03-06-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - आता तुम्ही नवीन नात्यामध्ये जात आहात, म्हणून इथल्या कर्मबंधनी
नात्यांना विसरून, कर्मातीत बनण्याचा पुरुषार्थ करा”
प्रश्न:-
बाबा कोणत्या
मुलांची वाह-वाह करतात? सर्वात अधिक प्रेम कोणाला देतात?
उत्तर:-
बाबा गरीब मुलांची वाह-वाह करतात, वाह गरीबी वाह! आरामात दोन भाकऱ्या खायच्या आहेत,
लोभ नको. गरीब मुले बाबांची प्रेमाने आठवण करतात. बाबा अशिक्षित मुलांना पाहून
आनंदीत होतात कारण त्यांना शिकलेले विसरण्याची मेहनत करावी लागत नाही.
ओम शांती।
आता बाबांना मुलांप्रती रोज-रोज बोलण्याची आवश्यकता नाही की, स्वतःला आत्मा समजा.
आत्म-अभिमानी भव अथवा देही-अभिमानी भव… शब्द तर तेच आहेत ना. बाबा म्हणतात - स्वतःला
आत्मा समजा. आत्म्यामध्येच ८४ जन्मांचा पार्ट भरलेला आहे. एक शरीर घेतले, पार्ट
बजावला मग शरीर नष्ट होते. आत्मा तर अविनाशी आहे. तुम्हा मुलांना हे ज्ञान आताच
मिळते इतर कोणाला या गोष्टींची माहिती नाही. आता बाबा म्हणतात - जितके शक्य होईल
तितकी बाबांची आठवण करण्याचा प्रयत्न करा. काम-धंद्यामध्ये व्यस्त झाल्याने मग इतकी
आठवण राहत नाही. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र बनायचे आहे. मग
जितके शक्य होईल तितकी माझी आठवण करा. असे नाही की आपल्याला नेष्ठामध्ये (एका जागी
ध्यानामध्ये) बसायचे आहे. नेष्ठा शब्द सुद्धा चुकीचा आहे. खरे तर ही आहेच - आठवण.
कुठेही बसला असाल, बाबांची आठवण करा. मायेची वादळे तर खूप येतील. कोणाला काय आठवेल,
कोणाला काय. वादळे येतील जरूर मग त्यांना त्यावेळी शमवावे लागते की येऊ नयेत. इथे
बसल्या-बसल्या देखील माया खूप हैराण करत राहील. हेच तर युद्ध आहे. जितके हलके रहाल
तितकी बंधने कमी होतील. पहिली तर आत्मा निर्बंधन आहे, जेव्हा जन्म घेते तेव्हा
आपल्या आई-वडिलांमध्ये बुद्धी जाते, मग पत्नीला ॲडॉप्ट करतात, जी वस्तू समोर नव्हती
ती समोर येते, नंतर मुले जन्माला आली की मग त्यांची आठवण अशी आठवण वाढते. आता तुम्हा
सर्वांना हे विसरायचे आहे, एका बाबांची आठवण करायची आहे, म्हणूनच बाबांची महिमा आहे.
तुमचे माता-पिता इत्यादी सर्व काही तेच आहेत, त्यांचीच आठवण करा. ते तुम्हाला
भविष्यासाठी सर्व काही नवीन देतात. नवीन नात्यामध्ये घेऊन जातात. नाते तर तिथेही (सतयुगामध्येही)
असेल ना. असे तर नाही की काही प्रलय होतो. तुम्ही एक शरीर सोडून मग दुसरे घेता. जे
खूप चांगले-चांगले आहेत ते जरुर उच्च कुळामध्ये जन्म घेणार. तुम्ही शिकताच मुळी
भविष्य २१ जन्मांकरिता. शिक्षण पूर्ण झाले आणि प्रारब्ध सुरु होईल. शाळेमध्ये शिकून
पुढच्या क्लासमध्ये ट्रान्सफर होतात ना. तुम्ही देखील ट्रान्सफर होणार आहात -
शांतीधाम आणि नंतर सुखधाममध्ये. या छी-छी (विकारी) दुनियेमधून सुटाल. याचे नावच आहे
नरक. सतयुगाला म्हटले जाते स्वर्ग. इथे मनुष्य किती घोर अंधारामध्ये आहेत. जे
श्रीमंत आहेत ते समजतात आमच्यासाठी इथेच स्वर्ग आहे. स्वर्ग असतोच मुळी नवीन
दुनियेमध्ये. ही जुनी दुनिया तर विनाश होणार आहे. ज्यांची कर्मातीत अवस्था झालेली
असेल ते काही धर्मराजपुरीमध्ये सजा थोडेच भोगतील. स्वर्गामध्ये तर सजा असणारच नाही.
