13-06-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - या बेहदच्या खेळामध्ये तुम्ही आत्मा रुपी ॲक्टर पार्टधारी आहात, तुमचे
निवास स्थान आहे - स्वीट सायलेन्स होम, जिथे आता जायचे आहे”
प्रश्न:-
जे ड्रामाच्या
खेळाला यथार्थ रीतीने जाणतात, त्यांच्या मुखातून कोणते शब्द निघू शकणार नाहीत?
उत्तर:-
‘हे असे झाले नसते तर असे झाले असते…, असे व्हायला नको होते’ - असे शब्द ड्रामाचा
खेळ जाणणारे म्हणणार नाहीत. तुम्ही मुले जाणता हा ड्रामाचा खेळ उवे प्रमाणे फिरत
राहतो, जे काही होते सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे, काळजी करण्याचे काही कारण नाही.
ओम शांती।
बाबा जेव्हा आपला परिचय मुलांना देतात तेव्हा मुलांना स्वतःचा परिचय देखील मिळतो.
सर्व मुले बराच काळ देह-अभिमानी होऊन राहतात. देही-अभिमानी होतील तेव्हा बाबांचा
यथार्थ परिचय होईल. परंतु ड्रामामध्ये असे नाहीये. भले म्हणतात देखील ईश्वर गॉड
फादर आहेत, रचता आहेत, परंतु जाणत नाहीत. शिवलिंगाचे चित्र देखील आहे, परंतु इतके
मोठे तर ते नाही आहेत. योग्य रीतीने न जाणल्या कारणाने बाबांना विसरून जातात. बाबा
आहेत देखील रचता, जरूर रचतील देखील नवीन दुनिया, तर जरूर आम्हा मुलांना नवीन
दुनियेच्या राजधानीचा वारसा मिळाला पाहिजे. स्वर्गाचे नाव देखील भारतामध्ये
प्रसिद्ध आहे, परंतु काहीही समजत नाहीत. म्हणतात - अमका मेला स्वर्गात गेला. आता असे
कधी होते का. आता तुम्ही समजता आपण सर्व तुच्छ-बुद्धी होतो, नंबरवार तर म्हणणार ना.
मुख्य असणाऱ्यासाठीच हे स्पष्टीकरण दिले जाते की, मी यांच्यामध्ये (ब्रह्मा
बाबांमध्ये), अनेक जन्मवाल्या अंतिम शरीरामध्ये येतो. हे आहेत नंबर वन. मुले समजतात
- आता आपण त्यांची संतान ब्राह्मण बनलो. या सर्व आहेत समजून घेण्याच्या गोष्टी. बाबा
इतक्या काळापासून समजावून सांगतच राहतात. नाहीतर बाबांना ओळखणे सेकंदाची गोष्ट आहे.
बाबा म्हणतात - माझी आठवण कराल तर तुमची विकर्म विनाश होतील. निश्चय झाला की मग
कोणत्याही गोष्टीमध्ये प्रश्न इत्यादी उत्पन्न होऊ शकत नाही. बाबांनी सांगितले आहे
- तुम्ही पावन होता जेव्हा शांतीधाममध्ये होता. या गोष्टी देखील तुम्हीच बाबांकडून
ऐकता. दुसरे कोणी ऐकवू शकणार नाही. तुम्ही जाणता आपण आत्मे कुठले रहिवासी आहोत. जसे
नाटकातील ॲक्टर्स म्हणतील - आम्ही इथले रहिवासी आहोत कपडे बदलून स्टेजवर येतील. आता
तुम्ही समजता - आपण इथले रहिवासी नाही आहोत. ही एक नाटक शाळा आहे. हे आता
बुद्धीमध्ये आले आहे की आपण मूलवतनचे निवासी आहोत, ज्याला स्वीट सायलेन्स होम म्हटले
जाते. याचीच सर्वांना इच्छा असते कारण आत्मा दुःखी आहे ना. तर म्हणतात - आम्ही परत
घरी कसे जायचे. घराचा पत्ता माहित नसल्या कारणाने भटकत राहतात. आता तुम्ही
भटकण्यापासून सुटलात. मुलांना ठाऊक झाले आहे, आता तुम्हाला खरोखर घरी जायचे आहे. मी
आत्मा किती छोटा बिंदू आहे. हे देखील एक आश्चर्य आहे ज्याला प्रकृतीचा चमत्कार
म्हटले जाते. इतक्या छोट्या बिंदूमध्ये इतका पार्ट भरलेला आहे. परमपिता परमात्मा कसे
पार्ट बजावतात, हे देखील तुम्ही जाणता. सर्वात मुख्य पार्टधारी ते आहेत,
करन-करावनहार आहेत ना. तुम्हा गोड-गोड मुलांना हे आता लक्षात आले आहे की, आपण आत्मे
शांतीधाम मधून येतो. आत्मे काही नवीन थोडेच बनतात, जे शरीरामध्ये प्रवेश करतात. नाही.
