04-06-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - आता तुम्ही श्रीमतावर सायलेन्सच्या अतिमध्ये जाता, तुम्हाला बाबांकडून
शांतीचा वारसा मिळतो, शांतीमध्ये सर्व काही येते”
प्रश्न:-
नवीन
दुनियेच्या स्थापनेचा मुख्य आधार काय आहे?
उत्तर:-
पवित्रता. बाबा जेव्हा ब्रह्मातनामध्ये येऊन नवीन दुनिया स्थापन करतात तेव्हा तुम्ही
आपसामध्ये भाऊ-बहीणी होता. स्त्री-पुरुषाचे भान निघून जाते. या अंतिम जन्मामध्ये
पवित्र बनता तर पवित्र दुनियेचे मालक बनता. तुम्ही आपणच आपल्या सोबत प्रतिज्ञा करता
- आम्ही भाऊ-बहीणी होऊन राहू. विकाराची दृष्टी ठेवणार नाही. एकमेकांना सावध करून
आमची उन्नती करू.
गीत:-
जाग सजनियां
जाग…
ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांनी गाणे ऐकले आणि बुद्धीमध्ये स्वदर्शन चक्र फिरू लागले. बाबा
देखील स्वदर्शन चक्रधारी म्हणून संबोधले जातात कारण सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला
जाणणे - हे आहे स्वदर्शनचक्रधारी बनणे. या गोष्टी बाबांशिवाय आणखी कोणीही समजावून
सांगू शकत नाही. तुम्हा ब्राह्मणांचे सर्व काही सायलेन्सवर अवलंबून आहे. सर्व
मनुष्य म्हणतात देखील - ‘शांतीदेवा, हे शांती देणारे…’ माहिती तर कोणालाच नाही आहे
की शांती कोण देतात अथवा शांतीधामला कोण घेऊन जातात. हे फक्त तुम्ही मुलेच जाणता,
ब्राह्मणच स्वदर्शनचक्रधारी बनतात. देवतांना काही स्वदर्शनचक्रधारी म्हणू शकत नाही.
किती रात्रं-दिवसाचा फरक आहे. बाबा तुम्हा मुलांना समजावून सांगतात, तुम्ही
प्रत्येकजण स्वदर्शनचक्रधारी आहात - नंबरवार पुरुषार्थानुसार. बाबांची आठवण करणे,
हीच मुख्य गोष्ट आहे. बाबांची आठवण करणे म्हणजे जणू शांतीचा वारसा घेणे आहे.
शांतीमध्ये सर्वकाही येते. तुमचे आयुष्य देखील वाढते, निरोगी काया देखील बनत जाते.
बाबांशिवाय दुसरा कोणीही स्वदर्शनचक्रधारी बनवू शकत नाही. आत्माच बनते. पिता देखील
आहेत कारण सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे. गाणे देखील ऐकलेत, आता नवीन दुनिया
स्थापन होत आहे. गाणी तर मनुष्यांनीच बनवली आहेत. बाबा बसून सार समजावून सांगतात.
ते आहेत सर्व आत्म्यांचे पिता, तर सर्व मुले आपसामध्ये भाऊ-भाऊ होतात. बाबा जेव्हा
नवीन दुनिया रचतात तर प्रजापिता ब्रह्माद्वारे तुम्ही भाऊ-बहीणी आहात, प्रत्येकजण
ब्रह्माकुमार-कुमारी आहेत, हे बुद्धीमध्ये राहिल्याने मग स्त्री-पुरुषाचे भान निघून
जाते. मनुष्य हे समजत नाहीत की आपण देखील वास्तवामध्ये भाऊ-भाऊ आहोत. मग बाबा रचना
रचतात तेव्हा भाऊ-बहीणी बनता. क्रिमिनल दृष्टी (विकारी दृष्टी) नाहीशी होते. बाबा
आठवण देखील करून देतात, तुम्ही बोलावत आला आहात - ‘हे पतित-पावन’, आता मी आलो आहे,
तुम्हाला म्हणतो - ‘हा अंतिम जन्म पवित्र रहा तर तुम्ही पवित्र दुनियेचे मालक बनाल’.
ही प्रदर्शनी तर तुमच्या घरा-घरांमध्ये असली पाहिजे कारण तुम्ही मुले ब्राह्मण आहात.
तुमच्या घरामध्ये ही चित्रे जरूर असली पाहिजेत. यावर समजावून सांगणे खूप सोपे आहे.
८४ चे चक्र तर बुद्धीमध्ये आहे. अच्छा - तुम्हाला एक ब्राह्मणी (टीचर) देतो. ती
येऊन सेवा करून जाईल. तुम्ही प्रदर्शनी उघडा. भक्तिमार्गामध्ये देखील कोणी
श्रीकृष्णाची पूजा अथवा मंत्र-तंत्र इत्यादी जाणत नाहीत त्यामुळे ब्राह्मणाला
बोलावतात. तो रोज येऊन पूजा करतो. तुम्ही देखील मागवू शकता. आहे तर खूप सोपे.
