06-06-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - भविष्य उच्च घराण्यामध्ये येण्याचा आधार आहे शिक्षण, या शिक्षणानेच तुम्ही बेगर टू प्रिन्स बनू शकता”

प्रश्न:-
गोल्डन स्पून इन माऊथ दोन प्रकारे प्राप्त होऊ शकतो, तो कसा?

उत्तर:-
एक - भक्तीमध्ये दान-पुण्य केल्याने आणि दुसरे - ज्ञानामध्ये अभ्यासाने. भक्तीमध्ये दान-पुण्य करतात तर राजा किंवा श्रीमंताकडे जन्म घेतात परंतु ते झाले हदचे. तुम्ही ज्ञानामध्ये अभ्यासाने गोल्डन स्पून इन माऊथ प्राप्त करता. ही आहे बेहदची गोष्ट. भक्तीमध्ये शिक्षणाने राजाई मिळत नाही. इथे जे जितके चांगल्या रीतीने शिकतात, तितके उच्च पद प्राप्त करतात.

ओम शांती।
गोड-गोड खूप वर्षांनी भेटलेल्या मुलांना रुहानी बाबा बसून समजावून सांगत आहेत, याला म्हटले जाते रुहानी ज्ञान. बाबा येऊन भारतवासी मुलांना समजावून सांगतात, स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा, ही बाबांनी खास आज्ञा केली आहे तर ते मानले पाहिजे ना. उच्च ते उच्च बाबांचे श्रीमत प्रसिद्ध आहे. हे देखील तुम्हा मुलांना ज्ञान आहे की केवळ शिवबाबांनाच ‘श्री श्री’ म्हणू शकतो. तेच ‘श्री श्री’ बनवतात, श्री अर्थात श्रेष्ठ. तुम्हा मुलांना आता माहिती झाले आहे की यांना (देवतांना) बाबांनी असे बनवले आहे. आता आम्ही नवीन दुनियेसाठी शिकत आहोत. नवीन दुनियेचे नावच आहे स्वर्ग, अमरपुरी. महिमा करणारी अनेक नावे आहेत. म्हणतात देखील स्वर्ग आणि नरक. अमका स्वर्गवासी झाला म्हणजे तो नरकवासी होता ना. परंतु लोकांमध्ये इतकी समज नाही, स्वर्ग-नरक, नवीन-दुनिया, जुनी दुनिया कशाला म्हटले जाते, काहीही जाणत नाहीत. बाहेरचा भपका किती आहे. तुम्हा मुलांमध्ये देखील असे फार थोडे आहेत जे समजतात - खरोखर, बाबा आम्हाला शिकवत आहेत. आम्ही असे लक्ष्मी-नारायण बनण्यासाठी आलो आहोत. आम्ही बेगर टू प्रिन्स बनणार. सर्वप्रथम आम्ही जाऊन राजकुमार बनणार. हे शिक्षण आहे, जसे इंजिनिअरींग, बॅरिस्टरी इत्यादी शिकतात तर बुद्धीमध्ये असते की आम्ही घर बांधणार, मग असे करणार… प्रत्येकाला आपले कर्तव्य स्मृतीमध्ये येते. तुम्हा मुलांना या शिक्षणाद्वारे खूप उच्च घरामध्ये जाऊन जन्म घ्यायचा आहे. जो जितका जास्त अभ्यास करेल तितका खूप उच्च घरामध्ये जन्म घेईल. राजाच्या घरी जन्म घेऊन मग राज्य चालवायचे आहे. गायले देखील जाते - गोल्डन स्पून इन माऊथ. एक तर ज्ञानाद्वारे हा गोल्डन स्पून इन माऊथ मिळू शकतो. दुसरे, जर दान-पुण्य चांगल्या रीतीने केले तरी देखील राजापाशी जन्म मिळेल. ते झाले हदचे. हे आहे बेहदचे. प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या. काहीही समजले नाही तर विचारु शकता. लिहून ठेवा की, ह्या-ह्या गोष्टी बाबांना विचारायच्या आहेत. मुख्य आहेच बाबांच्या आठवणीची गोष्ट. बाकी कोणती शंका इत्यादी असेल तर त्याचे निरसन करतील. हे देखील मुले जाणतात जितके भक्तीमार्गामध्ये दान-पुण्य करतात तर श्रीमंताकडे जन्म घेतात. जे कोणी वाईट कर्म करतात तर मग असा जन्म मिळतो. कोणाकोणाचे तर असे कर्मबंधन आहे की काही विचारुच नका. हे सर्व आहे पास्टचे (मागील जन्मातील) कर्मबंधन. काही-काही राजे देखील असे असतात, कर्मबंधन खूप कडक असते. या लक्ष्मी-नारायणाला तर कोणतेही बंधन नाहीये. तिथे आहेच योगबलाची रचना. जर योगबलाने आपण विश्वाची राजाई घेऊ शकतो तर काय मुल जन्माला येऊ शकत नाही! अगोदरच साक्षात्कार होतो. तिथे (सतयुगामध्ये) तर ही कॉमन गोष्ट आहे. आनंदाने बँड वाजू लागतात. म्हाताऱ्या पासून बाळ बनतात. महात्म्यापेक्षा सुद्धा लहान मुलांना जास्त मान दिला जातो; कारण तो महात्मा तर तरीही सारे जीवन पार करुन मोठा झाला आहे. विकारा विषयी जाणतात. लहान मुले जाणत नाहीत म्हणून महात्म्यापेक्षाही श्रेष्ठ म्हटले जाते. तिथे तर सर्वच महात्मे आहेत. श्रीकृष्णाला देखील महात्मा म्हणतात. तो आहे खरा महात्मा. सतयुगामध्येच महान आत्मे असतात. त्यांच्यासारखा इथे कोणीही असू शकत नाही.