आत्मे सर्व स्वीट होममध्ये राहतात. तिथून येतात पार्ट बजावण्याकरिता. सर्वांना
पार्ट बजावायचा आहे. हा खेळ आहे. हे सूर्य, चंद्र, तारे इत्यादी काय आहेत! हे सर्व
दिवे आहेत, ज्यामध्ये दिवस आणि रात्रीचा खेळ चालतो. बरेचजण म्हणतात - सूर्य देवताय
नमः, चंद्र देवताय नमः… परंतु खरे तर हे काही देवता नाही आहेत. या खेळाविषयी
कोणालाच माहिती नाहीये. सूर्य, चंद्राला देखील देवता म्हणतात. वास्तविक हे, या
साऱ्या विश्व नाटकासाठी दिवे आहेत. आम्ही रहिवासी आहोत स्वीट सायलेन्स होमचे. इथे
आपण पार्ट बजावत आहोत, हे उवे प्रमाणे (संथ गतीने) चक्र फिरत राहते, जे काही होते
ड्रामामध्ये नोंदलेले आहे. असे म्हणता कामा नये की, ‘असे झाले नसते तर असे झाले असते’.
हा तर ड्रामा आहे ना. उदाहरण आहे - जशी तुमची मम्मा होती, विचारही केला नव्हता ना
की सोडून जाईल. अच्छा, शरीर सोडले - ड्रामा. आता आपला नवीन पार्ट बजावत आहे. काळजी
करण्यासारखे काहीच नाही. इथे तुम्हा सर्व मुलांच्या बुद्धीमध्ये आहे आपण ॲक्टर्स
आहोत, हा जय आणि पराजयचा खेळ आहे. हा जय-पराजयचा खेळ मायेवर आधारित आहे. ‘माया से
हारे हार और माया से जीते जीत’. असे गातात तर सगळे परंतु बुद्धीमध्ये ज्ञान जरा
देखील नाहीये. तुम्ही जाणता माया काय चीज आहे, ही तर रावण आहे, जिला माया म्हटले
जाते. धनाला संपत्ती म्हटले जाते. धनाला माया म्हणणार नाही. मनुष्य समजतात
यांच्यापाशी खूप धन आहे. तर म्हणतात मायेचा नशा आहे. परंतु मायेचा नशा असतो का!
मायेला तर आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करतो. तर यामध्ये कोणत्याही गोष्टी विषयी संशय
उत्पन्न होऊ नये. कच्ची अवस्था असल्या कारणानेच संशय उत्पन्न होते. आता भगवानुवाच
आहे - कोणा प्रति? आत्म्यांप्रती. भगवान तर जरूर शिवच असायला हवेत जे आत्म्यांप्रती
म्हणतील. श्रीकृष्ण तर देहधारी आहे, ते आत्म्यांप्रती कसे म्हणतील. तुम्हाला कोणी
देहधारी ज्ञान ऐकवत नाहीत. बाबांना तर देह नाहीये. इतर सर्वांना तर देह आहे, ज्यांची
पूजा करतात त्यांची आठवण करणे सोपे आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकर यांना देवता म्हणणार.
