10-06-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला श्रीमतानुसार सर्वांना सुख द्यायचे आहे, तुम्हाला श्रेष्ठ मत
मिळते स्वतः श्रेष्ठ बनून दुसऱ्यांना श्रेष्ठ बनविण्याकरिता”
प्रश्न:-
दयाळू
मुलांच्या मनामध्ये कोणत्या विचाराची लाट येते? त्यांनी काय केले पाहिजे?
उत्तर:-
जी दयाळू मुले आहेत त्यांना इच्छा होते की आपण गावोगावी जाऊन सेवा करावी. आजकाल
बिचारे खूप दुःखी आहेत, त्यांना जाऊन आनंदाची बातमी सांगा की, विश्वामध्ये पवित्रता,
सुख आणि शांतीचे दैवी स्वराज्य स्थापन होत आहे, ही तीच महाभारत लढाई आहे, बरोबर
त्यावेळी सुद्धा बाबा होते, आता देखील बाबा आलेले आहेत.
ओम शांती।
गोड-गोड मुलांनो, इथे बसला आहात तर हे जरूर समजता की, आपण ईश्वरीय संतान आहोत. जरूर
स्वतःला आत्माच समजाल. शरीर आहे तेव्हाच तर त्याच्याद्वारे आत्मा ऐकते. बाबांनी हे
शरीर उधार घेतले आहे, तेव्हाच तर ऐकवतात. आता तुम्ही समजता आम्ही ईश्वरीय संतान
किंवा संप्रदाय आहोत मग आम्ही दैवी संप्रदाय बनणार. स्वर्गाचे मालक असतातच देवता.
आम्ही पुन्हा ५ हजार वर्षांपूर्वीप्रमाणे दैवी स्वराज्याची स्थापना करत आहोत. मग
आम्ही देवता बनू. यावेळी सर्व दुनिया, खास करून भारत आणि सर्वसाधारणपणे दुनिया,
सर्व मनुष्य एकमेकांना दुःखच देतात. त्यांना हे देखील ठाऊक नाहीये की सुखधाम सुद्धा
असते. परमपिता परमात्माच येऊन सर्वांना सुखी-शांत बनवतात. इथे तर घरा-घरात एकमेकांना
दुःखच देतात. साऱ्या विश्वामध्ये दुःखच दुःख आहे. आता तुम्ही मुले जाणता बाबा
आम्हाला २१ जन्मांसाठी सदा सुखी बनवत आहेत. केव्हापासून दुःख सुरू झाले आणि मग
केव्हा संपते, असे चिंतन इतर कोणाच्या बुद्धीमध्ये नसेल. तुमच्याच बुद्धीमध्ये हे
आहे की, आपण खरोखर ईश्वरीय संप्रदाय होतो, तसे तर सर्व दुनियेतील मनुष्य मात्र
ईश्वरीय संप्रदाय आहेत. प्रत्येक जण त्यांना ‘फादर’ असे म्हणून बोलावतात. आता मुले
जाणतात शिवबाबा आम्हाला श्रीमत देत आहेत. श्रीमत प्रसिद्ध आहे. सर्वश्रेष्ठ भगवंताचे
सर्वश्रेष्ठ मत आहे. गायले देखील जाते - ‘त्यांची गत-मत न्यारी’. शिवबाबांचे श्रीमत
आम्हाला कोणापासून कोण बनवते! स्वर्गाचा मालक. बाकीचे जे कोणी मनुष्यमात्र आहेत ते
तर नरकाचाच मालक बनवतात. आता तुम्ही आहात संगमावर, हा तर निश्चय आहे ना.
निश्चयबुद्धीच इथे येतात आणि समजतात बाबा आम्हाला पुन्हा सुखधामचा मालक बनवत आहेत.
आम्हीच १०० टक्के पवित्र गृहस्थमार्गवाले होतो. ही स्मृती आली आहे. ८४ जन्मांचा
सुद्धा हिशोब आहे ना. कोण-कोण किती जन्म घेतात. जे धर्म नंतर येतात, त्यांचे जन्म
देखील कमी असतात.
