11-06-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - आता तुम्हाला बेहदच्या पवित्रतेला धारण करायचे आहे, बेहदची पवित्रता
अर्थात एका बाबांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचीही आठवण येऊ नये”
प्रश्न:-
बाबांकडून
वारसा घेण्यापूर्वीचा पुरुषार्थ आणि त्याच्या नंतरची (वारसा मिळाल्यानंतरची) स्थिती
यामध्ये कोणते अंतर असते?
उत्तर:-
जेव्हा तुम्ही बाबांकडून वारसा घेता तेव्हा देहाच्या सर्व नात्यांना सोडून एका
बाबांचीच आठवण करण्याचा पुरुषार्थ करता आणि जेव्हा वारसा मिळतो तेव्हा (सतयुगामध्ये)
मग बाबांनाच विसरून जाता. आता वारसा घ्यायचा आहे त्यामुळे कोणाशीही नवीन नाते
जोडायचे नाही. नाहीतर विसरणे अवघड होईल. सर्व काही विसरून एकाची आठवण करा तर वारसा
मिळेल.
गीत:-
यह वक्त जा रहा
है…
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांप्रती बाबा समजावून सांगत आहेत - ज्ञानी कोणाला आणि अज्ञानी
कोणाला म्हटले जाते, हे फक्त तुम्ही ब्राह्मणच जाणता. ज्ञान आहे अभ्यास ज्याद्वारे
तुम्ही जाणले आहे की, आपण आत्मा आहोत, ते परमपिता परमात्मा आहेत. तुम्ही जेव्हा
तिथून मधुबन मध्ये येता तर पहिले स्वतःला जरूर आत्मा समजता. आम्ही जात आहोत आमच्या
बाबांजवळ. ‘बाबा’, शिवबाबांना म्हटले जाते, शिवबाबा आहेत प्रजापिता ब्रह्माच्या
तनामध्ये. ते देखील बाबा झाले. तुम्ही घरातून जेव्हा निघता तर असे समजता आम्ही
बापदादांकडे जात आहोत. तुम्ही चिठ्ठीमध्ये देखील लिहिता - “बापदादा” म्हणजे शिव’बाबा’
आणि ब्रह्मा ‘दादा’. आम्ही बाबांकडे जातो. बाबा कल्प-कल्प आम्हाला भेटतात. बाबा
आम्हाला बेहद पवित्र बनवून बेहदचा वारसा देतात. पवित्रतेमध्ये हद आणि बेहद आहे.
तुम्ही पुरुषार्थ करता बेहद पवित्र सतोप्रधान बनण्याकरिता. नंबरवार तर असतातच ना.
बेहद पवित्र अर्थात एका बेहदच्या बाबांशिवाय इतर कोणाचीही आठवण येऊ नये. ते बाबा
खूप गोड आहेत. उच्च ते उच्च भगवान आहेत आणि बेहदचे बाबा आहेत. सर्वांचे पिता आहेत.
तुम्हा मुलांनीच ओळखले आहे. बेहदचे बाबा कायम भारतातच येतात. येऊन बेहदचा संन्यास
करवून घेतात. संन्यास देखील महत्वाचा आहे ना, ज्याला वैराग्य म्हटले जाते. बाबा
आम्हाला संपूर्ण जुन्या विकारी दुनियेपासून वैराग्य येण्यासाठी प्रेरित करतात.
मुलांनो, यापासून बुद्धीचा योग काढून टाका. याचे नावच आहे नरक, दुःखधाम. स्वतः
देखील म्हणत असतात, कोणाचा मृत्यू झाला तर म्हणतात - स्वर्गवासी झाला, म्हणजे
नरकामधे होता ना. आता तुम्हाला समजते आहे हे जे म्हणतात ते देखील चुकीचे आहे.
