09-06-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही संपूर्ण विश्वावर शांतीचे राज्य स्थापन करणाऱ्या बाबांचे मद त गार आहात, आता तुमच्या समोर सुख-शांतीची दुनिया आहे”

प्रश्न:-
बाबा मुलांना कशासाठी शिकवतात, अभ्यासाचे सार काय आहे?

उत्तर:-
बाबा आपल्या मुलांना स्वर्गाचा प्रिन्स, विश्वाचा मालक बनविण्यासाठी शिकवतात; बाबा म्हणतात, अभ्यासाचे सार आहे - दुनियेच्या सर्व गोष्टींना सोडून द्या, असे कधीही समजू नका आमच्याकडे करोड आहेत, लाख आहेत. काहीही हातात येणार नाही म्हणून चांगल्या रितीने पुरुषार्थ करा, अभ्यासावर लक्ष द्या.

गीत:-
आखिर वह दिन आया आज…

ओम शांती।
मुलांनी गाणे ऐकले - अखेरीस विश्वामध्ये शांतीची वेळ आली. सर्वजण म्हणतात विश्वामध्ये शांती कशी होईल मग जे चांगला सल्ला देतात त्यांना बक्षीस देतात. नेहरू देखील सल्ला द्यायचे, शांती तर झाली नाही. फक्त सल्ला देऊन गेले. आता तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की कोणे एकेकाळी संपूर्ण विश्वात सुख, शांती, संपत्ती इत्यादी होती. ती आता नाही आहे. आता परत होणार आहे. चक्र तर फिरेल ना. हे तुम्हा संगमयुगी ब्राह्मणांच्या बुद्धीमध्ये आहे. तुम्ही जाणता भारत पुन्हा सोन्याचा बनणार आहे. भारतालाच सोन्याची चिडिया म्हटले जाते. भले महिमा तर करतात परंतु फक्त म्हणण्यापुरती. तुम्ही तर आता प्रॅक्टिकलमध्ये पुरुषार्थ करत आहात. जाणता बाकी थोडे दिवस आहेत तर या साऱ्या नरकाच्या दुःखाच्या गोष्टी विसरल्या जातात. तुमच्या बुद्धीमध्ये आता सुखाची दुनिया समोर उभी आहे. जसे पूर्वी विलायतमधून येत असत तर समजत होते की आता पोहोचायला थोडा वेळ आहे; कारण पूर्वी विलायतेहून यायला खूप वेळ लागत असे. आता तर विमानाने लवकर पोहोचतात. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आता आमचे सुखाचे दिवस आले आहेत, ज्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. बाबांनी पुरुषार्थ देखील सोपा सांगितला आहे. ड्रामा अनुसार कल्पा पूर्वीप्रमाणे, हे निश्चित आहे. तुम्ही देवता होता, देवतांची किती असंख्य मंदिरे बनत आहेत! मुले जाणतात ही मंदिरे इत्यादी बनवून काय करणार! किती दिवस बाकी आहेत! तुम्ही मुले ज्ञानाची ऑथॉरिटी आहात. म्हटले देखील जाते परमपिता परमात्मा सर्वशक्तिमान ऑलमाइटी ऑथॉरिटी आहे. तुम्ही ज्ञानाची ऑथॉरिटी आहात. ती आहे भक्तीची ऑथॉरिटी. बाबांना म्हटले जाते ऑलमाइटी ऑथॉरिटी. तुम्ही मुले नंबरवार पुरुषार्था नुसार बनत आहात. तुम्हाला सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे. जाणता आपण पुरुषार्थ करत आहोत - बाबांकडून वारसा घेण्याचा. जे भक्तीची ऑथॉरिटी आहेत ते सर्वांना भक्तीच ऐकवतात. तुम्ही ज्ञानाची ऑथॉरिटी आहात तर ज्ञानच ऐकवता. सतयुगामध्ये भक्ती असतच नाही. एकही पुजारी नसतो, पुज्यच पूज्य आहेत. अर्धा कल्प आहेत पूज्य, अर्धाकल्प आहेत पुजारी. भारतवासीयांसाठीच आहे पूज्य होते तर स्वर्ग