तिथे गर्भ देखील महाल असतो. कोणतीही दुःखाची गोष्ट नाही. इथे तर गर्भ जेल आहे जिथे
सजा भोगत राहतात. तुम्ही किती वेळा स्वर्गवासी बनता - याची आठवण कराल तरी देखील सारे
चक्र लक्षात राहील. एकच गोष्ट लाखों रुपयांची आहे. ती विसरल्याने, देह-अभिमानामध्ये
आल्याने माया नुकसान करते. हीच मेहनत आहे. मेहनतीशिवाय उच्च पद प्राप्त करू शकत नाही.
बाबांना म्हणतात - बाबा आम्ही अशिक्षित आहोत, काहीही येत नाही. बाबा तर आनंदीत
होतात कारण इथे तर शिकलेले सर्व विसरायचे आहे. हे तर थोड्या काळासाठी शरीर निर्वाह
इत्यादी करिता शिकायचे आहे. जाणता ना - हे सर्व नष्ट होणार आहे. जितकी होईल तितकी
बाबांची आठवण करायची आहे आणि आनंदाने भाकर-तुकडा खायचा आहे. वाह गरिबी या वेळेची.
आरामात भाकर-तुकडा खायचा आहे. लोभ नको. आजकाल धान्य मिळते कुठे आहे. साखर इत्यादी
सुद्धा हळू-हळू मिळणेच बंद होईल. असे नाही, तुम्ही ईश्वरीय सेवा करता म्हणून
तुम्हाला गव्हर्मेंट देईल. ते तर काहीच जाणत नाहीत. हां, मुलांना सांगितले जाते -
गव्हर्मेंटला समजावून सांगा की, आम्ही सर्व मिळून माता-पित्याकडे जात आहोत, त्यांना
मुलांसाठी टोली (प्रसाद) पाठवायची असते. इथे तर साफ सांगतात की नाहीये. लाचारीने
थोडीशी देतात. जसे फकिर लोकांना कोणी श्रीमंत असेल तर मूठी भरुन देईल. गरीब असेल तर
थोडेफार देईल. साखर इत्यादी येऊ शकते परंतु मुलांचा योग कमी पडतो. आठवण न
राहिल्याकारणाने, देह-अभिमानामध्ये आल्याकारणाने कोणतेही काम होऊ शकत नाही. हे काम
अभ्यासाने इतके होणार नाही जितके योगाने होईल. तो खूप कमी आहे. माया आठवणीला उडवून
लावते. रुस्तमला (पैलवानाला) आणखीनच चांगल्या रीतीने पकडते. चांगल्या-चांगल्या
फर्स्टक्लास मुलांवर सुद्धा ग्रहचारी (ग्रहदशा) बसते. ग्रहदशा बसण्याचे मुख्य कारण
योगाची कमी आहे. ग्रहदशा असल्या कारणानेच नावा-रुपामध्ये अडकून मरतात. हे मोठे
ध्येय आहे. जर खरे ध्येय प्राप्त करायचे असेल, तर आठवणीमध्ये रहावे लागेल.
बाबा म्हणतात -
ध्यानापेक्षाही ज्ञान चांगले. ज्ञानापेक्षाही आठवण चांगली. ध्यानामध्ये जास्ती
गेल्याने मायेच्या भुतांची प्रवेशता होते. असे बरेच आहेत जे फालतू ध्यानामध्ये
जातात. काय-काय बोलत असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. ज्ञान तर बाबांच्या मुरली
मधून मिळत असते. बाबा सावध करत राहतात. ध्यान काहीच कामाचे नाही. मायेची खूप
प्रवेशता होते. अहंकार येतो. ज्ञान तर सर्वांना मिळत असते. ज्ञान देणारे शिवबाबा
आहेत. मम्माला देखील इथूनच ज्ञान मिळत होते ना. त्यांना देखील बाबा म्हणतील -
मनमनाभव. बाबांची आठवण करा, दैवी गुण धारण करा. स्वतःला पहायचे आहे आपण दैवीगुण
धारण करत आहोत का? दैवी गुण इथेच धारण करायचे आहेत. कोणालाही बघा आता फर्स्टक्लास
अवस्था आहे, आनंदाने काम करत असताना, तासाभरानंतर क्रोधाचे भूत आले, आणि संपला.