तुम्हा मुलांना आतून खूप आनंद झाला पाहिजे. आता आपण नवीन दुनियेमध्ये जन्म घेणार. ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. घर जुने झाले की नवीन घराचा आनंद होतो ना. किती छान-छान मार्बल इत्यादीची घरे बनवतात. जैन लोकांपाशी पैसे खूप असतात, ते स्वतःला उच्च कुळातील समजतात. वास्तविक इथे काही उच्च कुळ तर नाहीये. उच्च कुळामध्ये लग्नासाठी स्थळ शोधतात. तिथे (सतयुगामध्ये) कुळ इत्यादीची गोष्ट नसते. तिथे तर एकच देवतांचे कुळ असते, दुसरे कोणतेही नाही. यासाठी तुम्ही संगमावर अभ्यास करता की, आपण एका बाबांची मुले सर्व आत्मे आहोत. पहिली आहे - आत्मा, नंतर मग आहे - शरीर. दुनियेमध्ये सगळे देह-अभिमानी असतात. तुम्हाला आता देही-अभिमानी बनायचे आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना आपल्या अवस्थेला मजबूत करायचे आहे. बाबांना किती मुले आहेत, किती मोठा गृहस्थी आहे, किती विचार चालत असतील. यांना (ब्रह्मा बाबांना) देखील मेहनत करावी लागते. मी काही संन्यासी नाहीये. बाबांनी यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश केला आहे. ब्रह्मा-विष्णू-शंकराचे चित्र सुद्धा आहे ना. ब्रह्मा आहेत सर्वात उच्च. तर यांना सोडून बाबा कोणामध्ये येणार. ब्रह्मा कोणी नवीन जन्म घेत नाहीत. बघता ना - यांना कसे ॲडॉप्ट करतो. तुम्ही कसे ब्राह्मण बनता, या गोष्टींना तर तुम्हीच जाणता दुसरे कोण जाणतील. लोक म्हणतात - ‘हा (ब्रह्माबाबा) तर सोनार होता, याला तुम्ही ब्रह्मा म्हणता!’ त्यांना काय माहित इतके ब्राह्मण-ब्राह्मणी कसे जन्म घेतील. प्रत्येक गोष्टीविषयी किती समजावून सांगावे लागते. या खूप रहस्यमय गोष्टी आहेत ना. हे ब्रह्मा व्यक्त, ते अव्यक्त. हे पवित्र बनून मग अव्यक्त होतात. हे म्हणतात - मी आता पवित्र नाही आहे. तसा पवित्र बनत आहे. प्रजापिता तर इथे असायला हवा ना. नाहीतर कुठून येणार. बाबा स्वतः समजावून सांगत आहेत - ‘मी पतित शरीरामध्ये येतो, जरुर यांनाच प्रजापिता म्हणणार. सूक्ष्मवतनमध्ये म्हणणार नाही. तिथे प्रजा काय करेल. हे (ब्रह्मा बाबा) स्वतंत्रपणे पवित्र बनतात. जसे हे सुद्धा पुरुषार्थ करतात तसे तुम्ही पुरुषार्थ करुन स्वतंत्रपणे पवित्र बनता. विश्वाचे मालक बनता ना. स्वर्ग वेगळा, नरक वेगळा आहे. आत्ता तर किती तुकडे-तुकडे झाले आहेत. ५ हजार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जेव्हा यांचे राज्य होते. ते लोक (दुनियावाले) मग लाखो वर्षे म्हणतात. या गोष्टी समजतील देखील त्यांनाच ज्यांनी कल्पापूर्वी समजून घेतले असेल. तुम्ही बघता इथे मुसलमान, पारशी इत्यादी सर्व येतात. खुद्द मुसलमान मग हिंदूंना नॉलेज देत आहेत. आश्चर्य आहे ना. समजा कोणी शीख धर्माचे आहेत, ते देखील बसून राजयोग शिकवतात. जे कनव्हर्ट झाले आहेत ते मग ट्रान्सफर होऊन देवता कुळामध्ये येतील. सैपलिंग लागते (कलम लागते). तुमच्याकडे ख्रिश्चन, पारशी सुद्धा येतात, बौद्ध देखील येतील. तुम्ही मुले जाणता जेव्हा वेळ जवळ येईल तेव्हा चोहोबाजूंनी आपले नाव प्रसिद्ध होईल. तुम्ही एकच भाषण कराल आणि पुष्कळजण तुमच्याकडे येतील. सर्वांना स्मृति येईल आमचा खरा धर्म हा आहे. जे आपल्या धर्माचे असतील ते सर्व येतील तर खरे ना. लाखो वर्षांची गोष्ट नाही आहे. बाबा बसून समजावून सांगतात तुम्ही काल देवता होता, आता पुन्हा देवता बनण्यासाठी बाबांकडून वारसा घेत आहात.

