08-06-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   15.11.2005  ओम शान्ति   मधुबन


“सच्च्या मनाने बाबांचे आणि परिवाराचे स्नेही बनून मेहनत मुक्त बनण्याचा वायदा करा आणि फायदा घ्या”


आज बापदादा आपल्या चोहो बाजूच्या श्रेष्ठ स्वराज्य अधिकारी, स्वमानधारी मुलांना बघत आहेत. बाबांनी मुलांना आपल्यापेक्षाही श्रेष्ठ स्वमान दिला आहे. प्रत्येक मुलाला पाया पडण्यापासून सोडवून डोक्यावरील मुकुट बनवला. स्वतःला नेहमीच लाडक्या मुलांचा सेवाधारी म्हणवून घेतले. इतक्या मोठ्या ऑथॉरिटीचा स्वमान मुलांना दिला. तर प्रत्येक जण स्वतःला इतके स्वमानधारी समजता का? स्वमानधारीचे विशेष लक्षण कोणते असते? जितका जो स्वमानधारी असेल तितकाच सर्वांना सन्मान देणारा असेल. जितका स्वमानधारी तितकाच निर्मान, सर्वांचा स्नेही असेल. स्वमानधारीचे लक्षण आहे - बाबांचा लाडका त्याचसोबत बाकी सर्वांचा लाडका. हदचा लाडका नाही, बेहदचा लाडका. जसे बाबा सर्वांचे लाडके आहेत, भले मग एक महिन्याचा मुलगा असेल, किंवा आदि रत्न जरी असेल असो परंतु प्रत्येकजण मानतो - मी बाबांचा, बाबा माझे. ही निशाणी आहे सर्वांचा लाडका असण्याची, श्रेष्ठ स्वमानाची, कारण अशी मुले फॉलो फादर करणारी आहेत. पहा बाबांनी प्रत्येक वर्गातील मुलांना, छोट्या मुलांपासून, वृद्ध समान मुलांपर्यंत सर्वांना स्वमान दिला. तरुणांना विनाशकारी पासून विश्वकल्याणकारीचा स्वमान दिला. महान बनवले. प्रवृत्तीवाल्यांना महात्मे, मोठ-मोठे जगतगुरू जे आहेत त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ, प्रवृत्तीमध्ये राहत असताना, पर-वृत्तीवाल्या महात्म्यांचे देखील मस्तक झुकवणारे बनवले. कन्यांना शिव-शक्ती स्वरूपाच्या स्वमानाची आठवण करून दिली, तसे बनवले. वयस्कर मुलांना ब्रह्मा बाबांचे हमजीन्सच्या अनुभवाचा स्वमान दिला. अगदी असेच स्वमानधारी मुले प्रत्येक आत्म्याला त्या स्वमानाने बघतील. केवळ बघणार नाहीत परंतु संबंध-संपर्कामध्ये येतील, कारण स्वमान देह-अभिमानाला नाहीसा करणारा आहे. जिथे स्वमान असेल तिथे देहाचा अभिमान नसेल. देह-अभिमानाला मिटविण्याचे खूप सोपे साधन आहे - सदैव स्वमानामध्ये राहणे. सदैव प्रत्येकाला स्वमानाने बघणे. भले मग प्यादा असो, १६ हजाराच्या माळेमधील लास्ट नंबर देखील असो परंतु लास्ट नंबरमध्ये सुद्धा ड्रामा नुसार बाबांद्वारे काही ना काही विशेषता आहे. स्वमानधारी विशेषतेला पाहून स्वमान देतात. त्यांच्या दृष्टीमध्ये, वृत्तीमध्ये, कृतीमध्ये, प्रत्येकाची विशेषता सामावलेली असते. जो कोणी बाबांचा बनला तो विशेष आत्मा आहे, भले नंबरवार आहे परंतु दुनियेतील कोटींमध्ये कोणी आहे. असे सर्वजण स्वतःला विशेष आत्मा समजता का? स्वमानामध्ये स्थित रहायचे आहे. देह-अभिमानामध्ये नाही, स्वमान.