शिव यांना भगवान म्हणतात. उच्च ते उच्च भगवान, त्यांना स्वतःचा देह नाही आहे. हे
देखील तुम्ही जाणता - जेव्हा तुम्ही आत्मे मूलवतनमध्ये होता तेव्हा तुम्हाला देह
होता? नाही. तुम्ही आत्मे होता. हे बाबा (ब्रह्मा बाबा) देखील आत्मा आहेत. केवळ ते
परम आहेत, यांचा पार्ट गायला गेला आहे (पार्टची महिमा आहे). पार्ट बजावून गेले आहेत,
तेव्हाच तर पूजा होते. परंतु एकही मनुष्य असा नाही ज्याला हे माहित असेल की, ५ हजार
वर्षांपूर्वी देखील परमपिता परमात्मा रचता आले होते, ते आहेतच हेवनली गॉडफादर. दर ५
हजार वर्षा नंतर कल्पाच्या संगमावर ते येतात, परंतु कल्पाचा कालावधी प्रदीर्घ
केल्याने सर्व काही विसरले आहेत. तुम्हा मुलांना बाबा बसून समजावून सांगतात, तुम्ही
स्वतः म्हणता - ‘बाबा, आम्ही तुम्हाला कल्प-कल्प भेटतो आणि तुमच्याकडून वारसा घेतो
आणि मग कसा गमावतो - हे बुद्धीमध्ये आहे. ज्ञान तर अनेक प्रकारचे आहे परंतु ज्ञानाचा
सागर भगवंतालाच म्हटले जाते. आता हे देखील सर्वजण समजतात की, विनाश होणार आहे जरूर.
अगोदर सुद्धा विनाश झाला होता. कसा झाला होता - हे कोणालाच माहिती नाही आहे.
शास्त्रांमध्ये तर विनाशाच्या बाबतीत काय-काय लिहून ठेवले आहे. पांडव आणि कौरवांचे
युद्ध कसे होऊ शकते!
आता तुम्ही ब्राह्मण
आहात संगमयुगावर. ब्राह्मणांचे तर कोणते युद्ध नाहीये. बाबा म्हणतात - तुम्ही माझी
मुले आहात नॉनव्हायलेन्स, डबल अहिंसक. आता तुम्ही निर्विकारी बनत आहात. तुम्हीच
बाबांकडून कल्प-कल्प वारसा घेता. यामध्ये कोणत्याही त्रासाची गोष्ट नाही. नॉलेज खूप
सोपे आहे. ८४ जन्मांचे चक्र तुमच्या बुद्धीमध्ये आहे. आता नाटक संपणार आहे, अजून
थोडा वेळ बाकी आहे. तुम्ही जाणता - आता अशी वेळ येणार आहे जे श्रीमंतांना सुद्धा
धान्य मिळणार नाही, पाणी मिळणार नाही. याला म्हटले जाते दुःखाचे डोंगर, रक्तरंजित
खेळ आहे ना. यामध्ये सर्व काही नष्ट होईल. कोणी चूक करतात तर त्यांना दंड मिळतो,
त्यांनी काय चूक केली आहे? केवळ एकच चूक केली आहे, जे बाबांना विसरून गेले आहेत.
तुम्ही तर बाबांकडून राजाई घेत आहात. बाकी मनुष्य तर समजतात मेलो की संपलो. थोडी जरी
महाभारत लढाई सुरु झाली तरी मरतील. तुम्ही तर मरूनही जिवंत राहता ना. तुम्ही या
शिक्षणाच्या बळाने ट्रान्सफर होऊन अमरलोकमध्ये जाता. शिक्षणाला सोर्स ऑफ इन्कम
म्हटले जाते. शास्त्रांचा देखील अभ्यास केला जातो, त्यातूनही इन्कम होते, परंतु ते
शिक्षण आहे भक्तीचे. आता बाबा म्हणतात - मी तुम्हाला या लक्ष्मी-नारायण सारखे बनवतो.
तुम्ही आता स्वच्छ-बुद्धी बनता. तुम्ही जाणता आता आपण सर्वश्रेष्ठ बनतो, मग
पुनर्जन्म घेत-घेत खाली उतरतो. नवीन पासून जुने होते. शिडी जरूर उतरावी लागेल ना.