होता. आता भारत पुजारी, नरक आहे. तुम्ही मुले आता प्रॅक्टिकल लाईफ बनवत आहात. नंबरवार पुरुषार्था नुसार सर्वांना समजावून सांगत राहता आणि वृद्धी होत राहते. ड्रामामध्ये आधीपासूनच नोंदलेले आहे. ड्रामा तुमच्याकडून पुरुषार्थ करवून घेत राहतो आणि तुम्ही करत राहता. जाणता ड्रामामध्ये आमचा अविनाशी पार्ट आहे, दुनिया या गोष्टींना कशी जाणेल. आमचाच ड्रामामध्ये पार्ट आहे. जो असे म्हणेल तोच समजेल ना की आपला या ड्रामामध्ये कसा पार्ट आहे. हे सृष्टीचक्र फिरतच राहते. हा दुनियेचा इतिहास-भूगोल तुमच्या शिवाय इतर कोणालाही माहित नाही आहे. उच्च ते उच्च कोण आहे, दुनियेमध्ये कोणीही जाणत नाहीत. ऋषी-मुनी इत्यादी देखील म्हणत होते - आम्ही जाणत नाही. नेती-नेती म्हणत होते ना. आता तुम्ही मुले जाणता ते तर रचता बाबा आहेत आणि आम्हाला शिकवत आहेत. हे देखील बाबांनी वारंवार समजावून सांगितले आहे की इथे जेव्हा बसता तेव्हा देही-अभिमानी होऊन बसा. एक बाबाच राजयोग शिकवतात आणि दुनियेचा इतिहास-भूगोल समजावून सांगतात. बाबा म्हणतात - मी काही थॉट रीडर नाहीये, इतकी मोठी दुनिया आहे, याला काय वाचत बसणार. बाबा तर स्वतः म्हणतात मी तुम्हाला पावन बनविण्यासाठी ड्रामाच्या नोंदी अनुसार येतो. ड्रामामध्ये माझा जो पार्ट आहे तोच बजावण्यासाठी येतो. बाकी मी काही थॉट रीड करत नाही, सांगतो माझा पार्ट काय आहे आणि तुम्ही कोणता पार्ट बजावत आहात. तुम्ही हे नॉलेज शिकून दुसऱ्यांना शिकवत आहात. माझा पार्टच आहे पतितांना पावन बनविणे. हे देखील तुम्ही मुले जाणता, तुम्ही तिथी-तारीख इत्यादी सर्व काही जाणता. दुनियेमध्ये कोणी थोडेच जाणतात. तुम्हाला बाबा शिकवत आहेत, आणि जेव्हा हे चक्र पूर्ण कराल तेव्हा मग बाबा येतील. त्यावेळी जो सीन चालला तो पुन्हा कल्पानंतरच चालेल. एक सेकंद दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. हे नाटक फिरत राहते. तुम्हा मुलांना बेहदच्या नाटकाबद्दल माहित आहे. तरीही तुम्ही घडोघडी विसरून जाता. बाबा म्हणतात - तुम्ही फक्त आठवण करा, माझे बाबा, बाबा आहेत, तेच टीचर आहेत, गुरु आहेत. तुमची बुद्धी त्या दिशेने गेली पाहिजे. बाबांची महिमा ऐकून आत्मा खुश होते. सर्वजण म्हणतात - माझे बाबा, बाबा आहेत, टीचर आहेत, ते सत्यच सत्य आहेत. शिक्षण देखील सत्य आणि परीपूर्ण आहे. त्या लोकांचे ते शिक्षण आहे अप्रगत. तर तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये किती आनंद असला पाहिजे. मोठी परीक्षा पास करणाऱ्यांच्या बुद्धीमध्ये जास्त आनंद असतो. तुम्ही इतके श्रेष्ठ शिक्षण घेता तर किती परमानंद झाला पाहिजे. ईश्वर पिता, बेहदचे पिता आम्हाला शिकवत आहेत. तुम्हाला तर रोमांचित झाले पाहिजे. तोच एपिसोड रिपीट होत आहे, तुमच्याशिवाय इतर कोणालाच माहित नाहीये. कल्पाचा कालावधीच वाढवून ठेवला आहे. तुमच्या बुद्धीमध्ये आता ५ हजार वर्षांची पूर्ण स्टोरीच गोल फिरत राहते, त्यालाच स्वदर्शन चक्र म्हटले जाते.