स्वर्गवासी बनण्यासाठी बाबा आम्हाला जे बरोबर आहे तेच सांगतात. आताच पुरुषार्थ
करायचा असतो. स्वर्गवासी बनण्यासाठी देखील बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही पुरुषार्थ
करवून घेऊ शकत नाही. तुम्ही आता पुरुषार्थ करत आहात की आपण २१ जन्मांसाठी स्वर्गवासी
बनावे. बनविणारे आहेत बाबा. त्यांना म्हटलेच जाते - हेवनली गॉडफादर. स्वतः येऊन
म्हणतात - मुलांनो, मी तुम्हाला पहिले शांतीधाममध्ये घेऊन जाणार. मालक आहे ना.
शांतीधामला जाऊन नंतर मग येणार सुखधाममध्ये पार्ट बजावण्याकरिता. आपण जेव्हा
शांतीधामला जाऊ तेव्हा मग बाकी सर्व धर्मवाले सुद्धा शांतीधामला जातील. हे ड्रामाचे
पूर्ण चक्र बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. आपण सर्व शांतीधामला जाणार आणि मग आपणच सर्वात
आधी येऊन बाबांकडून वारसा घेतो. ज्यांच्याकडून वारसा घ्यायचा आहे त्यांची आठवण जरूर
करायची आहे. मुले जाणतात वारसा मिळाला की मग बाबांची आठवण विसरायला होईल. वारसा खूप
सहज रीतीने मिळतो. बाबा सन्मुख म्हणतात - ‘गोड मुलांनो, तुमची जी काही देहाची नाती
आहेत ती सर्व विसरा. आता कोणतेही नवीन नाते जोडायचे नाही. जर कोणतेही नाते जोडाल तर
त्याला विसरावे लागेल. जर समजा मुलगा किंवा मुलगी जन्माला आली तर ती देखील अडचणच
झाली. अजून एकाची आठवण वाढली ना. बाबा म्हणतात - सर्वांना विसरून एकाचीच आठवण करायची
आहे. तेच आपले माता, पिता, टीचर, गुरु इत्यादी सर्व काही आहेत, एका बाबांची मुले
आपण भाऊ-बहीणी आहोत. काका-मामा इत्यादींशी कोणतेही नाते नाही. ही एकच वेळ आहे जेव्हा
फक्त भाऊ-बहिणीचेच नाते असते. ब्रह्माची मुले शिवबाबांची सुद्धा मुले आहेत तर
नातवंडे देखील आहेत. हे तर बुद्धीमध्ये पक्के लक्षात राहते ना. नंबरवार पुरुषार्था
नुसार. तुम्ही मुले चालता-फिरता स्वदर्शन चक्रधारी बनता.
तुम्ही मुले यावेळी
चैतन्य लाइट-हाऊस आहात, तुमच्या एका डोळ्यामध्ये मुक्तिधाम, दुसऱ्या डोळ्यामध्ये
जीवनमुक्तिधाम आहे. ती लाइट हाऊस जड असतात, तुम्ही आहात चैतन्य. तुम्हाला ज्ञानाचा
तिसरा नेत्र मिळाला आहे. तुम्ही ज्ञानवान बनून सर्वांना रस्ता दाखवता. बाबा देखील
तुम्हाला शिकवत आहेत. तुम्ही जाणता - हे दुःखधाम आहे. आपण आता संगमावर आहोत. बाकी
सारी दुनिया कलियुगामध्ये आहे. संगमावर बाबा मुलांसोबत बसून गोष्टी करतात आणि मुलेच
इथे येतात. काही जण लिहितात - ‘बाबा, अमक्याला घेऊन येऊ? चांगला आहे गुण धारण करेल,
कदाचित तीर लागेल’. तर बाबांना देखील दया येते, असे होऊ शकते की कल्याण होईल. तुम्ही
मुले जाणता हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. या काळातच तुम्ही पुरुषोत्तम बनता.