बाबांनी प्रजापिता ब्रह्मा द्वारा सृष्टी रचली असेल तर जरूर ब्रह्माकुमार-कुमारी
बहीण-भाऊ बनले असतील. प्रतिज्ञा करतात - ‘आम्ही दोघेही भाऊ-बहीणी बनून राहू,
विकाराची दृष्टी ठेवणार नाही. एकमेकांना सावध करून उन्नती करू. मुख्य आहेच आठवणीची
यात्रा. ते लोक विज्ञानाच्या बळावर किती उंचावर जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु वरती
काही दुनिया थोडीच आहे. हे आहे विज्ञानाच्या अति मध्ये जाणे. आता तुम्ही
श्रीमतानुसार सायलेन्सच्या अति मध्ये जाता. त्यांचे आहे सायन्स, इथे तर तुमचा आहे
सायलेन्स. मुले जाणतात आत्मा तर स्वत: शांत स्वरूप आहे. या शरीराद्वारे फक्त पार्ट
बजावायचा असतो. कर्माशिवाय तर कोणी राहू शकत नाही. बाबा म्हणतात - स्वतःला
शरीरापासून वेगळे आत्मा समजून बाबांची आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. खूपच
सोपे आहे, सर्वात जास्त जे माझे भक्त अर्थात शिवाचे पुजारी आहेत, त्यांना समजावून
सांगा. सर्वश्रेष्ठ पूजा आहे शिवाची कारण तेच सर्वांचे सद्गती दाता आहेत.
आता तुम्ही मुले जाणता
बाबा आले आहेत सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी. आपल्या वेळेनुसार आपण देखील ड्रामा
अनुसार कर्मातीत अवस्थेला प्राप्त करणार आणि मग विनाश होईल. खूप पुरुषार्थ करायचा
आहे की आपण आत्म्यांनी सतोप्रधान बनावे. बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे, ‘श्रीमद्
भगवत गीता’ असे म्हणतात, किती मोठी महिमा आहे. देवतांची देखील महिमा गातात -
‘सर्वगुण संपन्न, संपूर्ण निर्विकारी…’ बाबाच येऊन संपूर्ण पावन बनवतात. जेव्हा
दुनिया संपूर्ण पतित बनते तेव्हाच बाबा येऊन संपूर्ण पावन दुनिया बनवितात. सर्व
म्हणतात आम्ही भगवंताची मुले आहोत तर जरूर स्वर्गाचा वारसा असला पाहिजे. प्रजापिता
ब्रह्मा द्वारे आपण आता भाऊ-बहीणी बनलो आहोत. कल्पापूर्वी देखील बाबा आले होते,
शिवजयंती साजरी करतात. जरूर प्रजापिता ब्रह्माची मुले बनले असतील. बाबांकडे
प्रतिज्ञा करतात - ‘बाबा, आम्ही आपसामध्ये कंपेनियन बनून पवित्र राहतो. तुमच्या
डायरेक्शनवर चालतो. कोणती मोठी गोष्ट नाहीये. आता हा अंतिम जन्म आहे, हा मृत्यूलोक
नष्ट होणार आहे. आता तुम्ही हुशार बनले आहात. कोणी स्वतःला भगवान म्हणाले, तर
सांगाल - भगवान तर सर्वांचा सद्गती दाता आहे. मग हे स्वतःला कसे म्हणू शकतात. परंतु
असे समजतात ड्रामाचा खेळ आहे.
बाबा तुम्हा मुलांना
स्वदर्शनचक्रधारी बनवत आहेत. बाबा म्हणतात - आता सेवेवर तत्पर रहा. घरोघरी प्रदर्शनी
उघडा. यासारखे महान पुण्य आणखी कोणते नाही. कोणाला बाबांचा रस्ता सांगणे, यासारखे
कोणते दान नाही. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर पापे नष्ट होतील.
बाबांना बोलावता देखील - ‘हे पतित-पावन, लिब्रेटर, गाईड या’. तुमचे देखील नाव पांडव
म्हणून गायले गेले आहे. बाप देखील पंडा (मार्गदर्शक) आहेत. सर्व आत्म्यांना घेऊन
जातील. ते आहेत देहधारी पंडे. हे आहेत रूहानी. ती शरीराची यात्रा, ही रूहानी यात्रा.