मुले म्हणतात - ‘बाबा, खूप वादळे येतात, आम्ही तुम्हाला विसरून जातो’. बाबा म्हणतात - ‘तुम्ही कोणाला विसरता? बाबा, जे तुम्हाला डबल मुकुटधारी, विश्वाचा मालक बनवतात त्यांना तुम्ही कसे विसरता! दुसऱ्या कोणाला विसरत नाही. पत्नी, मुले-बाळे, काका, मामा, मित्र-संबंधी इत्यादी सर्व लक्षात आहेत. आणि या गोष्टीला तुम्ही विसरता कसे. तुमचे युद्ध या आठवणीसाठी आहे, जितके शक्य असेल आठवण करायची आहे. मुलांनी स्वतःच्या उन्नतीकरिता पहाटे उठून बाबांच्या आठवणीमध्ये फेरफटका मारायचा आहे. तुम्ही गच्चीवर किंवा बाहेर थंड हवेमध्ये जा. इथेच येऊन बसण्याची काही गरज नाही. बाहेरही जाऊ शकता, सकाळच्या वेळी काही भीती इत्यादीचा प्रश्न नसतो. बाहेर जाऊन पायी चाला. आपसात याच गोष्टी करत रहा, बघूया बाबांची जास्त आठवण कोण करतो, आणि मग सांगायला हवे की किती वेळ आम्ही आठवण केली. बाकीचा वेळ माझी बुद्धी कुठे-कुठे गेली. याला म्हटले जाते - एकमेकांसोबत उन्नती प्राप्त करणे. नोट करा किती वेळ बाबांची आठवण केली. बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) जी प्रॅक्टिस केली आहे ती सांगतात. आठवणीमध्ये तुम्ही एक तास पायी चाला तरीही पाय थकणार नाहीत. आठवणीने तुमची किती पापे नष्ट होतील. चक्राला तर तुम्ही जाणता, रात्रं-दिवस आता तुमच्या हेच बुद्धीमध्ये आहे की, आता आम्ही घरी जाणार आहोत. तुम्ही पुरुषार्थ करता; कलियुगी मनुष्यांना जरासुद्धा माहित नाही आहे - मुक्तीसाठी किती भक्ती करत राहतात. अनेक मते आहेत. तुम्हा ब्राह्मणांचे आहेच एक मत, जे ब्राह्मण बनतात, त्या सर्वांचे आहे श्रीमत. तुम्ही बाबांच्या श्रीमताने देवता बनता. देवतांचे कोणते श्रीमत नाहीये. श्रीमत आताच तुम्हा ब्राह्मणांना मिळते. ईश्वर आहेतच निराकार. जे तुम्हाला राजयोग शिकवतात, ज्याद्वारे तुम्ही आपले राज्य-भाग्य घेऊन किती श्रेष्ठ विश्वाचे मालक बनता. भक्ती मार्गाची वेद-शास्त्रे इत्यादी किती खंडीभर आहेत. परंतु कामाची फक्त एक गीताच आहे. ईश्वर येऊन राजयोग शिकवतात. त्यालाच गीता म्हटले जाते. आता तुम्ही बाबांकडून शिकता, ज्याद्वारे स्वर्गाचे राज्य मिळवता. जो शिकला त्याने घेतले. ड्रामामध्ये पार्ट आहे ना. ज्ञान ऐकविणारे ज्ञान-सागर एक बाबाच आहेत. ते ड्रामा प्लॅन अनुसार कलियुगाचा अंत आणि सतयुगाची आदि यांच्या संगमावरच येतात. कोणत्याही गोष्टीमध्ये गोंधळून जाऊ नका. बाबा यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) येऊन शिकवतात, इतर कोणीही शिकवू शकत नाही. हा (दादा) सुद्धा यापूर्वी जर कोणाकडून शिकला असता तर अजूनही बरेचजण त्याच्याकडून शिकले असते. बाबा तर म्हणतात - या गुरु इत्यादी सर्वांचा उद्धार करण्यासाठी मी येतो. आता तुम्हा मुलांचे एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे. आम्ही हे असे बनतो, ही आहेच नरापासून नारायण बनण्याची सत्य कथा. यांची मग भक्ती मार्गामध्ये महिमा होते. भक्तिमार्गाची परंपरा चालत येते. आता हे रावण राज्य संपुष्टात येणार आहे. तुम्ही आता दसरा इत्यादी ठिकाणी थोडेच जाल. तुम्ही तर समजावून सांगाल हे काय करत आहेत. हे तर छोट्यांचे काम आहे. मोठ-मोठ्या व्यक्ती बघण्यासाठी जातात. रावणाला कसे जाळतात, हा आहे तरी कोण, कोणीही सांगू शकत नाही. रावण राज्य आहे ना. दसरा इत्यादीला किती आनंद साजरा करतात, ज्यामध्ये रावणाला जाळत आले आहेत. दुःख देखील चालत आले आहे, काहीच समजत नाहीत. आता तुम्ही समजता आपण किती अडाणी होतो. रावण अडाणी बनवतो. आता तुम्ही म्हणता - ‘बाबा, आम्ही लक्ष्मी-नारायण जरूर बनणार. आम्ही काही कमी पुरुषार्थ थोडाच करू. ही एकच शाळा आहे, अभ्यास खूप सोपा आहे. म्हाताऱ्या माता अजून काहीच आठवण करू शकत नाहीत तर फक्त बाबांची आठवण करा. मुखाने ‘हे राम’ तर म्हणतात ना. बाबा हे खूप सोपे करून सांगतात - ‘तुम्ही आत्मा आहात, परमात्मा बाबांची आठवण करा तर तुमचा बेडा (जीवन रुपी नांव) पार होईल’. कुठे निघून जाल? शांतीधाम-सुखधामला. बाकी सर्वकाही विसरून जा. जे काही ऐकले आहे, वाचले आहे ते सर्वकाही विसरून स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर बाबांकडून जरूर वारसा मिळेल. बाबांच्या आठवणीनेच पापे नष्ट होतात. किती सोपे आहे. म्हणतात देखील - ‘भ्रकुटी के बीच चमकता है सितारा’. तर जरूर इतकी छोटी आत्मा असेल ना. डॉक्टर लोक आत्म्याला बघण्यासाठी खूप प्रयत्न करतात. परंतु ती अति सूक्ष्म आहे. हट्ट करून कोणीही पाहू शकत नाही. बाबा देखील असेच बिंदू आहेत. बाबा म्हणतात - ‘जसे तुम्ही साधारण आहात, मी देखील साधारण बनून तुम्हाला शिकवतो’. कोणाला काय माहित की यांना ईश्वर कसे शिकवत असतील. श्रीकृष्णाने शिकवले असते तर अगदी अमेरिका, जपान इत्यादी सगळीकडून आले असते. त्याच्यामध्ये (श्रीकृष्णाविषयी) इतके आकर्षण आहे. श्रीकृष्णावर प्रेम तर सर्वांचे आहे ना. आता तर तुम्ही मुले जाणता - हम सो (आपण तसे) बनत आहोत. श्रीकृष्ण आहे प्रिन्स, त्यांना मांडीवर घेऊ इच्छिता तर पुरुषार्थ करावा लागेल, काही मोठी गोष्ट नाहीये. बाबा आपल्या मुलांना स्वर्गाचा प्रिन्स, विश्वाचा मालक बनविण्यासाठी शिकवतात.

