक आणि चेहऱ्यावर पवित्रतेचे हास्य असावे.

अव्यक्त इशारे - संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-

जसे आजकाल सूर्याच्या शक्तीचा साठा करून कितीतरी कार्ये यशस्वी करतात. तसे तुम्ही संकल्पाची शक्ती जमा करा तर इतरांमध्ये देखील बळ भरू शकता, अनेक कार्ये यशस्वी करू शकता. जे हिंमतहीन आहेत त्यांना वाणी सोबतच श्रेष्ठ संकल्पांच्या सूक्ष्म शक्तीने हिंमतवान बनविणे, हीच वर्तमान काळाची गरज आहे.