बाबांचे प्रत्येक मुलावर प्रेम का आहे? कारण बाबा जाणतात - मला ओळखून, माझे बनले आहेत ना. मग जरी आज या मेळ्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा आले आहेत, तरीही ‘बाबा’ म्हटले, तर बाबांच्या प्रेमाचे पात्र आहेत. बापदादांना चोहो बाजूंची सगळी मुले सर्वांपेक्षा लाडकी आहेत. असेच फॉलो फादर. कोणीही नावडती नाहीत, सगळी आवडती आहेत. पहा, जी कोणी मुले ‘माझे बाबा’ म्हणतात, तर हा माझेपणा कोणी आणला? प्रेमाने. जे कोणी इथे बसले आहेत, ते समजतात की या प्रेमाने बाबांचे बनवले. बाबांचे प्रेम चुंबक आहे, प्रेमाच्या चुंबकाने बाबांचे बनलात. हृदयापासूनचे प्रेम, बोलण्यापुरते प्रेम नाही. हृदयापासूनचे प्रेम या ब्राह्मण जीवनाचे फाऊंडेशन आहे. बाबांना भेटायला का येता? प्रेम तुम्हाला घेऊन आले ना! जे पण सर्व बसले आहेत, आले आहेत, कशासाठी आले आहेत? प्रेमाने खेचून आणले ना. प्रेम देखील किती आहे? १०० टक्के आहे का कमी आहे? जे समजतात प्रेमामध्ये आम्ही १०० टक्के आहोत, त्यांनी हात वर करा. प्रेमामध्ये १०० टक्के. जरा सुद्धा कमी नाही? अच्छा. तर इतकेच प्रेम आपसात ब्राह्मणांमध्ये आहे का? यामध्ये हात वर करायला सांगू? यामध्ये पर्सेंटेज आहे. जसे बाबांचे सर्वांवर प्रेम आहे, असेच मुलांचे देखील सर्वांवर प्रेम, सर्वांचे स्नेही. दुसऱ्याच्या कमजोरीला पाहू नका. जर कोणी संस्काराच्या वशीभूत आहे, तर फॉलो कोणाला करायचे आहे? वशीभूत असणाऱ्याला का? तुम्ही वशीकरण मंत्र देणारे आहात, वशीभूतपणा पासून सोडविणारा मंत्र; तुम्ही सोडविणारे आहात ना! का बघणारे आहात? काय दिसून येते? जर कोणती खराब वस्तू दिसत जरी असली, तर काय करता? बघत राहता की बाजूला होता? कारण बापदादांनी बघितले आहे की, जे हृदयापासून प्रेम करणारे आहेत, बाबांवर हृदयापासून प्रेम करणारे आहेत, ते सर्वांचे स्नेही जरूर असणार. संपन्न आणि संपूर्ण बनण्याची खूप सोपी विधी आहे - हृदयापासूनचे प्रेम. भले मग कोणी कितीही ज्ञानी असो, परंतु जर हृदयापासूनचे प्रेम नसेल तर ब्राह्मण जीवनामध्ये रमणीक जीवन नसेल. निरस जीवन असेल कारण ज्ञानामध्ये, जर प्रेमा शिवाय ज्ञान असेल तर ज्ञानामध्ये प्रश्न उत्पन्न होतात - ‘का, काय’! परंतु प्रेमासहित ज्ञान असेल तर असा स्नेही सदैव प्रेमामध्ये लवलीन राहतो. अशा स्नेह्याला आठवण करण्याची मेहनत करावी लागत नाही. फक्त ज्ञानी आहे, प्रेम नसेल तर मेहनत करावी लागते. तो मेहनतीचे फळ खातो, तो प्रेमाचे फळ खातो. ज्ञान आहे बीज परंतु पाणी आहे स्नेह. जर बीजाला स्नेहाचे पाणी मिळाले नाही तर फळ येत नाही.

