05-06-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बेहदच्या सुखाकरिता तुम्हाला बेहदचे नॉलेज मिळते, तुम्ही पुन्हा राजयोगाच्या शिक्षणाने राज्य घेत आहात”

प्रश्न:-
तुमचे ईश्वरीय कुटुंब कोणत्या गोष्टीमध्ये अगदीच निराळे आहे?

उत्तर:-
या ईश्वरीय कुटुंबामध्ये कुणी एक दिवसाचा मुलगा आहे, कोणी आठ दिवसांचा परंतु सर्वजण शिकत आहेत. बाबाच टीचर बनून आपल्या मुलांना शिकवत आहेत. ही आहे निराळी गोष्ट. आत्मा शिकते. आत्मा म्हणते - ‘बाबा’; मग बाबा मुलांना ८४ जन्मांची गोष्ट ऐकवतात.

गीत:-
दूरदेश का रहने वाला…

ओम शांती।
वृक्षपति वार, याचे नाव ठेवले आहे बृहस्पती. हे उत्सव इत्यादी तर वर्षानुवर्षे साजरे करतात. तुम्ही दर आठवड्याला बृहस्पती दिवस साजरा करता. वृक्षपती अथवा या मनुष्यसृष्टी रुपी झाडाचा जो बीजरूप आहे, चैतन्य आहे, तेच या झाडाच्या आदि-मध्य-अंताला जाणतात, बाकीचे जे काही वृक्ष आहेत ते सर्व जड असतात. हे आहे चैतन्य, याला म्हटले जाते कल्पवृक्ष. याची आयु आहे ५ हजार वर्षे आणि हा वृक्ष चार भागांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक गोष्ट चार भागामध्ये असते. ही दुनिया देखील चार भागामध्ये आहे. आता या जुन्या दुनियेचा अंत आहे. दुनिया किती मोठी आहे, हे ज्ञान कोणत्याही मनुष्यमात्राच्या बुद्धीमध्ये नाहीये. हे आहे नवीन दुनियेसाठी नवीन शिक्षण. आणि मग नव्या दुनियेचा राजा बनण्यासाठी अथवा आदि सनातन देवी-देवता बनण्यासाठी शिक्षण देखील नवीन आहे. भाषा तर हिंदीच आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे जेव्हा दुसरी राजाई स्थापन होते तेव्हा त्यांची भाषा वेगळी असते. सतयुगामध्ये कोणती भाषा असेल? ते तर मुले थोडे-थोडे जाणतात. पूर्वी मुली ध्यानामध्ये जाऊन सांगत असत. तिथे काही संस्कृत भाषा नाहीये. संस्कृत तर इथे आहे ना. जी इथे आहे ती मग तिथे असू शकत नाही. तर मुले जाणतात हे आहेत वृक्षपती. त्यांना झाडाचे फादर रचता देखील म्हणतात. हे आहेत चैतन्य बीजरूप. ती सर्व असतात जड. मुलांनी सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला देखील जाणून घेतले पाहिजे ना. यावेळी ज्ञान नसल्याकारणाने मनुष्यांना सुख नाही आहे. हे आहे बेहदचे ज्ञान, ज्याने बेहदचे सुख मिळते. हदच्या ज्ञानाने कागविष्ठेसमान सुख मिळते. तुम्ही जाणता, आम्ही आता बेहदच्या सुखासाठी पुन्हा पुरुषार्थ करत आहोत. हा ‘पुन्हा’ शब्द फक्त तुम्ही ऐकता. तुम्हीच पुन्हा मनुष्यापासून देवता बनण्यासाठी हे राजयोगाचे शिक्षण घेत आहात. हे देखील तुम्ही जाणता ज्ञानाचा सागर बाबा निराकार आहेत. निराकार इतर मुले आत्मे देखील आहेत, परंतु सर्वांना आपले-आपले शरीर आहे, याला अलौकिक जन्म म्हटला जातो. इतर कोणीही मनुष्य असा जन्म घेऊ शकत नाहीत. जसे हे (शिवबाबा) घेतात आणि यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) देखील वानप्रस्थ अवस्थेमध्ये प्रवेश करतात. मुलांना (आत्म्यांना) सन्मुख बसून समजावून सांगतात, इतर कोणीही आत्म्यांना ‘मुलांनो, मुलांनो’ असे म्हणू शकत नाही. कोणत्याही धर्माचा असो - जाणतात शिवबाबा आम्हा आत्म्यांचे पिता आहेत, तर ते जरूर ‘मुलांनो, मुलांनो’ असेच म्हणणार. दुसऱ्या कोणत्याही मनुष्य आत्म्याला ईश्वर म्हणू शकत नाही, बाबा म्हणू शकत नाही. तसे तर गांधीजींना देखील बापूजी म्हणत असत. म्युन्सिपाल्टीच्या मेयरला (महापौरला) देखील फादर म्हणतात. परंतु ते सर्व फादर आहेत देहधारी. तुम्ही जाणता आम्हा आत्म्यांचे पिता आम्हाला शिकवत आहेत. बाबा वारंवार सांगतात स्वतःला आत्मा समजा. ते बाबा येऊन शिकवतात देखील आत्म्यांनाच. हे आहे ईश्वरीय कुटुंब. बाबांची इतकी असंख्य मुले आहेत. तुम्ही देखील म्हणता - ‘बाबा, आम्ही तुमचे आहोत’. तुम्ही मुले झालात. मुले म्हणतात - ‘बाबा, मी एक दिवसाचा मुलगा आहे, आठ दिवसांचा मुलगा आहे, महिन्याचा मुलगा आहे. सुरुवातीला जरूर लहानच असेल. भले दोन-चार दिवसांचा बच्चा आहे परंतु देह तर मोठा आहे ना. म्हणून सर्व मोठ्या मुलांना शिक्षण हवे. जे कोणी येतात सर्वांना बाबा शिकवतात. तुम्ही देखील शिकता. बाबांची मुले बनलात की मग बाबा तुम्हाला तुम्ही ८४ जन्म कसे घेतलेत ते समजावून सांगतात. बाबा म्हणतात - मी देखील अनेक जन्मांच्या अंताला यांच्यामध्ये प्रवेश करतो आणि मग शिकवतो. मुले जाणतात इथे आपण मोठ्यात-मोठ्या टीचरकडे आलो आहोत. ज्यांच्याद्वारेच मग हे टीचर्स तयार झाले आहेत ज्यांना पंडे म्हटले जाते. ते देखील सर्वांना शिकवत राहतात. जे-जे माहित होत जाईल, शिकवत राहतील.

