07-06-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही आता पुजारी पासून पूज्य बनत आहात, पूज्य बाबा आले आहेत तुम्हाला आप समान पूज्य बनविण्यासाठी”

प्रश्न:-
तुम्हा मुलांमध्ये कोणता दृढ विश्वास आहे?

उत्तर:-
तुम्हाला दृढ विश्वास आहे की आपण जिवंतपणीच बाबांकडून पूर्ण वारसा घेऊनच राहणार. बाबांच्या आठवणीमध्ये हे जुने शरीर सोडून बाबांसोबत जाणार. बाबा आपल्याला घराचा सोपा रस्ता सांगत आहेत.

गीत:-
ओम् नमो शिवाय…

ओम शांती।
ओम् शांती. ओम् शांती तर खूप लोक म्हणत असतात. मुले देखील म्हणतात, ओम् शांती. आतमध्ये जी आत्मा आहे - ती म्हणते ओम् शांती. परंतु आत्मे तर यथार्थ रीत्या स्वतःला जाणत नाहीत, ना बाबांना जाणत. भले बोलावतात परंतु बाबा म्हणतात - मी जो आहे, जसा आहे यथार्थ रीतीने मला कोणीही जाणत नाही. हे (ब्रह्मा) देखील म्हणतात की, मी स्वतःला जाणत नव्हतो की मी कोण आहे, कुठून आलो आहे! आत्मा तर पुरुष आहे ना. मुलगा आहे. फादर आहेत परमात्मा. तर आत्मे आपसामध्ये भाऊ झाले. मग शरीरामध्ये आल्या कारणाने कोणाला पुरुष, कोणाला स्त्री म्हणतात. परंतु यथार्थ आत्मा काय आहे, हे कोणताही मनुष्य मात्र जाणत नाही. आता तुम्हा मुलांना हे नॉलेज मिळते जे तुम्ही मग सोबत घेऊन जाता. तिथे हे नॉलेज असते - आपण आत्मा आहोत हे जुने शरीर सोडून दुसरे घेतो. आत्म्याची ओळख सोबत घेऊन जातो. आधी तर आत्म्याला सुद्धा जाणत नव्हतो. आपण केव्हापासून पार्ट बजावतो आहोत, काहीच जाणत नव्हतो. अजूनपर्यंत देखील कितीतरी जण स्वतःला पूर्णत: ओळखत नाहीत. मोठ्या रूपाने जाणतो आणि मोठ्या लिंग रुपाचीच आठवण करतात. मी आत्मा बिंदू आहे. बाबा देखील बिंदू आहेत, त्या रूपाने आठवण करतील, असे फार थोडे आहेत. नंबरवार बुद्धी आहे ना. कोणी तर चांगल्या रीतीने समजून घेऊन इतरांना देखील समजावून सांगू लागतात. तुम्ही समजावून सांगता स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. तेच पतित-पावन आहेत. पहिले तर मनुष्यांना आत्म्याचीच ओळख नाहीये, तर ते देखील समजावून सांगावे लागेल. स्वतः(हा)ला जेव्हा आत्मा निश्चय करतील तेव्हाच तर बाबांना देखील जाणू शकतील. आत्म्यालाच ओळखत नाहीत त्यामुळे मग बाबांना देखील पूर्णपणे जाणू शकत नाहीत. आता तुम्ही मुले जाणता आपण आत्मा बिंदू आहोत. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट आहे, हे देखील तुम्हाला समजावून सांगावे लागेल. नाही तर फक्त म्हणतात - ‘ज्ञान खूप चांगले आहे. भगवंताला भेटण्याचा रस्ता खूप चांगला सांगता’. परंतु मी कोण आहे, बाबा कोण आहेत, हे जाणत नाहीत. फक्त चांगले-चांगले असे म्हणतात. कोणी तर मग असेही म्हणतात की, हे नास्तिक बनवतात. तुम्ही जाणता - ज्ञानाची समज कोणामध्येही नाही. तुम्ही समजावून सांगता - आता आपण पूज्य बनत आहोत. आम्ही कोणाची पूजा करत नाही कारण जे सर्वांचे पूज्य आहेत उच्च ते उच्च भगवान, त्यांची आम्ही संतान आहोत. ते आहेतच पूज्य पिताश्री. आता तुम्ही मुले जाणता - पिताश्री आम्हाला आपले बनवून शिवाय शिकवतही