तर आज बापदादा सर्व मुलांचे हृदयापासूनचे प्रेम चेक करत होते. भले मग बाबांवर असो, किंवा सर्वांवर असो. तर तुम्ही सर्व स्वतःला काय समजता? स्नेही आहात? आहात का स्नेही? जे समजतात आपण अंतःकरणपूर्वक स्नेही आहोत, त्यांनी हात वर करा. (मेजॉरिटी सर्वांनी हात वर केले) अच्छा - सर्वांचे स्नेही. बाबांचे तर हृदयापासूनचे स्नेही आहात, परंतु सर्वांचे स्नेही आहात का? सर्वांचे आहात? प्रत्येकजण समजतो का की हे माझे भाऊ-बहीणी आहेत? प्रत्येकजण समजतो हा माझा आहे? समजता का? की काहीजण समजतात? जसे बाबांवरील प्रेमासाठी सर्वजण हात वर करता, होय बाबांचे स्नेही आहात, तसे प्रत्येकासाठी तुम्ही हात वर कराल, की होय, या सर्वांचा स्नेही आहे? हे सर्टिफिकेट सर्वांकडून मिळेल का? कारण बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले होते की फक्त बाबांकडून सर्टिफिकेट घ्यायचे नाहीये, ब्राह्मण परिवाराकडून देखील घ्यायचे आहे कारण यावेळी बाबा धर्म आणि राज्य दोन्ही एकत्र स्थापन करत आहेत. राज्यामध्ये फक्त बाबाच नसणार तर परिवार देखील असेल. बाबांचे ही प्रिय, परिवाराचे ही प्रिय.

ज्ञानी बनले आहात परंतु त्याचसोबत स्नेही बनणे देखील जरुरी आहे. स्वमानामध्ये राहणे आणि सन्मान देणे, हे दोन्ही जरुरी आहे. बाबांनी (बह्मा बाबांनी) ब्राह्मण जन्म घेताच प्रत्येक मुलाला सन्मान दिला, तेव्हाच तर इतके श्रेष्ठ बनले. या एका जन्मामध्ये सन्मान द्यायचा आहे आणि संपूर्ण कल्प त्याचे प्रारब्ध म्हणून सन्मान प्राप्त होतो. अर्धा कल्प राज्य अधिकारीचा सन्मान मिळतो, अर्धा कल्प भक्तीमध्ये भक्तांकडून सन्मान मिळतो. परंतु याचा, संपूर्ण कल्पाचा आधार आहे या एका जन्मामध्ये सन्मान देणे, सन्मान घेणे.

आत्ता यावेळी बापदादा बघत आहेत चोहो बाजूला विदेशामध्ये कोणी रात्री, कोणी दिवसा मिलन साजरे करत आहेत. चांगल्या पुरुषार्थाच्या गतीला वाढवण्यासाठी तुम्हाला दादी सुद्धा (जानकी दादी) चांगली मिळाली आहे. असे आहे ना? थोडीशी जरी कोणती कमतरता बघितली, तर लगेच क्लास वर क्लास करते. कोणत्याही मुलाला, भले देशातील असो किंवा विदेशातील असो, कोणत्याही सब्जेक्टमध्ये मेहनत करावी लागते याचे मुख्य कारण आहे - हृदयापासूनच्या प्रेमाची कमी. स्नेह अर्थात लवलीन. आठवण करावी लागत नाही, विसरणे कठीण असते. जर मेहनत करावी लागत असेल तर हृदयापासूनच्या प्रेमाला चेक करा - कुठे लिकेज तर नाही ना? भले मग कोणत्याही व्यक्तीचे आकर्षण असेल, किंवा व्यक्तीच्या विशेषतेचे, किंवा कोणत्या साधनाचे, सैल्वेशनचे (सुविधांचे), एक्स्ट्रा सैल्वेशन, नियमानुसार सैल्वेशन ठीक आहे, परंतु एक्स्ट्रा सैल्वेशनवर (जास्त सुविधांवर) देखील प्रेम असते, आकर्षण असते. त्या सुविधांची आठवण येत राहील. त्याची निशाणी आहे - कुठेही लिकेज असेल तर जीवनामध्ये सदैव कोणत्याही कारणाने संतुष्टतेची अनुभूती होणार नाही. काही ना काही कारणामुळे असंतुष्टतेचा अनुभव होईल. आणि जिथे संतुष्टता असेल तर त्याची निशाणी सदैव प्रसन्नता असेल. सदैव रुहानी गुलाबाप्रमाणे हर्षितमुख राहील, प्रसन्न राहील. मूड ऑफ होणार नाही, सदैव डबल लाइट. तर समजले मेहनत करण्यापासून आता बचाव करा. बापदादांना मुलांनी मेहनत केलेली आवडत नाही. अर्धाकल्प मेहनत केली, आता मौज करा. प्रेमामध्ये लवलीन होऊन, ज्ञान सागराच्या तळाशी अनुभवाचे मोती अनुभव करा. केवळ डुबकी मारून सागरातून बाहेर येऊ नका. लवलीन रहा.