सर्वप्रथम तर हेच समजावून सांगायचे आहे, दोन पिता आहेत ना. एक अलौकिक आणि दुसरे पारलौकिक. मोठे जे आहेत ते जरूर पारलौकिक पिता झाले, ज्याला भगवान म्हटले जाते. तुम्ही जाणता आता आपल्याला पारलौकिक पिता मिळाले आहेत, हे इतर कोणालाच माहीत नाहीये. हळूहळू समजत जातील. तुम्ही मुले जाणता आम्हा आत्म्यांना बाबा शिकवत आहेत. आम्ही आत्मेच एक शरीर सोडून मग दुसरे घेऊ. उच्च ते उच्च देवता बनू. उच्च ते उच्च बनण्यासाठी आलो आहोत. बरीच मुले चालता-चालता उच्च ते उच्च शिक्षणाला सोडून देतात, कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये संशय येतो किंवा मायेचे कोणते वादळ सहन करू शकत नाहीत, काम महाशत्रूकडून हार खातात, याच कारणांमुळे शिक्षण सोडून देतात. काम महाशत्रूमुळेच मुलांना खूप सहन करावे लागते. बाबा म्हणतात - कल्प-कल्प तुम्ही अबला, माताच मला बोलावता. म्हणतात - ‘बाबा, आम्हाला विवस्त्र होण्यापासून वाचवा’. बाबा म्हणतात - ‘आठवणीशिवाय अजून दुसरा कोणताही रस्ता नाही. आठवणीनेच बळ मिळत जाईल. बलवान मायेची ताकद कमी होत जाईल. मग तुम्ही मुक्त व्हाल. असे बरेचजण बंधनातून सुटका करून इथे येतात. मग अत्याचार होणे बंद होते आणि मग येऊन शिवबाबांशी ब्रह्मा द्वारे गप्पा मारतात. ही देखील सवय लागली पाहिजे. बुद्धीमध्ये हे राहिले पाहिजे की, आपण शिवबाबांकडे जातो. ते या ब्रह्मातनामध्ये येतात. आम्ही शिवबाबांच्या समोर बसलो आहोत. आठवणीनेच विकर्म विनाश होतील. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. हीच शिकवण मिळते. बाबांना भेटायला याल तेव्हा देखील स्वतःला आत्मा समजा. आत्म-अभिमानी भव. हे ज्ञान देखील तुम्हाला आता मिळते. ही आहे मेहनत. त्या भक्तीमार्गामध्ये तर किती वेद-शास्त्रे इत्यादीचे पठण करत असतात. ही तर एकच मेहनत आहे - फक्त आठवणीची. हे खूप सोप्यात सोपे आहे, खूप कठीण ते कठीण सुद्धा आहे. बाबांची आठवण करणे - याच्यापेक्षा सोपी गोष्ट कोणतीच नाही. बाळ जन्माला आले आणि त्याच्या तोंडातून ‘बाबा-बाबा’ शब्द निघेल. मुलीच्या तोंडून ‘आई’ शब्द निघेल. आत्म्याने स्त्रीचे शरीर धारण केले आहे. मुलगी आईकडेच जाईल. मुलगा जास्त करून वडिलांची आठवण करतो कारण वारसा मिळतो. आता तुम्ही आत्मे तर सर्व संतान आहात. तुम्हाला वारसा मिळतो बाबांकडून. आत्म्याला बाबांकडून वारसा मिळतोच मुळी आठवण केल्याने. देह-अभिमानी असाल तर वारसा मिळवण्यामध्ये अडचण येईल. बाबा म्हणतात - मी मुलांनाच शिकवतो. मुले देखील जाणतात आम्हा मुलांना बाबा शिकवतात. या गोष्टी बाबांशिवाय कोणीही सांगू शकणार नाही. भक्तिमार्गामध्ये त्यांच्यावरच तुमचे प्रेम होते. तुम्ही सर्व आशिक होता त्या माशुकचे. सर्व दुनिया आशिक आहे एका माशुकची. परमात्म्याला