तुम्ही मुलांनी हा
निश्चय ठेवायचा आहे, आम्ही ईश्वरीय संतान आहोत. आम्हाला श्रेष्ठ मत मिळत आहे,
सर्वांना श्रेष्ठ बनविण्याकरिता. आमचे तेच बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. मनुष्य
समजतात की वेद-शास्त्र इत्यादी सर्व भगवंताला भेटण्याचे मार्ग आहेत आणि भगवान
म्हणतात - याद्वारे कोणीही मला भेटू शकत नाही. मीच येतो म्हणूनच तर माझी जयंती
सुद्धा साजरी करतात, परंतु कधी आणि कोणाच्या शरीरामध्ये येतो हे तुम्हा ब्राह्मणां
व्यतिरिक्त कोणीही जाणत नाही. आता तुम्हा मुलांनी सर्वांना सुख द्यायचे आहे.
दुनियेमध्ये सर्व एकमेकांना दुःख देतात. ते लोक हेच समजत नाहीत की, विकारामध्ये जाणे
म्हणजे दुःख देणे आहे. आता तुम्ही जाणता हे खूप भयंकर दुःख आहे. कुमारी जी पवित्र
असते तिला अपवित्र बनवतात. नरकवासी बनण्यासाठी केवढा सोहळा करतात. इथे तर असा गोंधळ
घालण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही खूप शांतीमध्ये बसला आहात. सर्व खूष होतात, साऱ्या
विश्वाला कायमचे सुखी बनवता. तुमचा मान शिव-शक्तींच्या रूपामध्ये आहे. तुमच्यापुढे
तर लक्ष्मी-नारायणाचा सुद्धा काहीच मान नाही. शिव-शक्तींचेच नाव मोठे आहे कारण जशी
बाबांनी सेवा केली आहे, सर्वांना पवित्र बनवून कायमचे सुखी बनवले आहे, तसे तुम्ही
देखील बाबांचे मदतगार बनला आहात, त्यामुळे तुम्हा शक्तींची, भारतमातांची महिमा आहे.
हे लक्ष्मी-नारायण तर राजा-राणी आणि प्रजा सर्व स्वर्गवासी आहेत. ती काही मोठी
गोष्ट आहे का! जसे ते स्वर्गवासी आहेत तसे इथले राजा-राणी सर्व नरकवासी आहेत. अशा
नरकवासींना तुम्ही स्वर्गवासी बनवता. मनुष्य तर काहीच जाणत नाहीत. अगदीच
तुच्छ-बुद्धी आहेत. काय-काय करत राहतात. किती युद्ध इत्यादी होत आहेत. प्रत्येक
गोष्टीमध्ये दुःखीच दुःखी आहेत. सतयुगामध्ये प्रत्येक बाबतीत सुखच सुख आहे. आता
सर्वांना सुख देण्यासाठीच बाबा श्रेष्ठ मत देतात. गातात देखील - ‘श्रीमत भगवानुवाच’.
‘श्रीमत मनुष्य उवाच’ नाहीये. सतयुगामध्ये देवतांना मत देण्याची आवश्यकताच नाही. इथे
तुम्हाला श्रीमत मिळते. बाबांसोबत तुम्ही देखील शिव-शक्ती म्हणून गायल्या जाता. आता
पुन्हा तोच पार्ट प्रॅक्टिकलमध्ये बजावला जात आहे. आता बाबा म्हणतात - तुम्हा
मुलांना मन्सा-वाचा-कर्मणा सर्वांना सुख द्यायचे आहे. सर्वांना सुखधामचा रस्ता
सांगायचा आहे. तुमचा उद्योगच हा आहे. चरितार्थासाठी पुरुषांना धंदा सुद्धा करावा
लागतो. म्हणतात - सायंकाळच्या वेळी देवता परिक्रमेसाठी निघतात, आता देवता इथे कुठून
येतील. परंतु या वेळेला शुभ वेळ म्हणतात. या वेळेला सर्वांना सवड सुद्धा मिळते.