कलियुगामध्ये सर्व आहेत कनिष्ठ पुरुष, जे उत्तम पुरुष लक्ष्मी-नारायणाला नमन करतात.
सतयुगामध्ये कोणीही कोणाला नमन करत नाहीत. इथल्या या सर्व गोष्टी तिथे असत नाहीत.
हे देखील बाबा समजावून सांगतात - चांगल्या रीतीने बाबांच्या आठवणीमध्ये राहून सेवा
कराल तर पुढे चालून तुम्हाला साक्षात्कार देखील करतील. तुम्ही कोणाची भक्ती वगैरे
करत नाही. तुम्हाला बाबा फक्त शिकवतात. घर बसल्या आपणच साक्षात्कार इत्यादी होत
राहतात. खूप जणांना ब्रह्माचा साक्षात्कार होतो, त्यांच्या साक्षात्कारासाठी काही
पुरुषार्थ करत नाहीत. बेहदचे बाबा यांच्याद्वारे साक्षात्कार घडवतात.
भक्तीमार्गामध्ये जी ज्याच्यामध्ये जशी भावना ठेवतात, त्याचा साक्षात्कार होतो. आता
तुमची भावना सर्वात उच्च ते उच्च बाबांमध्ये आहे. त्यामुळे बिना मेहनत बाबा
साक्षात्कार घडवत राहतात. सुरुवातीला किती ध्यानामध्ये जात होते, आपणहून आपसामध्ये
बसून ध्यानामध्ये जात होते. कोणती भक्ती थोडीच केली. मुले कधी भक्ती करतात काय? तो
जसा एक खेळ झाला होता, चला वैकुंठाला जाऊ. एकमेकांना बघत निघून जात होते, जे काही
पास्ट झाले ते सर्व पुन्हा रिपीट करतील. तुम्ही जाणता आपणच या धर्माचे होतो.
सतयुगामध्ये सर्वप्रथम हा धर्म आहे, यामध्ये खूप सुख आहे. मग हळूहळू कला कमी होत
जातात. जे सुख नवीन घरामध्ये असते ते जुन्यामध्ये नाही. थोड्या काळानंतर तो दिमाख
कमी होत जातो. स्वर्गामध्ये आणि नरकामध्ये तर खूप फरक आहे ना. कुठे स्वर्ग आणि कुठे
हा नरक! तुम्ही आनंदामध्ये राहता, हे देखील जाणता बाबांची आठवण देखील पक्की होईल.
आपण आत्मा आहोत - हेच विसरतात त्यामुळे मग देह-अभिमानामध्ये येतात. इथे बसले आहात
तर प्रयत्न करून स्वतःला आत्मा निश्चय करा. तर बाबांची आठवण देखील राहील. देहामध्ये
आल्यामुळे मग देहाची सर्व नाती आठवतील. हा एक नियम आहे. तुम्ही गाता देखील - ‘मेरा
तो एक दूसरा न कोई’. बाबा आम्ही बलिहार जाणार. ती वेळ आत्ता आहे, एकाचीच आठवण करायची
आहे. डोळ्यांनी भले कोणालाही बघा, हिंडा-फिरा फक्त आत्म्याने बाबांची आठवण करायची
आहे. शरीर निर्वाह अर्थ कर्म देखील करायचे आहे. परंतु हाताने काम करत असताना, मन
बाबांच्या आठवणीमध्ये रहावे, आत्म्याला आपल्या माशुकचीच आठवण करायची आहे. कोणाचे
एखाद्या मैत्रिणीवर प्रेम जडले तर मग तिचीच आठवण येऊ लागते. मग ती आसक्ती
तोडण्यासाठी खूप अडचणी येतात. मग बाबांनाच विचारतात - ‘बाबा, हे काय आहे!’ अरे,
तुम्ही नावा-रूपामध्ये का फसता. एक तर तुम्ही देह-अभिमानी बनता आणि दुसरे मग तुमचा
कोणता पास्टचा हिशोब आहे, तो धोका देतो. बाबा म्हणतात - या डोळ्यांनी जे काही बघता
त्यामध्ये बुद्धी जाऊ नये. तुमच्या बुद्धीमध्ये हेच असावे की आपल्याला शिवबाबा
शिकवत आहेत. अशी बरीच मुले आहेत जी इथे बसलेली असताना देखील कधीच बाबांची आठवण करत
नाहीत. बरेच जण तर इथे बसून देखील आठवणीमध्ये राहू शकत नाहीत. तर स्वतःला बघितले
पाहिजे - आपण शिवबाबांची आठवण किती केली? नाहीतर चार्टमध्ये नुकसान होईल.