आहेत. सर्वात उच्च ते उच्च पूज्य एकच आहेत. त्यांच्याशिवाय इतर कोणीही पूज्य बनवू शकत नाही. पुजारी जरूर पुजारीच बनवतील. दुनियेमध्ये सर्वजण आहेत पुजारी. तुम्हाला आता पूज्य भेटले आहेत, जे आप समान बनवत आहेत. तुमची पूजा सोडवली आहे. आपल्या सोबत घेऊन जातात. ही छी-छी दुनिया (विकारी दुनिया) आहे. हा आहेच मृत्युलोक. भक्तीची सुरुवातच तेव्हा होते जेव्हा रावण राज्य असते. पूज्य पासून पुजारी बनतात. मग पुजारी पासून पूज्य बनविण्यासाठी बाबांना यावे लागते. आता तुम्ही पूज्य देवता बनत आहात. आत्मा शरीराद्वारे पार्ट बजावते. आता बाबा आपल्याला पूज्य देवता बनवत आहेत, आत्म्याला पवित्र बनविण्यासाठी. तर तुम्हा मुलांना युक्ती सांगितली आहे - बाबांची आठवण केल्यामुळे तुम्ही पुजारी पासून पूज्य बनाल कारण ते बाबा आहेत सर्वांचे पूज्य. जे अर्धे कल्प पुजारी बनतात, ते मग अर्धे कल्प पूज्य बनतात. हा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला कोणीही जाणत नाहीत. आता बाबांद्वारे तुम्ही मुले जाणता आणि इतरांना देखील समजावून सांगता. सर्वप्रथम मुख्य गोष्ट हीच समजावून सांगायची आहे - ‘स्वतःला आत्मा बिंदू समजा. आत्म्याचे पिता ते निराकार आहेत, तेच नॉलेजफूल येऊन शिकवतात. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात. बाबा येतातच एकदा. त्यांना जाणायचे देखील एकदाच असते. येतात देखील एकदाच संगमयुगावर. जुन्या पतित दुनियेला येऊन पावन बनवतात. आता बाबा ड्रामा प्लॅन अनुसार आले आहेत. कोणती नवीन गोष्ट नाहीये. कल्प-कल्प असाच येतो. एक सेकंद देखील मागे-पुढे होऊ शकत नाही. तुम्हा मुलांच्या मनाला भावते की, खरोखर बाबा आम्हा आत्म्यांना सत्य ज्ञान देत आहेत, मग कल्पानंतर देखील बाबांना यावे लागेल. बाबांद्वारे जे यावेळी जाणले आहे ते पुन्हा कल्पा नंतर जाणणार. हे देखील जाणता - आता जुन्या दुनियेचा विनाश होईल आणि मग आपण सतयुगामध्ये येऊन आपला पार्ट बजावणार. सतयुगी स्वर्गवासी बनणार. एवढे तर बुद्धीमध्ये लक्षात आहे ना. आठवण राहिल्यामुळे आनंदही होतो. स्टुडंट लाईफ आहे ना. आपण स्वर्गवासी बनण्याकरिता शिकत आहोत. स्टडी पूर्ण होईपर्यंत हा आनंद कायम राहिला पाहिजे. बाबा समजावून सांगत राहतात की स्टडी पूर्ण तेव्हा होईल जेव्हा विनाशासाठी सामग्री तयार होईल. आणि मग तुम्ही समजाल - आग जरूर लागणार आहे. तयारी तर होतच राहते ना. एकमेकांवर किती तापत असतात. चारी बाजूंनी भिन्न-भिन्न प्रकारची सेना आहे. सर्व युद्धासाठी सज्ज होत राहतात. कोणती ना कोणती अशी अट घालतात ज्यामुळे जरूर युद्ध होईल. कल्पा पूर्वीप्रमाणे विनाश तर होणारच आहे. तुम्ही मुले बघाल. आधी देखील मुलांनी पाहिले आहे एका ठिणगीमुळे केवढे युद्ध लागले होते. एकमेकांना घाबरवत राहतात की असे करा, नाहीतर आम्हाला हे बॉम्ब्स हातात घ्यावे लागतील. मृत्यू सामोरा येतो तर मग बनविल्याशिवाय राहू शकत नाहीत. यापूर्वी देखील युद्ध लागले होते तर बॉम्ब्स पेरण्यात आले होते. तशी नियती होती ना. आता तर हजारोंनी बॉम्ब्स आहेत.