बाबा म्हणतात - ‘मुलांनो, शिक्षणाचे सार आहे - या दुनियेतील सर्व गोष्टींना सोडून द्या. असे कधीही समजू नका की आमच्याकडे करोड आहेत, लाख आहेत. काहीही हाती येणार नाही त्यामुळे चांगल्या रितीने पुरुषार्थ करा’. बाबांकडे येता तर बाबा तक्रार करतात की, ८ महिन्यांपासून येत आहात आणि बाबा ज्यांच्याकडून स्वर्गाची बादशाही मिळते त्यांना इतका वेळ भेटलात सुद्धा नाही. म्हणतात - बाबा, अमके काम होते. अरे, तू मेला असतास तर मग इथे कसा आला असतास! हे बहाणे थोडेच चालू शकतील. बाबा राजयोग शिकवत आहेत आणि तुम्ही शिकत नाही, ज्यांनी खूप भक्ती केली असेल त्यांना ७ दिवसच काय तर एका सेकंदातही तीर लागेल (ज्ञान काळजाला भिडेल). सेकंदामध्ये विश्वाचे मालक बनू शकता. हे स्वतः (ब्रह्मा बाबा) अनुभवी बसले आहेत, विनाश पाहिला, चतुर्भुज रूप पाहिले, बस्स, समजू लागले - ‘ओहो, मी विश्वाचा मालक बनतो’. साक्षात्कार झाला, उमंग आला आणि सर्वकाही सोडून दिले. इथे तुम्हा मुलांना माहित झाले बाबा आले आहेत, विश्वाची बादशाही देण्यासाठी. बाबा विचारतात - निश्चय कधी झाला? तर म्हणतात - ८ महिने. बाबांनी समजावून सांगितले आहे मुख्य गोष्ट आहे आठवण आणि ज्ञान. बाकी साक्षात्कार तर काही कामाचा नाही. बाबांना ओळखले तर मग अभ्यासाला लागा तर तुम्ही देखील असे बनाल. पॉईंट्स तर मिळतात जेणेकरून कोणालाही समजावून सांगू शकता. अतिशय गोड पद्धतीने समजावून सांगा. शिवबाबा जे पतित-पावन आहेत, ते म्हणतात- माझी आठवण करा तर पावन बनून पावन दुनियेचे मालक बनाल. युक्तीने सांगायचे आहे. तुमची इच्छा आहे ना - गॉड फादरने लिब्रेट करून स्वीट होमला परत घेऊन जावे. अच्छा, आता तुमच्यावर जी गंज चढलेली आहे त्यासाठी बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा’. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पहाटे उठून पायी चालत बाबांची आठवण करा, आपसात हीच गोड रुहरिहान करा की बघूया कोण किती वेळ बाबांची आठवण करतो, आणि मग आपला अनुभव ऐकवा.