तुम्हा मुलांना चालता-फिरता, उठता-बसता आठवण करायची आहे. बस्स, कोणा देहधारीची चाकरी
इत्यादी करायची नाहीये. बाबांचे तर गायन आहे - द्रौपदीचे पाय चेपले. याचा देखील
अर्थ समजत नाहीत. स्थूलमध्ये पाय चेपण्याची गोष्ट नाहीये. बाबांकडे वृद्ध बायका
इत्यादी खूप येतात, बाबा जाणतात भक्ती करून-करून थकल्या आहेत. अर्धे कल्प खूप त्रास
सहन केला आहे ना. म्हणून ही पाय चेपण्याची गोष्ट काढली आहे. आता श्रीकृष्ण पाय कसे
चेपेल? शोभेल का! तुम्ही श्रीकृष्णाला पाय चेपू द्याल? श्रीकृष्णाला बघताच त्याला
चिकटतील. त्याच्यामध्ये तर खूप आकर्षकपणा असतो. श्रीकृष्णाशिवाय दुसरी कोणती गोष्ट
बुद्धीमध्ये येतच नाही. तोच सर्वात तेजोमय आहे. श्रीकृष्ण बाळाने मग मुरली चालवली
ही गोष्टच पटत नाही. इथे तुम्ही शिवबाबांना कसे भेटाल? तुम्हा मुलांना बोलावे लागते,
शिवबाबांची आठवण करून मग यांच्याकडे (ब्रह्मा बाबांकडे) या. तुम्हा मुलांना तर आतून
आनंद झाला पाहिजे की, आम्हाला शिवबाबा २१ जन्मांसाठी सुखी बनवत आहेत. अशा बाबांवर
तर जीव ओवाळून टाकायला हवा. कोणी सपूत (लायक) मुले असतात तर वडिल त्यांच्यावर
कुर्बान जातात (जीव ओवाळून टाकतात). वडिलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. कोणी तर
अशीही मुले असतात जी वडिलांचा खून सुद्धा करवतात. इथे तर तुम्हाला मोस्ट बिलवेड (सर्वात
प्रिय) बनायचे आहे. कोणालाही दुःख द्यायचे नाही. जी दयाळू मुले आहेत त्यांना इच्छा
होते की, आपण गावोगाव जाऊन सेवा करावी. आजकाल बिचारे खूप दुःखी आहेत. त्यांना जाऊन
आनंदाची बातमी सांगा की विश्वामध्ये पवित्रता, सुख, शांतीचे दैवी स्वराज्य स्थापन
होत आहे, हे तेच महाभारत युद्ध आहे. बरोबर त्यावेळी बाबा सुद्धा होते. आत्ता देखील
बाबा आलेले आहेत. तुम्ही जाणता बाबा आम्हाला पुरुषोत्तम बनवत आहेत. हे आहेच
पुरुषोत्तम संगमयुग. तुम्ही मुले जाणता - आम्ही पुरुषोत्तम कसे बनतो. तुम्हाला
विचारतात - तुमचे उद्दिष्ट काय आहे? सांगा, मनुष्यापासून देवता बनणे. देवता तर
प्रसिद्ध आहेत. बाबा म्हणतात - जे देवतांचे भक्त आहेत त्यांना समजावून सांगा. भक्ती
सुद्धा सर्वात आधी तुम्ही शिवाची केलीत नंतर मग देवतांची सुरू केलीत. तर सर्वप्रथम
शिवबाबांच्या भक्तांना समजावून सांगायचे आहे. तुम्ही बोला की, ‘शिवबाबा म्हणतात -
माझी आठवण करा’. शिवाची पूजा करतात परंतु हे थोडेच लक्षात येते की पतित-पावन बाबा
आहेत. भक्तीमार्गामध्ये बघा किती खस्ता खातात. शिवलिंग तर घरी सुद्धा ठेवू शकता.