आता सृष्टीची देखील उतरती कला आहे. चढती कला होती तेव्हा या देवतांचे राज्य होते,
स्वर्ग होता. आता नरक आहे. आता तुम्ही पुन्हा स्वर्गवासी बनण्याचा पुरुषार्थ करत
आहात. बाबा-बाबा करत राहता.
‘ओ गॉड फादर’ असे
म्हणून आळवत राहता परंतु हे थोडेच समजता की ते आत्म्यांचे पिता उच्च ते उच्च आहेत,
आपण त्यांची संतान मग दुःखी का आहोत? आता तुम्ही समजता दुःखी सुद्धा व्हायचेच आहे.
हा सुख आणि दुःखाचा खेळ आहे ना. जिंकण्यामध्ये सुख आहे, हारण्यामध्ये दुःख आहे.
बाबांनी राज्य दिले, रावणाने हिसकावून घेतले. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे
- बाबांकडून आम्हाला स्वर्गाचा वारसा मिळत राहतो. बाबा आलेले आहेत, आता फक्त बाबांची
आठवण करायची आहे तर पाप भस्म होतील. जन्म-जन्मांतरीचे डोक्यावर पापाचे ओझे आहे ना.
हे देखील तुम्ही जाणता, तुम्ही काही जास्त दुःखी होत नाही. थोडे सुख सुद्धा आहे -
पिठात मीठा प्रमाणे. ज्याला कागविष्ठा समान सुख म्हटले जाते. तुम्ही जाणता सर्वांचे
सद्गती दाता एक बाबाच आहेत. जगाचा गुरु देखील एकच आहे. वानप्रस्थ मध्ये गुरु केला
जातो. आता तर लहान मुलांना देखील गुरु बनवले जाते जेणेकरून जर मृत्यू झाला तर सद्गती
मिळेल. बाबा म्हणतात - वास्तविक कोणालाही गुरु म्हणू शकत नाही. गुरु तो जो सद्गती
देईल. सद्गती दाता तर एकच आहेत. बाकी क्राईस्ट, बुद्ध इत्यादी काही गुरु नाहीत. ते
येतात तेव्हा सर्वांना सद्गती मिळते का! क्राईस्ट आला, त्याच्या मागे जे कोणी त्या
धर्माचे होते ते सर्व येऊ लागले. मग जर का ते घेऊन येण्यासाठी निमित्त बनले आहेत तर
त्यांना गुरु कसे म्हणता येईल बरें. पतित-पावन एका बाबांनाच म्हटले जाते, तेच
सर्वांना परत घेऊन जाणारे आहेत. स्थापना देखील करतात, केवळ सर्वांना घेऊन जातील मग
तर प्रलय होईल. प्रलय तर होत नाही. सर्व शास्त्रमई शिरोमणी श्रीमद् भगवत गीता गायली
गेली आहे. गायन आहे - यदा यदाहि… भारतामध्येच बाबा येतात. स्वर्गाची बादशाही देणारे
बाबा आहेत त्यांना देखील सर्वव्यापी म्हणतात. आता तुम्हा मुलांना आनंद होतो की नवीन
दुनियेमध्ये संपूर्ण विश्वावर एक आमचेच राज्य असणार. त्या राज्याला कोणीही हिसकावून
घेऊ शकत नाही. इथे तर तुकड्या-तुकड्यासाठी आपसामध्ये किती भांडत राहतात. तुमची तर
मज्जा आहे. आनंदाने उड्या मारायच्या आहेत. कल्प-कल्प बाबांकडून आम्ही वारसा घेतो तर
किती आनंद झाला पाहिजे. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा’, तरीही विसरून जातात.
म्हणतात - ‘बाबा, योग तुटतो’. बाबांनी सांगितले आहे - ‘योग’ शब्द काढून टाका. तो तर
शास्त्रांमधला शब्द आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा. ‘योग’ भक्ती मार्गातील शब्द
आहे. बाबांकडून बादशाही मिळते स्वर्गाची, त्यांची तुम्ही आठवण केली नाहीत तर विकर्म
विनाश कशी होतील. राजाई कशी मिळेल. आठवण केली नाहीत तर पदाचा दर्जा देखील कमी होईल,
सजा सुद्धा खाल. एवढी सुद्धा अक्कल नाही. इतके मूर्ख बनले आहात. मी कल्प-कल्प
तुम्हाला सांगतो - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. जिवंतपणी या जगातून मरून जा.