तुम्ही खरे-खरे पांडव आहात, पांडव अर्थात पंडे. ते आहेत देहधारी पंडे. तुम्ही ब्राह्मण आहात रुहानी पंडे. तुम्ही आता बेहदच्या बाबांकडून शिकत आहात. याचा तुम्हाला खूप नशा असला पाहिजे. आम्ही बाबांकडे जात आहोत, ज्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळतो. ते आमचे बाबा, टीचर सुद्धा आहेत, हे शिकण्यासाठी कोणत्या टेबल-खुर्ची इत्यादीची गरज नाही. हे तुम्ही लिहिता ते सुद्धा आपल्या पुरुषार्थासाठी. खरेतर या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. शिवबाबा तुम्हाला पत्र लिहिण्यासाठी ही पेन्सिल इत्यादी हाती घेतात, मुले समजतील शिवबाबांची लाल अक्षरे आली आहेत. बाबा लिहितात - रुहानी मुलांनो. मुले देखील समजतात रुहानी बाबा. ते खूप उच्च ते उच्च आहेत, त्यांच्या मतावर चालायचे आहे. बाबा म्हणतात - काम विकार महाशत्रू आहे. हा आदि-मध्य-अंत दु:ख देणारा आहे. त्या भुताच्या वशीभूत होऊ नका. पवित्र बना. बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन’. तुम्हा मुलांना आता राज्य करण्यासाठी खूप ताकद मिळते; ज्यामुळे तुम्हाला मग कोणीही जिंकू शकत नाही. तुम्ही किती सुखी बनता. तर या अभ्यासावर किती लक्ष दिले पाहिजे. आम्हाला बादशाही मिळत आहे. तुम्ही जाणता की आपण कोणापासून कोण बनत आहोत. भगवानुवाच आहे ना. मी तुम्हाला राजयोग शिकवतो, राजांचा राजा बनवतो. भगवान कोणाला म्हटले जाते, हे देखील कोणाला माहिती नाही आहे. आत्मा बोलावते – ओ बाबा! तर माहित असले पाहिजे ना – ते केव्हा आणि कसे येतील? मनुष्यप्राणीच तर ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला, त्याचा कालावधी इत्यादींना जाणतील ना. हे जाणल्यामुळे तुम्ही देवता बनता. ज्ञान आहेच सद्गती करिता. या वेळी आहे कलियुगाचा अंत. सर्व दुर्गतीमध्ये आहेत. सतयुगामध्ये असते सद्गती. आता तुम्ही जाणता बाबा आलेले आहेत - सर्वांची सद्गती करण्याकरिता. सर्वांना जागे करण्यासाठी आले आहेत. कोणती कबर थोडीच आहे. परंतु घोर अंधारामध्ये अडकून पडले आहेत, त्यांना जागे करण्यासाठी येतात. जी मुले घोर निद्रेतून जागी होतात त्यांना आतून खूप आनंद होतो, आम्ही शिवबाबांची मुले आहोत, कोणत्याही प्रकारची चिंता नाही. बाबा आम्हाला विश्वाचा मालक बनवतात. रडण्याचा तर प्रश्नच नाही. ही आहे रडत राहण्याची दुनिया. ती आहे हर्षित राहण्याची दुनिया. त्यांची चित्रे बघा कशी सुंदर आणि हसतमुख बनवतात. ते फीचर्स तर इथे काढू शकत नाही. बुद्धीने समजतात यांच्या सारखी फीचर्स दिसून येतात. तुम्हा गोड-गोड मुलांना आता स्मृति आली आहे की भविष्यामध्ये अमरपुरीचे आम्ही प्रिन्स बनणार. या मृत्युलोकला, या भंभोरला आग लागणार आहे. सिविलवॉरमध्ये देखील एकमेकांना कसे मारतात, आपण कोणाला मारतो आहोत ते सुद्धा माहिती पडत नाही. हाहाकारच्या नंतर जयजयकार होणार आहे. तुमचा विजय, बाकी सर्वांचा विनाश होईल. ‘रुद्र’च्या माळेमध्ये ओवले जाऊन मग ‘विष्णू’च्या माळेमध्ये ओवले जाल. आता तुम्ही पुरुषार्थ करता आपल्या घरी जाण्यासाठी. भक्तिचा किती विस्तार आहे. जशी झाडाची अनेक पाने असतात तसा भक्तिचा विस्तार आहे. बीज आहे ज्ञान. बीज किती छोटे आहे. बीज आहे - बाबा, या झाडाची स्थापना, पालना आणि विनाश कसा होतो, हे तुम्ही जाणता. हे व्हरायटी धर्मांचे उलटे झाड आहे. दुनियेमध्ये एकही कोणी हे जाणत नाहीत. आता मुलांना बाबांची आठवण करण्याची खूप मेहनत करायची आहे, तर विकर्म विनाश होतील. ते गीता ऐकवणारे देखील म्हणतात - मनमनाभव. देहाचे सर्व धर्म सोडून स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. मनुष्य याचा अर्थ थोडेच समजतात. तो आहेच भक्तिमार्ग. हा आहे ज्ञानमार्ग. ही राजधानी स्थापन होत आहे. चिंता करण्याची काहीच गरज नाही, जे थोडेसे जरी ज्ञान ऐकतील तरी ते प्रजेमध्ये येतील. ज्ञानाचा विनाश होत नाही. बाकी जे यथार्थ रित्या जाणून पुरुषार्थ करतात तेच उच्च पद प्राप्त करतात. ही बुद्धीमध्ये समज आहे ना. आपण नवीन दुनियेमध्ये प्रिन्स बनणार आहोत. स्टुडंट परीक्षा पास करतात तर त्यांना किती आनंद होतो. तुम्हाला तर हजार पटीने जास्त अतींद्रिय सुखाचा अनुभव झाला पाहिजे. आम्ही साऱ्या विश्वाचे मालक बनतो. कोणत्याही गोष्टी मध्ये कधी नाराज व्हायचे नाहीये. ब्राह्मणीशी पटत नाही तर बाबांवर नाराज होतात; अरे, तुम्ही बाबांशी बुद्धीचा योग लावा ना. त्यांना तर प्रेमाने आठवण करा. बाबा, बस्स तुमचीच आठवण करत-करत आम्ही घरी येणार. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही, सदैव हर्षित रहायचे आहे. हे लक्षात असावे की, आपण शिवबाबांची संतान आहोत, बाबा आले आहेत आम्हाला विश्वाचा मालक बनविण्याकरिता.