त्याची पूजा करू शकतात मग अमरनाथ, बद्रीनाथ इत्यादी ठिकाणी जाण्याची काय गरज आहे.
परंतु भक्तीमार्गामध्ये लोकांना जरूर खस्ता खायच्याच आहेत. तुम्हाला त्यातून
सोडवतात. तुम्ही आहात शिव शक्ती, शिव बाबांची मुले. तुम्ही बाबांकडून शक्ती घेता.
ती देखील मिळेल आठवणीने. विकर्म नष्ट होतील. पतित-पावन तर बाबा आहेत ना. आठवणीनेच
तुम्ही विकर्माजीत पावन बनता. सर्वांना हा रस्ता सांगायचा आहे, तुम्ही आता रामाचे
बनले आहात. रामराज्यामध्ये आहे सुख, रावण राज्यामध्ये आहे दुःख. भारतातच सर्वांची
चित्रे आहेत, ज्यांची इतकी पूजा होते. भरपूर मंदिरे आहेत. कोणी हनुमानाचा पुजारी तर
कोणी कोणाचा! याला म्हटले जाते अंधश्रद्धा. आता तुम्ही जाणता आम्ही सुद्धा आंधळे
होतो. यांना (ब्रह्माबाबांना) देखील ठाऊक नव्हते की, ब्रह्मा-विष्णू-शंकर कोण आहेत,
काय आहेत. जे पूज्य होते, तेच मग पुजारी बनले. सतयुगामध्ये आहेत पूज्य, इथे आहेत
पुजारी. बाबा किती चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. तुम्ही जाणता पूज्य असतातच
मुळी सतयुगामध्ये. इथे पुजारी आहेत तर पूजाच करतात. तुम्ही सर्व शिव-शक्ती आहात. आता
तुम्ही ना पुजारी आहात, ना पूज्य आहात. बाबांना विसरू नका. हे साधारण तन आहे ना.
यामध्ये उच्च ते उच्च भगवान येतात. तुम्ही बाबांना आपल्याकडे येण्यासाठी निमंत्रण
देता ना. बाबा या, आम्ही खूप पतित बनलो आहोत. जुन्या पतित दुनियेमध्ये, जुन्या
शरीरामध्ये येऊन आम्हाला पावन बनवा. मुले निमंत्रण देतात. इथे तर कोणीही पावन नाही.
जरूर सर्व पतितांना पावन बनवून घेऊन जातील ना. तर सर्वांना शरीर सोडावे लागेल ना.
मनुष्य शरीर सोडतात तेव्हा दुःखाने किती आरडा-ओरडा विलाप करतात. तुम्ही आनंदाने जाता.
आता तुमची आत्मा शर्यत लावते, बघू शिवबाबांची जास्त आठवण कोण करतो ते. शिवबाबांची
आठवण करता-करताच शरीर सुटले तर अहो सौभाग्य. जीवन नौकाच पार. सर्वांना बाबा म्हणतात
असा पुरुषार्थ करा. कोणी-कोणी संन्यासी सुद्धा असे असतात. ‘ब्रह्म’मध्ये लीन
होण्यासाठी अभ्यास करतात. आणि शेवटी मग असे बसल्या-बसल्या शरीर सोडतात. सन्नाटा होतो.
सुखाचे दिवस पुन्हा
येतील. यासाठीच तुम्ही पुरुषार्थ करता की बाबा, आम्ही तुमच्याजवळ येतो. तुमचीच आठवण
करता-करता जेव्हा आमची आत्मा पवित्र होईल तेव्हा तुम्ही आम्हाला सोबत घेऊन जाल.
पूर्वीच्या काळी जेव्हा काशी कलवट खात होते तेव्हा खूप प्रेमाने खात होते, ‘बस्स,
मी मुक्त होणार’, असे समजत होते. आता तुम्ही बाबांची आठवण करत शांतीधामला निघून जाता.