सर्व परमपिता देखील म्हणतात. बाबांना आशिक म्हटले जात नाही. बाबा समजावून सांगतात की, तुम्ही भक्तिमार्गामध्ये आशिक होता. आता देखील अनेक आहेत, परंतु परमात्मा कोणाला म्हणावे, यामध्ये खूप गोंधळून जातात. गणेश, हनुमान इत्यादींना परमात्मा म्हणून सुताचा एकदम गुंता केला आहे. हे त्या एकाशिवाय इतर कोणीही ठीक करू शकत नाही. कोणाचीच ताकद नाही. बाबाच येऊन मुलांना समजावून सांगतात. मुले मग नंबरवार पुरुषार्थानुसार समजतात आणि समजावून सांगण्याच्या लायक बनतात. राजधानी स्थापन होत आहे. हुबेहुब कल्पापूर्वी प्रमाणे तुम्ही इथे शिकता. मग प्रारब्ध नवीन दुनियेमध्ये मिळवाल; त्याला अमरलोक म्हटले जाते. तुम्ही काळावर विजय प्राप्त करता. तिथे कधी अकाली मृत्यू होत नाही. नावच आहे स्वर्ग. तुम्हा मुलांना या अभ्यासाने खूप आनंद झाला पाहिजे. बाबांच्या आठवणीने बाबांची प्रॉपर्टी देखील आठवेल. सेकंदामध्ये पूर्ण ड्रामाचे ज्ञान बुद्धीमध्ये येते. मूलवतन, सूक्ष्मवतन, स्थूलवतन, ८४ चे चक्र बस्स, हे नाटक सर्व भारतावरच बनलेले आहे. बाकी सर्व आहेत बाय-प्लॉट (उप-कथा). बाबा ज्ञान देखील तुम्हालाच ऐकवतात. तुम्हीच उच्च ते उच्च मग नीच बनला आहात. डबल सिरताज राव (डबल मुकुटधारी श्रीमंत) आणि मग अगदीच रंक (एकदम गरीब). आता भारत गरीब भिकारी आहे. प्रजेचे प्रजेवर राज्य आहे. सतयुगात होते डबल सिरताज महाराजा-महाराणीचे राज्य. सर्वजण मानतात आदि देव ब्रह्माला अनेक नावे दिली आहेत. महावीर देखील त्यांना म्हणतात, महावीर हनुमानाला देखील म्हणतात. वास्तविक तुम्ही मुलेच खरे-खुरे महावीर हनुमान आहात कारण तुम्ही इतके योगामध्ये राहता ज्यामुळे मायेची कितीही वादळे येवो परंतु तुम्हाला हलवू शकत नाही. तुम्ही महावीरची मुले महावीर बनला आहात कारण तुम्ही मायेवर विजय मिळवता. ५ विकार रुपी रावणावर प्रत्येकजण विजय मिळवतो. काही एका मनुष्याची गोष्ट नाहीये. तुम्हा प्रत्येकाला धनुष्य तोडायचे आहे अर्थात मायेवर विजय प्राप्त करायचा आहे. यामध्ये युद्ध इत्यादीची काही गोष्ट नाही. युरोपवासी कसे लढतात, भारतामध्ये कौरव आणि यादवांचे युद्ध आहे. गायले देखील आहे रक्ताच्या नद्या वाहतात. दुधाच्या सुद्धा नद्या वाहतील. विष्णूला क्षीरसागरामध्ये दाखवतात, लक्ष्मी-नारायण आहेत पारसनाथ. त्यांचे मग नेपाळमध्ये ‘पशुपती’ नाव ठेवले आहे. आहेत एकाच विष्णूची दोन रूपे, पारसनाथ, पारसनाथिनी. ते आहेत पशुपतीनाथ पती, पशुपतीनाथ पत्नी. त्यामध्ये विष्णूचे चित्र बनवतात. तलाव सुद्धा बनवतात. आता तलावामध्ये क्षीर (दूध) कुठून आले. सणाच्या दिवशी त्या तलावामध्ये दूध ओतले जाते, आणि मग दाखवतात क्षीरसागरामध्ये विष्णू पहुडला आहे. अर्थ काहीच नाही. ४ भुजावाला मनुष्य तर कोणी असतही नाही.