भगवान म्हणतात - ‘गोड
मुलांनो, माझी आठवण करा. स्वतःकडे लिहून ठेवा, जेव्हा इच्छा असेल तेव्हा आठवणीमध्ये
बसा. जेवण करून चक्कर मारून दहा-पंधरा मिनिटे येऊन बसा आठवणीमध्ये कारण इथे कोणताही
गोरखधंदा तर नाही आहे. तरीही जे कामकाज सोडून आला आहात तर काहीजणांना त्याचीच आठवण
येत राहते. मोठे जबरदस्त ध्येय आहे, तेव्हाच तर बाबा म्हणतात - स्वतःचे परीक्षण करा.
हा तुमचा सर्वात मौल्यवान वेळ आहे. भक्तिमार्गामध्ये तुम्ही किती वेळ वाया घालवला
आहे. दिवसेंदिवस घसरतच राहता (पतनच होत राहते). श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला की
खूप आनंद होतो. मिळत तर काहीच नाही. बाबांचा वारसा तर एकदाच मिळतो, आता बाबा
म्हणतात - माझ्या आठवणीमध्ये रहा तर तुमची जन्म-जन्मांतरीची पापे नष्ट होतील.
स्वर्गाचा पासपोर्ट त्याच मुलांना मिळतो जे आठवणीमध्ये राहून आपल्या विकर्मांचा
विनाश करून कर्मातीत अवस्थेला प्राप्त करतात. नाहीतर खूप सजा खावी लागते. बाबा दुसरा
देखील सल्ला देतात - आपला मुकुट आणि तख्ताचा फोटो आपल्या खिशात ठेवा तर आठवण राहील.
यांच्याद्वारे आपण हे बनतो. जितके बघत रहाल तितकी आठवण कराल. मग त्यातच मन लागून
राहील. आपण असे बनत आहोत - नरापासून नारायण; चित्र पाहून आनंद होईल. शिवबाबांची
आठवण येईल. या सर्व पुरुषार्थाच्या युक्त्या आहेत. कोणालाही तुम्ही विचारा सत्य
नारायणाची कथा ऐकल्याने काय होते? आमचे बाबा आम्हाला सत्य नारायणाची कथा ऐकवत आहेत.
कसे ८४ जन्म घेतले आहेत, तो देखील हिशोब तर पाहिजे ना. सगळेच काही ८४ जन्म घेणार
नाहीत. दुनियेला तर काहीच माहिती नाही आहे, असेच तोंडाने फक्त बोलतात. याला (ज्ञानाला)
म्हटले जाते थिअरॉटिकल (सैद्धांतिक). हे आहे तुमचे प्रॅक्टिकल. आता जे काही होत आहे
त्याची मग भक्तीमार्गामध्ये पुस्तके इत्यादी बनतील. तुम्ही स्वदर्शन चक्रधारी बनून
विष्णुपुरीमध्ये येता. ही आहे नवीन गोष्ट. रावण राज्य - असत्य-खंड, मग सत्य-खंड
रामराज्य असेल. चित्रांमध्ये खूप क्लिअर आहे. आता या जुन्या दुनियेचा अंत आहे, ५०००
वर्षांपूर्वी देखील विनाश झाला होता. जे कोणी वैज्ञानिक आहेत त्यांना असा विचार येतो
की आमचा कोणी प्रेरक आहे, ज्यामुळे आम्ही हे सर्व करत राहतो. समजतात देखील आम्ही हे
सर्व केले तर यामुळे सगळे नष्ट होतील. परंतु परवश आहेत, भयभीत आहेत. समजतात - घर
बसल्या एक बॉम्ब टाकून नष्ट करु. विमान, पेट्रोल इत्यादीची देखील गरज भासणार नाही.