२) आपल्या अवस्थेला एकरस बनविण्यासाठी देही-अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. या जुन्या घरातून मोह काढून टाकायचा आहे.

वरदान:-
मनन शक्तीद्वारे बुद्धीला शक्तिशाली बनविणारे मास्टर सर्वशक्तिमान भव

मनन शक्तीच दिव्य-बुद्धीचा खुराक आहे. जसे भक्तीमध्ये सिमरण करण्याचे अभ्यासी आहात, तशी ज्ञानामध्ये स्मृतीची शक्ती आहे. या शक्तीद्वारे मास्टर सर्वशक्तिमान बना. रोज अमृतवेलेला आपल्या एका टायटलला स्मृतिमध्ये आणा आणि मनन करत रहा तर मनन शक्तिने बुद्धी शक्तिशाली होईल. शक्तिशाली बुद्धीवर मायेचा वार होऊ शकत नाही, परवश होऊ शकत नाहीत कारण माया सर्वात अगोदर व्यर्थ संकल्परुपी बाणाद्वारे दिव्य-बुद्धीलाच कमजोर करते, या कमजोरी पासून बचाव करण्याचे साधन आहे मनन शक्ती.

बोधवाक्य:-
आज्ञाधारक मुलेच आशीर्वादांचे पात्र आहेत, आशीर्वादांचा प्रभाव मनाला सदैव संतुष्ट ठेवतो.

अव्यक्त इशारे - आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:- सदैव बेहदची आत्मिक दृष्टी, भाऊ-भाऊ या नात्याच्या वृत्तीने कोणत्याही आत्म्याच्या प्रति शुभ भावना ठेवण्याचे फळ जरुर प्राप्त होते म्हणून पुरुषार्थ करण्यासाठी कंटाळू नका, निराश सुद्धा होऊ नका. निश्चयबुद्धी बनून, ‘माझे’पणाच्या नात्यापासून न्यारे होऊन शांती आणि शक्तीचा सहयोग आत्म्यांना देत रहा.