तुम्हा मुलांना हे जरूर समजावून सांगायचे आहे की, सर्वांना परत घेऊन जाण्यासाठी आता बाबा आलेले आहेत. सर्वजण बोलावत आले आहेत, हे पतित-पावन या. या छि-छि दुनियेमधून (विकारी दुनियेमधून) आम्हाला पावन दुनियेमध्ये घेऊन जा. तुम्ही मुले जाणता - पावन दुनिया आहेत दोन - मुक्ती आणि जीवनमुक्ती. सर्वांचे आत्मे पवित्र बनवून मुक्तिधाममध्ये निघून जातील. या दुःखधामाचा विनाश होईल, ज्याला मृत्यूलोक म्हटले जाते. आधी अमरलोक होते, मग चक्र फिरून आता मृत्यूलोक मध्ये आला आहात. पुन्हा अमरलोकची स्थापना होते. तिथे काही अकाली मृत्यू होत नाही म्हणून त्याला अमरलोक म्हटले जाते. शास्त्रांमध्ये देखील भले शब्द आहेत, परंतु यथार्थ रीतीने कोणीही समजत नाही. हे देखील तुम्ही जाणता - आता बाबा आलेले आहेत. मृत्यूलोकचा विनाश जरूर होणार आहे. हे १०० टक्के निश्चित आहे. बाबा समजावून सांगत आहेत की आपल्या आत्म्याला योगबलाने पवित्र बनवा. माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. परंतु याची देखील मुले आठवण करू शकत नाहीत. बाबांकडून वारसा अथवा राजाई घेण्यासाठी मेहनत तर घेतली पाहिजे ना. जितके होईल तितके आठवणीमध्ये रहायचे आहे. स्वतःला बघायचे आहे - किती वेळ आपण आठवणीमध्ये राहतो आणि किती जणांना आठवण करून देतो? मनमनाभव, याला मंत्र देखील म्हणता येणार नाही, ही आहे बाबांची आठवण. देह-अभिमानाला सोडून द्यायचे आहे. तुम्ही आत्मा आहात, हा (देह) तुमचा रथ आहे, याच्याद्वारे तुम्ही किती काम करता. सतयुगामध्ये तुम्ही देवी-देवता बनून कसे राज्य करता पुन्हा तुम्हाला हाच अनुभव होईल. त्यावेळी तर प्रॅक्टिकल मध्ये आत्म-अभिमानी राहता. आत्मा म्हणेल माझे हे शरीर वृद्ध झाले आहे, हे सोडून नवीन घेणार. दुःखाचा प्रश्नच नाही. इथे तर शरीर सुटू नये त्यासाठी देखील किती डॉक्टरांचे औषधोपचार इत्यादी साठी मेहनत घेतात. तुम्हा मुलांना आजारपण इत्यादीमध्ये देखील जुन्या शरीराला त्रासून जायचे नाही कारण तुम्ही समजता या शरीरामध्येच राहून बाबांकडून वारसा मिळवायचा आहे. शिवबाबांच्या आठवणीनेच पवित्र बनणार. हीच आहे मेहनत. परंतु पहिले आत्म्याला जाणून घ्यावे लागेल. तुमची मुख्य आहे आठवणीची यात्रा. आठवणी मध्ये राहता-राहता मग आपण निघून जाणार मूलवतनमध्ये. जिथले आपण निवासी आहोत, तेच आपले शांतीधाम आहे. शांतीधाम, सुखधामला तुम्हीच जाणता आणि आठवण करता. आणखी कोणीही जाणत नाही. ज्यांनी कल्पापूर्वी बाबांकडून वारसा घेतला आहे, तेच घेतील.