तुम्ही बाबांची आठवण करता तर या आठवणीच्या बळाने पापे नष्ट होतात, ते (दुनियावाले)
समजतात आमची पापे मग पाण्याने नष्ट होतील. मुक्ती मिळेल. आता बाबा समजावून सांगतात
- ते काही योगबल नाहीये, पापांची सजा खाता-खाता पुन्हा जाऊन जन्म घेतात, मग नव्याने
पापांचे खाते सुरू होते. बाबा बसून कर्म, अकर्म, विकर्मची गती समजावून सांगतात. राम
राज्यामध्ये कर्म अकर्म होतात, रावण राज्यामध्ये कर्म विकर्म होतात. तिथे कोणते
विकार इत्यादी असत नाहीत.
गोड-गोड फुलासारखी
मुले जाणतात - बाबा आम्हाला सर्व युक्त्या, सर्व रहस्ये समजावून सांगत आहेत. मुख्य
गोष्ट हीच आहे की, बाबांची आठवण करा. पतित-पावन बाबा तुमच्या समोर बसले आहेत, किती
निर्मान (विनम्र) आहेत. कसलाही अहंकार नाही, एकदम साधारण राहणीमान आहे. बापदादा
दोघेही मुलांचे सेवाधारी आहेत. तुमचे दोन सेवाधारी आहेत - सर्वोच्च शिवबाबा आणि
प्रजापिता ब्रह्मा. ते लोक त्रिमूर्ती ब्रह्मा म्हणतात. अर्थ थोडाच जाणतात.
त्रिमूर्ती ब्रह्मा काय करतात, काहीच माहीत नाहीये. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सदैव हा
निश्चय असावा की, आपण ईश्वरीय संतान आहोत, आम्हाला श्रेष्ठ मतावर चालायचे आहे.
कोणालाही दुःख द्यायचे नाहीये. सर्वांना सुखाचा रस्ता सांगायचा आहे.
२) सपूत बच्चा बनून
बाबांवर कुर्बान जायचे आहे, बाबांची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे. जसे बापदादा
निर्मान (विनम्र) आणि निरहंकारी आहेत, तसे बाप समान बनायचे आहे.
वरदान:-
स्व-उन्नतीद्वारे सेवेमध्ये उन्नत्ती करणारे सच्चे सेवाधारी भव
स्व-उन्नत्ती हा
सेवेच्या उन्नतीचा विशेष आधार आहे. स्व-उन्नती जर कमी असेल तर सेवा देखील कमी असते.
केवळ वाणीद्वारे कोणाला परिचय देणे एवढीच सेवा नाहीये परंतु प्रत्येक कर्माद्वारे
श्रेष्ठ कर्माची प्रेरणा देणे ही देखील सेवा आहे. जे मनसा-वाचा-कर्मणा सदैव
सेवेमध्ये तत्पर राहतात त्यांना सेवेद्वारा श्रेष्ठ भाग्याचा अनुभव होतो. जितकी सेवा
करतात तितके स्वतः देखील पुढे जातात. आपल्या श्रेष्ठ कर्माद्वारे सेवा करणारे सदैव
प्रत्यक्ष फळ प्राप्त करत राहतात.
बोधवाक्य:-
समीप
येण्याकरिता विचार करणे, बोलणे आणि करणे एक समान बनवा.
अव्यक्त इशारे -
आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-
एकाग्रतेचा आधार
अंतर्मुखता आहे. अंतर्मुखतेमध्ये राहिल्याने सूक्ष्म शक्तींच्या लीला अनुभव कराल.
आत्मिक स्थितीमध्ये राहून आत्म्यांचे आवाहन करणे, आत्म्यांशी रुह-रिहान करणे,
आत्म्यांच्या संस्कार-स्वभावाला परिवर्तन करणे, आत्म्यांचे बाबांशी कनेक्शन जोडून
देणे, अशा रुहानी लीलेचा अनुभव होईल.