सतयुगामध्ये शरीराची यात्रा भक्तीमार्गाची असत नाही. तिथे तुम्ही पूज्य बनता, आता
बाबा तुम्हाला किती हुशार बनवत आहेत. तर बाबांच्या मतावर चालले पाहिजे ना. कोणताही
संशय इत्यादी असेल तर विचारले पाहिजे. आता बाबा म्हणतात - गोड-गोड मुलांनो,
देही-अभिमानी बना. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. तुम्ही माझी लाडकी मुले
आहात ना. अर्ध्या कल्पाचे तुम्ही आशिक आहात. एकाचीच अनेक नावे ठेवली आहेत, कित्ती
नावे, कित्ती मंदिरे बनवतात. मी आहे तर एकच. माझे नाव आहे - ‘शिव’. मी ५०००
वर्षांपूर्वी भारतामध्येच आलो होतो. मुलांना ॲडॉप्ट केले होते. आता देखील ॲडॉप्ट
करत आहेत. ब्रह्माची मुले असल्या कारणाने तुम्ही नातवंडे झालात. इथे वारसा मिळतोच
आत्म्याला. यामध्ये भाऊ-बहीण असण्याचा प्रश्न येत नाही. आत्माच शिकते, वारसा घेते.
सर्वांना अधिकार आहे. तुम्ही मुले या जुन्या दुनियेमध्ये जे काही पाहता ते सर्व
नष्ट होणार आहे. महाभारत लढाई देखील बरोबर आहे. बेहदचे बाबा बेहदचा वारसा देत आहेत.
बेहदचे नॉलेज ऐकवत आहेत. तर त्याग देखील बेहदचा पाहिजे. तुम्ही जाणता कल्पापूर्वी
देखील बाबांनी राजयोग शिकवला होता, राजस्व अश्वमेध यज्ञ रचला होता; मग राज्य
करण्यासाठी सतयुगी नवीन दुनिया जरूर पाहिजे. जुन्या दुनियेचा विनाश देखील झाला होता.
५००० वर्षांची गोष्ट आहे ना. हीच लढाई लागली होती, ज्यामुळे गेट उघडले होते.
बोर्डावर देखील लिहा - स्वर्गाचे द्वार कसे उघडत आहे - येऊन समजून घ्या. तुम्ही
समजावून सांगू शकत नसाल तर दुसऱ्यांना बोलावू शकता. मग हळू-हळू वृद्धी होत जाईल.
तुम्ही किती असंख्य ब्राह्मण-ब्राह्मणी आहात प्रजापिता ब्रह्माची मुले आहात. वारसा
मिळतो शिवबाबांकडून. तेच सर्वांचे पिता आहेत. एवढे तरी बुद्धीमध्ये चांगल्या रीतीने
लक्षात ठेवले पाहिजे - आपण ब्राह्मण सो देवता बनत आहोत. आपणच देवता होतो मग चक्र
फिरलो. आम्ही आता ब्राह्मण बनलो आहोत मग विष्णुपुरीमध्ये जाणार. खूपच सोपे ज्ञान आहे.
परंतु कोटी मध्ये कोणी निघतात. प्रदर्शनीमध्ये किती असंख्य येतात, कोणी मुश्किलीने
निघतात, कोणी तर फक्त महिमा करतात - खूप चांगले आहे, आम्ही जरूर येऊ. कोणी विरळेच
सात दिवसांचा कोर्स करतात, सात दिवसांची गोष्ट सुद्धा आताची आहे. गीतेचा पाठ देखील
सात दिवस ठेवतात. सात दिवस तुम्हाला देखील भट्टीमध्ये बसायचे आहे स्वतःला आत्मा
समजून बाबांची आठवण केल्याने सारा कचरा निघून जाईल. अर्ध्या कल्पाचा घाणेरडा रोग
देह-अभिमानाचा आहे, तो काढायचा आहे. देही-अभिमानी बनायचे आहे. सात दिवसांचा कोर्स
काही मोठा थोडाच आहे. कोणाला सेकंदामध्ये सुद्धा तीर लागू शकतो. उशिराने येणारे पुढे
जाऊ शकतात. म्हणतील - ‘आम्ही शर्यत करून बाबांकडून वारसा घेणारच. बरेचजण तर
जुन्यांपेक्षाही तीव्र गतीने पुढे जातात कारण चांगले-चांगले पॉईंट्स, तयार माल मिळतो.
प्रदर्शनी इत्यादी समजावून सांगण्यामध्ये किती सोपे होते. स्वतः समजावून सांगू शकत
नसाल तर बहिणीला बोलावून घ्या. रोज येऊन कथा करून जा. ५ हजार वर्षांपूर्वी या
लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, जे १२५० वर्षे चालले. किती छोटी कहाणी आहे. आपण सो
देवता होतो मग आपण सो क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनलो. आपण आत्मा ब्राह्मण बनलो, ‘हम
सो’चा अर्थ किती युक्तियुक्त समजावून सांगतात. विराट रूप देखील आहे, परंतु त्यामध्ये
ब्राह्मणांना आणि शिवबाबांना काढून टाकले आहे. अर्थ काहीच समजत नाहीत. आता तुम्हा
मुलांना मेहनत करायची आहे, आठवणीची. आणखी कोणत्या संशयामध्ये येता कामा नये.