विनाश तर जरूर होणारच आहे. नवीन दुनिया सतयुग होती, क्राइस्टच्या ३ हजार
वर्षांपूर्वी स्वर्ग होता, आता पुन्हा स्वर्गाची स्थापना होत आहे. पुढे चालून
समजतील - तुम्ही जाणता स्थापना जरूर होणार आहे. यामध्ये तर एका आण्याची सुद्धा शंका
नाही.
हा ड्रामा कल्पापूर्वी
प्रमाणे चालत राहतो. ड्रामा जरूर पुरुषार्थ करवून घेईल. असे देखील नाही, जे
ड्रामामध्ये असेल ते होईल… असे विचारतात - पुरुषार्थ मोठा की प्रारब्ध मोठे?
पुरुषार्थ मोठा कारण पुरुषार्थाचेच प्रारब्ध बनते. पुरुषार्था शिवाय कधी कोणी राहू
शकत नाही. तुम्ही पुरुषार्थ करत आहात ना. कुठून-कुठून मुले येतात, पुरुषार्थ करतात.
म्हणतात - ‘बाबा, आम्ही विसरून जातो’. अरे, शिवबाबा तुम्हाला म्हणतात - ‘माझी आठवण
करा’, हे कोणाला म्हटले? मज आत्म्याला म्हटले. बाबा आत्म्यांशीच बोलतात. शिवबाबाच
पतित-पावन आहेत, ही आत्मा (ब्रह्मा बाबांची आत्मा) देखील त्यांच्याकडून ऐकते. तुम्हा
मुलांना हा पक्का निश्चय असला पाहिजे की, बेहदचे बाबा आपल्याला विश्वाचा मालक बनवत
आहेत. ते आहेत उच्च ते उच्च, सर्वात लाडके बाबा. भक्तिमार्गामध्ये त्यांचीच आठवण
करत होतो, गातात देखील - ‘तुमची गत-मत न्यारी’. तर जरूर मत दिले होते. आता तुमच्या
बुद्धीमध्ये आहे - इतके सर्व मनुष्य मात्र परत घरी जाणार. विचार करा किती आत्मे
आहेत, सर्वांची वंशावळी आहे. सर्व आत्मे पुन्हा नंबरवार जाऊन बसतील. क्लास
ट्रान्सफर होतो तेव्हा नंबरवार बसतात ना. तुम्ही देखील नंबरवार जाता. छोटा बिंदू (आत्मा)
नंबरवार जाऊन बसेल मग नंबरवार पार्टमध्ये येईल. ही आहे रुद्र माळा. बाबा म्हणतात -
इतक्या करोडो आत्म्यांची माझी माळा आहे. वरच्या बाजूला मी फूल आहे, मग पार्ट
बजावण्यासाठी सर्व इथेच आले आहेत. हा ड्रामा बनलेला आहे. म्हटले देखील जाते
पूर्वनियोजित ड्रामा. हा ड्रामा कसा चालतो तो तर तुम्हीच जाणता. सर्वांना हेच सांगा
की, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील आणि मग
तुम्ही निघून जाल. ही मेहनत आहे. सर्वाना रस्ता सांगायचा आहे, हे तुमचे कर्तव्य आहे.