मुख्य आहे आठवणीची यात्रा, भक्तीमार्गाच्या यात्रा आता संपणार आहेत. भक्तीमार्गच नष्ट होईल. भक्तिमार्ग काय आहे? जर ज्ञान असेल तर समजून घ्या. समजतात की, भक्तीमुळे भगवान भेटेल. भक्तीचे फळ काय देतील? काहीच माहिती नाही. तुम्ही मुले आता समजता बाबा मुलांना जरूर स्वर्गाच्या बादशाहीचाच वारसा देतील. सर्वांना वारसा दिला होता, यथा राजा-राणी तथा प्रजा सर्व स्वर्गवासी होते. बाबा म्हणतात ५००० वर्षांपूर्वी देखील तुम्हाला स्वर्गवासी बनवले होते. आता परत तुम्हाला बनवत आहे. मग पुन्हा तुम्ही असे ८४ जन्म घ्याल. याचे बुद्धीमध्ये लक्षात राहिले पाहिजे, विसरता कामा नये. जे सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज बाबांकडे आहे ते मुलांच्या बुद्धीमध्ये टपकत राहते. आपण कसे ८४ जन्म घेतो, आता परत बाबांकडून वारसा घेतो, अनेकदा बाबांकडून वारसा घेतला आहे; बाबा म्हणतात - जसा घेतला होता तसा पुन्हा घ्या. बाबा तर सर्वांना शिकवत राहतात. दैवीगुण धारण करण्यासाठी देखील इशारा मिळत राहतो. आपली तपासणी करण्यासाठी साक्षी होऊन बघितले पाहिजे की आपण कितपत पुरुषार्थ करतो, कोणी समजतात आपण खूप चांगला पुरुषार्थ करत आहोत. प्रदर्शनी इत्यादीचा प्रबंध करत राहतो जेणेकरून सर्वांना माहिती होईल की भगवान बाबा आलेले आहेत. मनुष्य बिचारे सर्व घोर निद्रेमध्ये झोपलेले आहेत. ज्ञानाविषयी कोणाला माहितीच नाही आहे तर जरूर भक्तीला श्रेष्ठ समजतील. आधी तुम्हाला देखील कोणते ज्ञान होते का? आता तुम्हाला माहित झाले आहे, ज्ञानाचे सागर बाबाच आहेत, तेच भक्तीचे फळ देतात, ज्यांनी जास्त भक्ती केली आहे, त्यांना जास्त फळ मिळेल. तेच चांगल्या रीतीने शिकतात उच्च पद प्राप्त करण्यासाठी. या किती गोड-गोड गोष्टी आहेत. वृद्ध माता इत्यादींना देखील खूप सोपे करून समजावून सांगतात. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. उच्च ते उच्च आहेत भगवान शिव. त्यांना शिव परमात्माय नमः म्हटले जाते, ते म्हणत आहेत - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील’. बस्स. आणखी कोणताही त्रास देत नाहीत. पुढे चालून शिवबाबांची देखील आठवण करू लागतील. वारसा तर घ्यायचा आहे, जिवंतपणीच बाबांकडून वारसा घेऊनच राहणार. शिवबाबांच्या आठवणीमध्ये शरीर सोडतात, तर ते संस्कार घेऊन जातात. स्वर्गामध्ये जरूर येतील, जितका योग तितके फळ मिळेल. मुख्य गोष्ट आहे - चालता-फिरता जितके शक्य असेल आठवणीमध्ये रहायचे आहे. आपल्या डोक्यावरचे ओझे उतरवायचे आहे, फक्त आठवण पाहिजे आणखीन कोणताच त्रास बाबा देत नाहीत; बाबा जाणतात मुलांनी अर्ध्या कल्पापासून दुःख पाहिले आहे, म्हणून तुम्हाला आता वारसा घेण्याचा सोपा रस्ता सांगण्यासाठी आलो आहे. फक्त बाबांची आठवण करा. भले आठवण तर आधी देखील करत होता परंतु कोणते ज्ञान नव्हते, आता बाबांनी ज्ञान दिले आहे की या पद्धतीने माझी आठवण केल्यामुळे तुमची विकर्म विनाश होतील. भले शिवाची भक्ती तर दुनियेमध्ये खूप करतात, खूप आठवण करतात परंतु ओळख नाही आहे. यावेळी बाबा स्वतः येऊन ओळख देतात की माझी आठवण करा. आता तुम्ही समजता आपण चांगल्या प्रकारे जाणतो. तुम्ही म्हणाल आम्ही बापदादांकडे जातो. बाबांनी हा भागीरथ घेतला आहे, भागीरथ देखील प्रसिद्ध आहे, यांच्याद्वारे बसून ज्ञान ऐकवतात. हा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. कल्प-कल्प या भाग्यशाली रथावर येतात. तुम्ही जाणता हे तेच आहेत ज्यांना श्याम-सुंदर म्हणतात. हे देखील तुम्ही समजता. मनुष्यांनी मग अर्जुन नाव ठेवले आहे. आता बाबा यथार्थपणे समजावून सांगतात - ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा कसे बनतात. मुलांमध्ये आता समज आली आहे की आपण ब्रह्मापुरीचे आहोत मग विष्णुपुरीचे बनणार. विष्णुपुरीतून ब्रह्मापुरीमध्ये येण्यासाठी ८४ जन्म लागतात. हे देखील अनेक वेळा समजावून सांगितले आहे जे तुम्ही परत ऐकत आहात. आत्म्याला आता बाबा म्हणतात फक्त मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची विकर्मे विनाश होतील त्यामुळे तुम्हाला आनंद देखील होतो. हा एक अंतिम जन्म पवित्र बनल्यामुळे आपण पवित्र दुनियेचे मालक बनणार. तर का नाही पवित्र बनायचे. आपण एका पित्याची मुले ब्रह्माकुमार-कुमारी आहोत, तरी देखील ती दैहिक वृत्ती बदलण्यासाठी वेळ लागतो. हळूहळू शेवटी कर्मातीत अवस्था होणार आहे. यावेळेस कोणाची कर्मातीत अवस्था होणे असंभव आहे. कर्मातीत अवस्था झाली मग तर हे शरीर देखील राहणार नाही, त्याला सोडावे लागेल. युद्ध सुरु होईल, एका बाबांचीच आठवण रहावी, यातच मेहनत आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) साक्षी होऊन स्वतःला बघायचे आहे की आपण कितपत पुरुषार्थ करत आहोत? चालता-फिरता, कर्म करताना किती वेळ बाबांच्या आठवणीमध्ये राहतो?