विकर्माजीत बनून उच्च पद मिळवायचे असेल तर हे चिंतन संपवून टाकायचे आहे की, ‘हे का
होते, हा असे का करतो’. या सर्व गोष्टींना सोडून एकच चिंतन रहावे की, आम्हाला
तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे. जितके बाबांची आठवण कराल तितके विकर्माजीत
बनून उच्च पद प्राप्त कराल. बाकी फालतू गोष्टी ऐकून आपले डोके खराब करून घ्यायचे
नाही. या सर्व गोष्टींपेक्षा एक मुख्य गोष्ट आहे - ती विसरायची नाही. कोणासोबत वेळ
वाया घालवू नका. तुमचा वेळ खूप किमती आहे. वादळांना घाबरायचे नाही. खूप अडचणी येतील,
घाटा होईल. परंतु बाबांची आठवण कधीही विसरायची नाही. आठवणीनेच पावन बनायचे आहे,
पुरुषार्थ करून उच्च पद मिळवायचे आहे. हे वृद्ध बाबा (ब्रह्मा बाबा) इतके उच्च पद
मिळवतात, आपण का नाही बनणार. हे देखील शिक्षण आहे ना. यामध्ये तुम्हाला कोणतेही
पुस्तक इत्यादी घेण्याची आवश्यकता नाही. बुद्धीमध्ये संपूर्ण कहाणी आहे. किती छोटी
कहाणी आहे. सेकंदाची गोष्ट आहे, जीवनमुक्ती सेकंदामध्ये मिळते. मूळ गोष्ट आहे -
बाबांची आठवण करणे. बाबा जे तुम्हाला विश्वाचा मालक बनवतात त्यांना तुम्ही विसरता!
म्हणतात - सगळे राजा थोडेच बनतील. अरे, तुम्ही सर्वांचा विचार कशाला करता! शाळेमध्ये
ही काळजी करतात का की सगळे थोडेच स्कॉलरशिप मिळवणार? अभ्यास करायला लागतील.
प्रत्येकाच्या पुरुषार्थावरून समजून येते की, हे काय पद मिळवणार आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) ही वेळ
अतिशय किमती आहे, याला फालतू गोष्टींमध्ये गमवायचे नाही. कितीही वादळे येवोत,
नुकसान होवो परंतु बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे.
२) तमोप्रधानापासून
सतोप्रधान बनण्याचेच चिंतन करायचे आहे, आणखी कोणतेही चिंतन चालू नये. ‘हम सो’, ‘सो
हम’ची छोटीशी कहाणी युक्तीने समजून घ्यायची आहे आणि इतरांना समजावून सांगायची आहे.
वरदान:-
मग्न
अवस्थेच्या अनुभवाद्वारे मायेला आपला भक्त बनविणारे मायाजीत भव मग्न अवस्थेचा अनुभव
करण्यासाठी स्वतःच्या अनेक टायटल्स किंवा स्वरूप, अनेक गुणांचे शृंगार, अनेक
प्रकारच्या खुशीचे, रूहानी नशेचे, रचता आणि रचनेच्या विस्ताराचे पॉईंट्स,
प्राप्तींचे पॉईंट्स स्मृतीमध्ये ठेवा जे तुम्हाला आवडेल त्यावर मनन करा तर मग्न
अवस्था सहजच अनुभव होईल. मग कधी परवश होणार नाही, माया कायमसाठी नमस्कार करेल.
संगमयुगाचा पहिला भक्त माया बनेल. जेव्हा तुम्ही मायाजीत मास्टर भगवान बनाल तेव्हा
माया भक्त बनेल.
बोधवाक्य:-
तुमचे उच्चारण
आणि आचरण ब्रह्मा बाप समान असावे तेव्हा म्हणणार खरे ब्राह्मण.
अव्यक्त इशारे -
आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:- निरंतर आठवणीमध्ये
राहण्याचे सोपे साधन आहे - प्रवृत्तीमध्ये राहून पर-वृत्तीमध्ये राहणे. पर-वृत्ति
अर्थात आत्मिक रूप. अशा आत्मिक रूपामध्ये राहणारा सदैव न्यारा आणि बाबांचा लाडका
असेल. काहीही करेल परंतु असे वाटेल जसे काम केले नाही परंतु खेळ केला आहे. हे रूहानी
नेत्र, ही रूहानी मूर्त असे दिव्य दर्पण बनेल ज्या दर्पणामध्ये प्रत्येक आत्मा बिना
मेहनत आत्मिक स्वरूपच बघेल.