आता तुम्ही मुले सोशल वर्कर आहात, रुहानी पित्याची मुले आहात ना. बाबा सर्व गोष्टी समजावून सांगतात, यामध्ये कोणताही संशय येता कामा नये. संशय अर्थात मायेचे वादळ. तुम्ही मला बोलवताच मुळी, ‘हे पतित-पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा’. बाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुम्ही पावन बनाल’. ८४ च्या चक्राची देखील आठवण करायची आहे. बाबाना म्हटले जाते पतित-पावन, ज्ञानाचा सागर, दोन गोष्टी झाल्या. पतितांना पावन बनवतात आणि ८४ च्या चक्राचे ज्ञान सांगतात. हे देखील तुम्ही मुले जाणता ८४ चे चक्र फिरतच राहील, याचा अंत नाहीये. हे देखील तुम्ही नंबरवार पुरुषार्थानुसार जाणता - बाबा किती गोड आहे, त्यांना पतींचाही पती असे देखील म्हणतात. पिता देखील आहेत. आता बाबा म्हणतात - माझ्याकडून तुम्हा मुलांना खूप जबरदस्त वारसा मिळतो. परंतु अशा मज पित्याला देखील सोडचिठ्ठी देतात. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे, शिक्षणच सोडून देतात. म्हणजे जणू सोडचिठ्ठी देतात, किती मूर्ख आहेत. जी बुद्धिमान मुले आहेत ती लगेचच सर्व गोष्टींना समजून घेऊन दुसऱ्यांना शिकवू लागतील. ते त्वरित निर्णय घेतील की त्या शिक्षणाने काय मिळते आणि या शिक्षणाने काय मिळते. कोणते शिक्षण घेतले पाहिजे. बाबा मुलांना विचारतात आणि मुले समजतात देखील की हे शिक्षण खूप चांगले आहे. तरी देखील म्हणतात - ‘काय करू, भौतिक शिक्षण नाही घेतले तर मित्र-नातलग इत्यादी नाराज होतील’. बाबा म्हणतात - दिवसेंदिवस वेळ खूप कमी होत जातो. इतके शिक्षण मग शिकू शकणार नाही. खूप जोरात तयारी सुरु आहे. सर्व प्रकारे तयारी केली जाते ना. दिवसेंदिवस एकमेकांमधील शत्रुत्व वाढत जाते. म्हणतात देखील - अशा काही गोष्टी बनवल्या आहेत ज्याने एका फटक्यात सर्वांना खलास करून टाकू. तुम्ही मुले जाणता ड्रामा नुसार आता युद्ध सुरु होऊ शकत नाही, राजाई स्थापन होणार आहे तोपर्यंत आम्ही देखील तयारी करत आहोत. ते देखील तयारी करत राहतात. मागाहून तुमचा खूप प्रभाव दिसून येणार आहे. गायले देखील जाते - ‘अहो प्रभू तेरी लीला’. हे याच वेळचे गायन आहे. हे देखील गायले गेले आहे तुमची गत मत न्यारी. सर्व आत्म्यांचा पार्ट वेगळा आहे. आता बाबा तुम्हाला श्रीमत देत आहेत की, ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर विकर्म विनाश होतील’. कुठे श्रीमत आणि कुठे मानवी मत. तुम्ही जाणता विश्वामध्ये शांती एका परमपिता परमात्म्याशिवाय इतर कोणीही स्थापित करू शकत नाही. १००% पवित्रता-सुख-शांती ५ हजार वर्षांपूर्वी प्रमाणे ड्रामा अनुसार स्थापन करत आहेत. ती कशी? ते येऊन समजून घ्या. तुम्ही मुले देखील मदतगार बनता. जे खूप मदत करतील ते विजयी माळेचे मणी बनतात. तुम्हा मुलांची नावे देखील किती रमणीक होती. ती नावांची लिस्ट अल्बम मध्ये ठेवून दिली पाहिजे. तुम्ही भट्टीमध्ये होता, घरदार सोडून येऊन बाबांचे बनलात. एकदम भट्टीमध्ये येऊन पडलात. अशी पक्की भट्टी होती जे आतमध्ये कोणी येऊ शकत नव्हते. जर का बाबांचे बनलात तर मग नावे देखील जरूर असली पाहिजेत. सर्व काही समर्पित केले, म्हणून अशी नावे ठेवली. आश्चर्य आहे ना - बाबांनी सर्वांची नावे ठेवली. अच्छा.