बाबांच्या आठवणीने तुमची विकर्म विनाश होतील आणि तुम्ही विजयी माळेचा मणी बनाल. किती
सोपे आहे. उच्च ते उच्च शिवबाबा आणि ब्रह्मा दोघे हाइएस्ट आहेत. ते पारलौकिक आणि हे
अलौकिक. एकदम साधारण टीचर आहेत. ते (दुनियेतील) टीचर्स देखील चूक झाली तर शिक्षा
करतात, हे (बापदादा) तर प्रेम देत राहतात. म्हणतात - ‘गोड मुलांनो, बाबांची आठवण करा,
सतोप्रधान बनायचे आहे. पतित-पावन एक बाबाच आहेत. गुरु देखील तेच आहेत दुसरा कोणीही
गुरु असू शकत नाही. म्हणतात - बुद्ध पार निर्वाण गेले - या सर्व थापा आहेत. एकही
कोणी परत जाऊ शकत नाही. सर्वांचा ड्रामामध्ये पार्ट आहे. किती विशाल-बुद्धी आणि
आनंदात राहिले पाहिजे. वरपासून सारे ज्ञान बुद्धीमध्ये आहे. ब्राह्मणच ज्ञान घेतात.
हे ज्ञान ना शुद्रांना आहे, ना देवतांना आहे. आता ज्यांना समजून घ्यायचे आहे ते
समजून घेतील. जे समजून घेणार नाहीत त्यांचे मरण आहे. पद सुद्धा कमी होईल. स्कुलमध्ये
सुद्धा जेव्हा अभ्यास करत नाहीत तर पद कमी होते. अल्फ - बाबा, बे - बादशाही. आम्ही
पुन्हा आपल्या राजधानीमध्ये जात आहोत. ही जुनी दुनिया नष्ट होईल. अच्छा.
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबा
आम्हाला अशा नवीन विश्वाची राजाई देतात ज्याला कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही - या
आनंदामध्ये उड्या मारल्या पाहिजेत.
२) विजयी माळेचा मणी
बनण्यासाठी जिवंतपणी या जुन्या दुनियेमधून मरायचे आहे. बाबांच्या आठवणीने विकर्म
भस्म करायची आहेत.
वरदान:-
आपल्या
पॉवरफुल स्टेज द्वारे सर्वांच्या शुभ-कामनांना पूर्ण करणारे महादानी भव
मागाहून येणारे आत्मे
थोडेसे मिळाले तरी समाधानी होतील, कारण त्यांचा पार्टच कणा-दाणा घेण्याचा आहे. तर
अशा आत्म्यांना त्यांच्या भावनेचे फळ प्राप्त व्हावे, कोणीही वंचित राहू नये,
याकरिता आतापासूनच स्वतःमध्ये सर्व शक्तींना जमा करा. जेव्हा तुम्ही तुमच्या
संपूर्ण पॉवरफुल, महादानी स्टेजमध्ये स्थित व्हाल तेव्हा कोणत्याही आत्म्याला आपल्या
सहयोगाद्वारे, महादान देण्याच्या कर्तव्याच्या आधारे, शुभ भावनेचा स्विच ऑन करताच
नजरेने निहाल कराल.
बोधवाक्य:-
सदैव ईश्वरीय
मर्यादांवर चालत रहा, तर मर्यादा पुरुषोत्तम बनाल.
अव्यक्त इशारे -
आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-
जेव्हा सेवेच्या
स्टेजवर जाता तेव्हा असा अनुभव झाला पाहिजे की, हे आत्मे खूप काळापासून
अंतर्मुखतेच्या, रुहानियतच्या गुहेमधून बाहेर पडून सेवेसाठी आले आहेत. तपस्वी रूप
दिसून यावे. बेहदच्या वैराग्याच्या रेषा चेहेऱ्यावरून दिसून याव्यात. जितका पण
जास्त रुहाब (आत्मिक नशा) तितकाच अति दयाळूपणा. आताची ही वेळ अशा सेवेची आहे.