सर्वांनी वायदा तर केला आहे ना! की सोबत राहणार, सोबत येणार? वायदा केला आहे ना? सोबत येणार का मागे-मागे येणार? जे सोबत येण्यासाठी तयार आहेत त्यांनी हात वर करा. तयार आहात, विचारपूर्वक हात वर करा, तयार आहात अर्थात बाप समान आहात. कोण सोबत येणार? समान असणारा सोबत येईल ना! तर येणार? एवररेडी? पहिली लाइन एवररेडी? उद्या सोबत येण्यासाठी ऑर्डर करु, याल? अच्छा, प्रवृत्तीवाले येणार? मुलांची आठवण येणार नाही? मातांनो तुम्ही येणार? सर्व माता तयार आहेत? कोणतीही वस्तू आठवणार नाही ना? टीचर्सना सेंटरची आठवण येईल, जिज्ञासू आठवतील? आठवणार नाहीत? अच्छा. सगळे निर्मोही झाला आहात? मग तर खूप चांगली गोष्ट आहे. तर मग आता मेहनत करावी लागणार नाही ना.

आज बापदादा सर्वांना भले समोर बसले आहेत, किंवा दूर बसले आहेत परंतु बाबांच्या हृदयामध्ये बसले आहेत, त्या सर्वांना आजचा दिवस मेहनत मुक्त बनवू इच्छित आहेत. बनाल? टाळ्या तर वाजवल्या, बनाल? उद्यापासून कोणी दादींकडे येणार नाही. मेहनत करायला लावणार नाही? खुशीने भेटणार. झोन हेडपाशी जाणार नाही, कंप्लेंट करणार नाही ना, कंप्लिट. ठीक आहे? आता हात वर करा. बघा विचारपूर्वक हात वर करा, असाच हात वर करू नका. कोणतीही कंप्लेंट नाही, काहीही ‘माझे-माझे’ नाही, कोणीच माझे नाही. मी सुद्धा नाही, माझे देखील नाही, संपले. पहा, वायदा तर केला आहे, चांगले आहे मुबारक असो परंतु काय आहे, केलेल्या वायद्याचा फायदा करून घेत नाहीत. वायदा खूप पटकन करता परंतु फायदा घेण्यासाठी रोज एक तर रीयलायझेशन आणि दुसरे म्हणजे रिवाइज करा, केलेल्या वायद्याला रोज रिवाइज करा कोणता वायदा केला आहे? अमृतवेलेला भेटल्या नंतर वायदा आणि फायदा दोन्हीच्या बॅलन्सचा चार्ट बनवा. वायदा काय केला? आणि फायदा काय घेत आहे? रियलाइज करा, रिवाइज करा, बॅलन्स होत असेल तर सर्व काही ठीक होईल. बापदादांना माहित आहे मिटिंगवाल्यांनी वायदा केला आहे.