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कोणत्याही गोष्टीमध्ये संशय बुद्धी बनायचे नाही, मायेच्या वादळांना महावीर बनून पार करायचे आहे, असे योगामध्ये रहा जेणेकरून मायेची वादळे तुम्हाला हलवू शकणार नाहीत.

२) बुद्धिमान बनून आपले जीवन ईश्वरीय सेवेमध्ये लावायचे आहे. खरा-खरा रूहानी सोशल वर्कर बनायचे आहे. रूहानी शिक्षण शिकायचे आणि इतरांनाही शिकवायचे आहे.

वरदान:-
अहम् आणि वहम् (अहंकार आणि संशय) दूर करून दयाळू बनणारे विश्व कल्याणकारी भव

कशीही अवगुण असणारी, कठोर संस्कार असणारी, कमी बुद्धीवाली, सतत निंदा करणारी आत्मा असो परंतु जी दयाळू विश्व कल्याणकारी मुले आहेत ती सर्व आत्म्यांप्रती लॉफूल (नियमबद्ध) असतील त्याच सोबत लव्हफुल (स्नेहपूर्वक) असतील. कधीही या संशयामध्ये येणार नाहीत की, ‘हे तर कधी बदलूच शकत नाहीत, हे तर आहेतच असे…’ किंवा ‘हे काहीच करू शकत नाहीत, मीच सर्वकाही आहे… हे काहीच नाहीत’. या प्रकारचा अहंकार आणि भ्रम सोडून, कमजोरींना किंवा अवगुणांना जाणत असूनही क्षमा करणारी दयाळू मुलेच विश्व कल्याणाच्या सेवेमध्ये सफल होतात.

बोधवाक्य:-
जिथे ब्राह्मणांच्या तन-मन-धनाचा सहयोग आहे तिथे सफलता सोबतच आहे.

अव्यक्त इशारे - आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-

आत्मे जेव्हा आपल्या आत्मिक स्वरूपाचा अनुभव करतील तेव्हा ते बाबांकडे आकर्षित होऊन, ‘अहो प्रभू’चे गीत गातील आणि देहभानातून सहजच अर्पण होतील. ‘अहो तुमचे भाग्य!’ ‘ओहो! माझे भाग्य!’ या भाग्याच्या अनुभूतीमुळे देह आणि देहाच्या नात्यांच्या स्मृतीचा त्याग करतील.