तुम्ही काही कोणत्या देहधारीमध्ये अडकवत नाही. बाबा तर म्हणतात - ‘माझी आठवण करा तर
पापे भस्म होतील’. बाबा डायरेक्शन देतात तर ते करावे लागेल. विचारण्याची काय गरज आहे.
कसेही करून आठवण जरूर करा, यामध्ये बाबा कसली कृपा करतील. आठवण तुम्हाला करायची आहे,
वारसा तुम्हाला घ्यायचा आहे. बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत तर जरूर स्वर्गाचा वारसा
मिळणार. आता तुम्ही जाणता हे झाड जुने झाले आहे म्हणून या जुन्या दुनियेपासून
वैराग्य आहे. याला म्हटले जाते बेहदचे वैराग्य. ते हठयोगींचे आहे हदचे वैराग्य. ते
बेहदचे वैराग्य शिकवू शकत नाहीत. बेहदचे वैराग्यवाले मग हदचे वैराग्य कसे शिकवतील.
आता बाबा म्हणतात - ‘लाडक्या मुलांनो, तुम्ही देखील म्हणता किती प्रेमळ बाबा आहेत.
६३ जन्म बाबांची आठवण केली, बस्स, ‘माझे तर एक बाबा दुसरे कोणीही नाही’. अच्छा !
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
स्वर्गामध्ये जाण्याचा पासपोर्ट घेण्यासाठी बाबांच्या आठवणीने आपल्या विकर्मांचा
विनाश करून कर्मातीत अवस्था बनवायची आहे. सजेपासून वाचण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.
२) ज्ञानवान बनून
सर्वाना रस्ता सांगायचा आहे, चैतन्य लाइट हाऊस बनायचे आहे. एका डोळ्यामध्ये
शांतीधाम, दुसऱ्या डोळ्यामध्ये सुखधाम असावे. या दुःख-धामला विसरायचे आहे.
वरदान:-
प्रत्येक
आत्म्याला उन्नती करण्याच्या भावनेने रिगार्ड देणारे शुभ-चिंतक भव
प्रत्येक आत्म्या
प्रति श्रेष्ठ भावना अर्थात उन्नती करण्याची अथवा पुढे नेण्याची भावना ठेवणे अर्थात
शुभ-चिंतक बनणे. आपल्या शुभ वृत्तीद्वारे, शुभ चिंतकी स्थितीद्वारे इतरांच्या
अवगुणाला सुद्धा परिवर्तन करणे, कोणाचीही कमजोरी किंवा अवगुणाला आपली कमजोरी समजून
वर्णन करण्याऐवजी किंवा पसरविण्याऐवजी सामावून घेणे आणि परिवर्तन करणे हाच आहे
रिगार्ड. मोठ्या गोष्टीला छोटी बनवणे, निराश असणाऱ्याला शक्तिशाली बनविणे, त्यांच्या
संगाच्या रंगामध्ये न येणे, नेहमी त्यांना देखील उमंग-उत्साहामध्ये आणणे - हाच आहे
रिगार्ड. असे रिगार्ड देणारेच शुभचिंतक आहेत.
बोधवाक्य:-
जुना
स्वभाव-संस्कार त्यागाचे भाग्य नष्ट करणारा आहे, म्हणून त्याचा देखील त्याग करा.
अव्यक्त इशारे -
आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-
जसे ब्रह्मा बाबा
एकांतप्रिय असल्यामुळे कायम अंतर्मुखी राहिले, ‘मी आत्मा आहे, मी आत्मा आहे…’ हा
पाठ पक्का केला, ज्यामुळे ते स्वतः देखील सदैव शांती आणि सुखाच्या सागरामध्ये
सामावून राहिले आणि अन्य आत्म्यांना देखील आपल्या शुद्ध संकल्प आणि व्हायब्रेशन
द्वारे, वृत्ती आणि बोल द्वारे, संपर्काद्वारे शांतीची आणि सुखाची अनुभूती करवत
राहिले, असे फॉलो फादर करा.