बापदादांनी बघितले आहे प्लॅन खूप चांगले-चांगले बनवतात, बापदादांना आवडतात. बापदादा काय इच्छितात? बापदादांना केवळ एक शब्द हवा आहे - तो एक शब्द आहे - सफल करा, सफल बना. जे काही खजिने आहेत, शक्ती आहेत, संकल्प आहेत, बोल आहेत, कर्म देखील एक शक्ती आहे, हा समय देखील शक्ती आहे, खजिना आहे. सर्वांना सफल करायचे आहे. भले मग स्थूल धन असेल, किंवा अलौकिक खजिने, सर्वांना सफल करायचे आहे. सफलतामूर्तचे सर्टिफिकेट घ्यायचेच आहे. सफल करा आणि इतरांनाही सफल करण्यासाठी प्रवृत्त करा. जर कोणी असफल करत असेल, तर शब्दांद्वारे, शिकवणीद्वारे नाही, परंतु आपली शुभ भावना, शुभ कामना आणि सदैव शुभ सन्मान देणे याद्वारे त्याला सफल करण्यासाठी प्रवृत्त करा. केवळ शिकवण देऊ नका, जर शिकवण सुद्धा द्यावी लागत असेल तर क्षमा आणि शिकवण, क्षमेचे रूप बनून शिकवण द्या. मर्सिफुल बना, दयाळू बना. तुमचे मर्सिफुल रूपच शिकवणीचे फळ जरूर देईल. पहा, आजकाल विज्ञानाचे डॉक्टर्स देखील जेव्हा ऑपरेशन करतात, तर अगोदर काय करतात? आधी झोपवतात, नंतर कापतात, आधीच कट करत नाहीत. टिंचर सुद्धा लावतात तर पहिल्यांदा फुंकर मारतात नंतर टिंचर लावतात. तर तुम्ही सुद्धा पहिले मर्सिफुल बना नंतर शिकवण द्या तर प्रभाव पडेल; नाहीतर काय होते, तुम्ही शिकवण देऊ लागता, तो अगोदरच तुमच्या पेक्षा जास्त शिक्षक आहे. तर शिक्षक, शिक्षकाची शिकवण मानत नाही. जो पॉईंट तुम्ही सांगाल, ‘असे करू नका, असे करा’, तर त्याच्याजवळ कट करण्याचे १० पॉईंट्स असतील, म्हणून क्षमा आणि शिकवण एकत्र असावे, तर या ७०व्या वर्षाची थीम आहे - सफल करा आणि सफल करण्यास प्रवृत्त करा. सफलतामूर्त बना सर्व काही सफल करा. डबल लाइट बनायचे आहे ना तर सफल करा. संस्कारांना देखील सफल करा. जे ओरीजनल तुमचे आदि संस्कार, देवताई संस्कार, अनादि संस्कार आत्म्याचे आहेत त्यांना इमर्ज करा. उलट्या संस्कारांचा संस्कार करा. आदि अनादि संस्कार इमर्ज करा. आता सर्वांची विशेष एकच कम्प्लेंट राहिली आहे - ‘संस्कार बदलत नाहीत, संस्कार बदलत नाहीत’.

सर्वांनी मेहनत मुक्त होण्याचा वायदा तर केला आहे ना! (सर्वांनी हात उंचावला) अच्छा - यांचा फोटो काढा. आता एक मिनिट आपल्या अंतःकरणापासून या वायद्याला दृढतेची अंडरलाइन करा. आपल्या मनामध्ये पक्के करा. (ड्रिल) अच्छा.