२) या शरीराला कधीही कंटाळून जायचे नाही. या शरीरातच राहून बाबांकडून वारसा मिळवायचा आहे. स्वर्गवासी बनण्यासाठी सर्व शिक्षण याच जीवनामध्ये पूर्ण करायचे आहे.

वरदान:-
त्रिकालदर्शी आणि साक्षी दृष्टा बनून प्रत्येक कर्म करत असताना बंधन-मुक्त स्थितीच्या अनुभवाद्वारे दृष्टांत रूप भव

जर त्रिकालदर्शी स्टेजवर स्थित होऊन, कर्माच्या आदि-मध्य-अंताला जाणून कर्म करत असाल तर कोणतेही कर्म विकर्म होऊ शकत नाही, सदैव सुकर्म असेल. असेच साक्षी दृष्टा बनून कर्म केल्यामुळे कोणत्याही कर्माच्या बंधनामध्ये कर्म-बंधनी आत्मा बनणार नाही. कर्माचे फळ श्रेष्ठ असल्याकारणाने कर्म संबंधामध्ये याल, बंधनामध्ये नाही. कर्म करत असताना न्यारे आणि प्यारे रहाल तर अनेक आत्म्यांच्या समोर दृष्टांत रूप अर्थात उदाहरण बनाल.

बोधवाक्य:-
जे मनाने सदैव संतुष्ट आहेत तेच डबल लाईट आहेत.

अव्यक्त इशारे - आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-

कोणताही समर्थ संकल्प हा आत्मिक शक्ती अर्थात एनर्जी जमा करतो, समय देखील सफल करतो. व्यर्थ संकल्प एनर्जी आणि समयाला व्यर्थ गमावतो त्यामुळे आता व्यर्थ संकल्पांची रचना बंद करा. ही रचनाच आत्मा रचत्याला हैराण करणारी आहे म्हणून सदैव याच शानमध्ये रहा की, ‘मी आत्मा मास्टर सर्वशक्तिवान आहे, समर्थ आत्मा आहे’; तर कधीही तुम्ही हैराण होणार नाही आणि अनेकांच्या त्रासाला दूर करणारे बनाल.