उशीराने मग स्मृती येते, ही तर आपण चूक केली. मग सुधारतात. घडी-घडीची घड्याळे (घडोघडी
स्थिती बदलणारे) - बाबांपाशी खूप आहेत, आता पहाल तर खूप गोड, बाबा म्हणतील अशा
मुलांवर तर बलिहार जावे. तासाभरानंतर मग कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून क्रोधीत
होतात. क्रोध आला आणि केलेली सारी कमाई नष्ट झाली. आता-आता कमाई, आता-आता घाटा होतो.
सर्व काही आठवणीवर अवलंबून आहे. ज्ञान तर खूप सोपे आहे. छोटा मुलगा देखील समजावून
सांगेल. परंतु मी जो आहे, जसा आहे, ते यथार्थ रित्या जाणून घ्या. स्वतःला आत्मा
समजावे, या पद्धतीने छोटी मुले थोडीच आठवण करु शकतील. मनुष्यांना मरणाच्या वेळी
सांगितले जाते भगवंताची आठवण करा. परंतु आठवण करु शकणार नाहीत कारण यथार्थ रित्या
कोणीही जाणत नाहीत. कोणीही परत जाऊ शकत नाही. ना विकर्म विनाश होतील. परंपरेने
ऋषी-मुनी इत्यादी सर्व म्हणत आले आहेत की रचता आणि रचनेला आम्ही जाणत नाही. ते तर
तरीही सतोगुणी होते. मग आजचे तमोप्रधान बुद्धीवाले तरी कसे जाणू शकतील. बाबा
म्हणतात - हे लक्ष्मी-नारायण सुद्धा जाणत नाहीत. राजा-राणीच जर जाणत नसतील तर मग
प्रजा कशी जाणेल. कोणीही जाणत नाहीत. आता फक्त तुम्ही मुलेच जाणता. तुमच्यामध्ये
देखील काही आहेत जे यथार्थ रीतीने जाणतात, म्हणतात - बाबा, आम्ही वारंवार विसरतो.
बाबा म्हणतात - कुठेही जा फक्त बाबांची आठवण करा. खूप मोठी कमाई आहे. तुम्ही २१
जन्मांसाठी निरोगी बनता. अशा बाबांची अंतर्मुख होऊन आठवण केली पाहिजे ना. परंतु माया
विसरायला लावून वादळामध्ये घेऊन येते, यामध्ये अंतर्मुख होऊन विचार सागर मंथन करायचे
आहे. विचार सागर मंथन करण्याची गोष्ट देखील आताची आहे. हे आहे पुरुषोत्तम बनण्याचे
संगमयुग. हे देखील एक आश्चर्य आहे, तुम्ही मुलांनी बघितले आहे - एकाच घरामध्ये
तुम्ही म्हणता आम्ही संगमयुगी आहोत आणि हाफ पार्टनर (युगल) किंवा मुलगा इत्यादी
कलियुगी आहेत. किती फरक आहे. अति सूक्ष्म गोष्ट बाबा समजावून सांगत आहेत. घरामध्ये
रहात असताना देखील बुद्धीमध्ये आहे की आपण फूल बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. या
आहेत अनुभवाच्या गोष्टी. प्रॅक्टिकलमध्ये मेहनत करायची आहे. आठवण करण्याची मेहनत
करायची आहे. एकाच घरामध्ये एक हंस तर दुसरा बगळा. मग कोणी एकदम फर्स्टक्लास असतात.
कधी विकाराचा विचार देखील येत नाही. एकत्र रहात असून सुद्धा पवित्र राहतात, हिंमत
दाखवतात तर त्यांना किती उच्च पद मिळेल. अशी देखील मुले आहेत ना. काही तर बघा
विकारासाठी किती मारतात भांडण करतात, अवस्था अशी झाली पाहिजे जी संकल्पामध्ये देखील
कधी अपवित्र बनण्याचा विचार सुद्धा येऊ नये. बाबा अनेक प्रकारे सल्ला देत राहतात.