सर्व चोहो बाजूच्या स्वमानधारी मुलांना, सदैव बाबांचे हृदयापासूनचे स्नेही, सर्वांचे स्नेही असणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, सदैव मेहनत मुक्त, जीवनमुक्त अनुभव करणाऱ्या तीव्र पुरुषार्थी मुलांना, सदैव वायदा आणि वायद्याचा फायदा घेणाऱ्या, बॅलन्स ठेवणाऱ्या ब्लिसफुल मुलांना, सदैव मजेत राहणाऱ्या, इतरांनाही मजेत राहू देणाऱ्या, अशा संगमयुगी श्रेष्ठ भाग्याच्या अधिकारी मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि दिलारामच्या हृदयापासूनचे आशीर्वाद स्वीकार व्हावेत. प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

दादींसोबत बातचीत:- सर्व ठीक आहे ना! सगळे तुम्हा सर्वांना पाहून आनंदीत होतात. बाबा आणि मुले, दोघांना पाहून आनंदीत होतात. दोघेही समान. सर्वांचे सिकीलधे आहात (सर्वांना खूप-खूप वर्षांनी भेटला आहात). सर्वांचे दादींवर विशेष प्रेम आहे ना! खूप प्रेम आहे कारण जे निमित्त बनतात, तर निमित्त बनणाऱ्यांवर जबाबदारी देखील असते, तर स्नेह देखील इतका असतो कारण सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद त्यांना जीवनामध्ये लिफ्ट मिळते. तुम्ही सुद्धा जे निमित्त बनता त्यांना देखील लिफ्ट मिळते परंतु लिफ्टच्या गिफ्टला कायम ठेवाल तर खूप फायदा होऊ शकतो. हे एक्स्ट्रा वरदान मिळते. कोणत्याही कार्यामध्ये, ईश्वरीय कार्यामध्ये किंवा यज्ञ सेवेमध्ये जो विशेष निमित्त बनतो त्याला आशीर्वाद आणि प्रेम दोन्हीची लिफ्ट मिळते. प्रेम एक अशी चीज आहे जी कोणा पासून काय बनवते. आज दुनियेमध्ये देखील कोणालाही विचारा काय हवे आहे? तर म्हणतील - प्रेम हवे. शांती हवी, ती देखील प्रेमाने मिळेल. तर प्रेम, आत्मिक प्रेम सर्वात श्रेष्ठ आहे. अच्छा.

वरदान:-
कंबाइंड स्वरूपाच्या स्मृती द्वारे अभूल (स्मृती स्वरूप) बनणारे निरंतर योगी भव

जी मुले स्वतःला बाबांसोबत कंबाइंड असल्याचा अनुभव करतात त्यांना ‘निरंतर योगी भव’चे वरदान आपोआप मिळते कारण ते जिथे कुठे राहतील तिथे भेटीचा सोहळा होत राहतो. त्यांना कोणी कितीही विसरायला लावण्याचा प्रयत्न करेल - परंतु ते अभूल (स्मृति स्वरूप) असतात. अशी अभूल मुले जी बाबांना अति प्रिय आहेत तीच निरंतर योगी आहेत कारण प्रेमाची निशाणी आहे - नैसर्गिक आठवण. त्यांच्या संकल्प रुपी नखाला देखील माया हलवू शकत नाही.

सुविचार:-
कारण सांगण्याऐवजी त्याचे निवारण करा तर आशीर्वादांचे अधिकारी बनाल.

अव्यक्त इशारे - आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-

अंतर्मुखी बनून ज्ञान चिंतनाच्या अभ्यासाद्वारे अलौकिक मस्तीमध्ये सदैव मस्त रहा तर या दुनियेतील गुंतागुंतीच्या गोष्टी आपल्याकडे आकर्षीत करणार नाहीत. जसे मिलिटरीवाले अंडर ग्राउंड होतात तर बाहेरचे बॉम्ब्स इत्यादीचा परिणाम होत नाही, तसे तुम्ही अंतर्मुखी, अंडरग्राउंड आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा तर बाह्यमुखतेच्या गोष्टी डिस्टर्ब करणार नाहीत.