२) बाबांना ओळखले आहे तर मग कोणताही बहाणा द्यायचा नाहीये, अभ्यासाला लागायचे आहे, मुरली कधीही मिस करायची नाही.

वरदान:-
सर्वांचे गुण बघत असतानाही स्वतःमध्ये बाबांच्या गुणांना धारण करणारे गुणमूर्त भव

संगमयुगावर जी मुले गुणांची माळा धारण करतात तेच विजयीमाळेमध्ये येतात त्यामुळे होलीहंस बनून सर्वांच्या गुणांना बघा आणि एका बाबांच्या गुणांना स्वतःमध्ये धारण करा, ही गुण-माळा सर्वांच्या गळ्यातच पडलेली असावी. जे जितके बाबांचे गुण स्वतःमध्ये धारण करतात तेवढी मोठी माळा त्यांच्या गळ्यामध्ये पडते. गुणमाळेचे स्मरण केल्याने स्वतः देखील गुणमूर्त बनतात. याचीच यादगार (आठवण) म्हणून देवतांच्या आणि शक्तींच्या गळ्यामध्ये माळा दाखवतात.

बोधवाक्य:-
साक्षीपणाची स्थितीच यथार्थ निर्णयाचे तख्त आहे.

अव्यक्त इशारे - आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-

अंतर्मुखी होऊन कार्य केल्याने विघ्नांपासून, व्यर्थ संकल्पांपासून वाचाल आणि वेळही खूप वाचेल. जे अंतर्मुखी राहतात त्यांच्यामध्ये स्मृतीची समर्थी देखील येते आणि आत्मा रुपी नेत्र शक्तिशाली बनतो; ज्यामुळे जर का कोणते विघ्न येणार असेल तर त्याची अगोदरच जाणीव होईल की, आज कोणतातरी पेपर होणार आहे आणि जितके आधीपासून माहित होत जाईल तर हुशार असल्याकारणाने सफलता मिळेल.