तुम्ही जाणता की, श्री श्री च्या मताने आम्ही श्री लक्ष्मी, श्री नारायण बनतो. श्री
म्हणजेच श्रेष्ठ. सतयुगामध्ये आहेत नंबर वन श्रेष्ठ. त्रेतामध्ये दोन डिग्री (दोन
कला) कमी होतात. हे ज्ञान तुम्हा मुलांना आताच मिळते.
या ईश्वरीय सभेचा
कायदा आहे - ज्यांना ज्ञान रत्नांची कदर आहे, कधी जांभई इत्यादी देत नाहीत त्यांना
पुढे समोर बसवायला हवे. काही-काही मुले बाबांच्या समोर बसून देखील डुलक्या काढतात,
जांभई देतात. त्यांनी मग मागे जाऊन बसले पाहिजे. ही ईश्वरीय सभा आहे मुलांची. परंतु
बऱ्याच ब्राह्मणी अशांना देखील घेऊन येतात, तसे तर बाबांकडून धन मिळते, एक-एक
वर्शन्स (महावाक्य) लाखों रुपयांचे आहे. तुम्ही जाणता ज्ञान मिळतेच मुळी संगमावर.
तुम्ही म्हणता बाबा आम्ही पुन्हा आलो आहोत बेहदचा वारसा घेण्यासाठी. गोड-गोड मुलांना
बाबा वारंवार समजावून सांगतात ही छी-छी दुनिया (विकारी दुनिया) आहे, तुमचे आहे
बेहदचे वैराग्य. बाबा म्हणतात या जुन्या दुनियेमध्ये तुम्ही जे काही बघता ते उद्या
असणार नाही. मंदिरे इत्यादींचे नामोनिशाण सुद्धा रहाणार नाही. तिथे स्वर्गामध्ये
त्यांना जुन्या वस्तू बघण्याची गरजच नाही. इथे तर जुन्या वस्तूंना किती किंमत आहे.
वास्तविक बाबा सोडून दुसऱ्या कोणत्याही वस्तूला काहीच किंमत नाही. बाबा म्हणतात -
‘मी आलोच नाही तर तुम्ही राजाई कशी घेणार’. ज्यांना माहित आहे तेच येऊन बाबांकडून
वारसा घेतात; म्हणून कोटींमध्ये कोणी म्हटले जाते. कोणत्याही गोष्टीमध्ये संशय येता
कामा नये. भोग इत्यादीचा देखील एक रीती-रिवाज आहे. याचा ज्ञान आणि योगाशी काहीही
संबंध नाही. इतर कोणत्याही गोष्टीशी तुमचा संबंध नाही. केवळ दोन गोष्टी आहेत - अल्फ
आणि बे, बादशाही. अल्फ भगवंताला म्हटले जाते. बोटाने देखील असा (वरच्या दिशेने)
इशारा करतात ना. आत्मा इशारा करते ना. बाबा म्हणतात भक्तीमार्गामध्ये तुम्ही माझी
आठवण करता. तुम्ही सर्व माझे आशिक आहात. हे देखील जाणता - बाबा कल्प-कल्प येऊन सर्व
मनुष्य मात्रांना दुःखातून सोडवून शांती आणि सुख देतात, तेव्हा बाबांनी सांगितले
होते की, असा बोर्ड लिहा की, ‘विश्वामध्ये शांती बेहदचे बाबा कशी स्थापन करत आहेत
ते येऊन समजून घ्या. एका सेकंदामध्ये विश्वाचा मालक २१ जन्मांसाठी बनायचे असेल तर
येऊन समजून घ्या’. घरामध्ये बोर्ड लावा, तीन पावले पृथ्वीवर तुम्ही मोठ्यात मोठे
हॉस्पिटल, युनिव्हर्सिटी उघडू शकता. आठवणीद्वारे २१ जन्मांसाठी निरोगी आणि अभ्यासाने
स्वर्गाची बादशाही मिळते. प्रजा देखील म्हणेल आम्ही स्वर्गाचे मालक आहोत. आज
मनुष्याना लाज वाटते कारण नरकवासी आहेत. स्वतः म्हणतात - ‘माझे वडील स्वर्गवासी झाले’,
तर नरकवासी आहेस ना. जेव्हा मरतील तेव्हा स्वर्गामध्ये जातील. किती सोपी गोष्ट आहे.
चांगले काम करणाऱ्यासाठी खास म्हणतात - हा खूप दानशूर होता. हा स्वर्गामध्ये गेला.
परंतु जात मात्र कोणीच नाही. नाटक जेव्हा पूर्ण होते तेव्हा सर्वजण स्टेजवर येऊन उभे
राहतात. हे युद्ध देखील तेव्हा सुरु होईल जेव्हा सगळे ॲक्टर्स इथे येतील मग निघून
जातील. ‘शिवाची वरात’ असे म्हणतात ना. शिवबाबांसोबत सर्व आत्मे जातील. मूळ गोष्ट आता
८४ जन्म पूर्ण झाले. आता या चपलाला (शरीराला) सोडायचे आहे. जसे साप जुनी कात टाकून
देतो आणि नवीन घेतो. तुम्ही नवीन खाल (शरीर) सतयुगामध्ये घेणार. श्रीकृष्ण किती
सुंदर आहे, त्याच्यामध्ये किती आकर्षण आहे. फर्स्ट क्लास शरीर आहे. असे आम्ही घेणार.
म्हटले जाते ना - आम्ही तर नारायण बनणार. ही तर सडलेली खराब कातडी आहे. ही सोडून
आम्ही नवीन दुनियेमध्ये जाणार. हे आठवून आनंद का होत नाही, जेव्हा म्हणता की, आम्ही
नरापासून नारायण बनणार! या सत्यनारायणाच्या कथेला चांगल्या रीतीने समजून घ्या. जे
म्हणता ते करुन दाखवा. सांगणे आणि करणे एक हवे. धंदा इत्यादी भले करा. बाबा म्हणतात
- हाताने काम करा, मन बाबांच्या आठवणीमध्ये रहावे. जितकी-जितकी धारणा करत जाल तितकी
तुमच्याकडे ज्ञानाची किंमत वाढत जाईल, नॉलेजच्या धारणेद्वारे तुम्ही किती श्रीमंत
बनता. हे आहे रुहानी नॉलेज (आत्मिक ज्ञान). तुम्ही आत्मा आहात, आत्माच शरीराद्वारे
बोलते. आत्माच ज्ञान देते. आत्माच धारणा करते. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या जुन्या
दुनियेतील जुन्या वस्तूंना दिसत असताना देखील बघायचे नाही. नरापासून नारायण
बनण्यासाठी ‘सांगणे’, ‘करणे’ एक समान बनवायचे आहे.
२) अविनाशी ज्ञान
रत्नांचा आदर ठेवायचा आहे, ही खूप मोठी कमाई आहे, यामध्ये जांभई किंवा डुलकी येता
कामा नये. नावा-रुपाच्या ग्रहचारी पासून वाचण्यासाठी आठवणीमध्ये राहण्याचा
पुरुषार्थ करायचा आहे.
वरदान:-
बाबांच्या
छत्रछायेखाली नाजूक परिस्थितींमध्ये देखील कमलपुष्प समान न्यारे आणि प्यारे भव
संगमयुगावर जेव्हा
बाबा सेवाधारी बनून येतात तेव्हा छत्रछायेच्या रूपामध्ये मुलांची सदैव सेवा करतात.
आठवण करताच सेकंदामध्ये सोबतीचा अनुभव होतो. ही आठवणीची छत्रछाया कोणत्याही नाजूक
परिस्थितींमध्ये कमलपुष्प समान न्यारे आणि प्यारे बनवते. मेहनत वाटत नाही. बाबांना
समोर आणल्याने, स्व स्थितीमध्ये स्थित झाल्याने कोणतीही परिस्थिती परिवर्तित होते.
बोधवाक्य:-
घटनांचा पडदा
मधे येऊ देऊ नका तर बाबांच्या सोबतीचा अनुभव होत राहील.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-
कोणत्याही
विघ्नापासून मुक्त होण्याची युक्ती आहे - सेकंदामध्ये स्वतःचे स्वरुप अर्थात आत्मिक
ज्योती स्वरूप स्मृतीमध्ये यावे आणि कर्मामध्ये निमित्त भाव असणारे स्वरुप - या डबल
लाइट स्वरुपामध्ये स्थित व्हा तर सेकंदामध्ये हाय जंप द्याल. कोणतेही विघ्न पुढे
जाण्यापासून तुम्हाला रोखू शकणार नाही.