26-06-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - आता तुम्हाला निंदा-स्तुती, मान-अपमान, सुख-दुःख सर्वकाही सहन करायचे आहे
तुमचे सुखाचे दिवस आता जवळ येत आहेत”
प्रश्न:-
बाबा आपल्या
ब्राह्मण मुलांना कोणती एक वॉर्निंग देतात?
उत्तर:-
मुलांनो, कधीही बाबांवर रागावू नका. जर बाबांवर रागावलात तर सद्गतीला देखील मुकाल.
बाबा वॉर्निंग देतात - रागावणार्यांना खूप कठोर सजा मिळेल. आपसामध्ये किंवा
ब्राह्मणीवर रागवाल तर फूल बनता-बनता काटा बनाल, त्यामुळे अतिशय सावध रहा.
गीत:-
धीरज धर मनुवा…
ओम शांती।
गोड-गोड सिकीलध्या मुलांनी गाणे ऐकले, तुम्हा मुलांची जी काही जन्म-जन्मांतरीची
दुःख आहेत सर्व दूर झाली पाहिजेत. या गाण्याची लाईन ऐकलीत, तुम्ही जाणता आता आपला
दुःखाचा पार्ट पूर्ण होत आहे आणि सुखाचा पार्ट सुरू होत आहे. जे पूर्ण रीतीने जाणत
नाहीत ते कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये दुःख जरूर पाहतात. इथे बाबांकडे येऊन
देखील कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दुःख जाणवेल. बाबा समजू शकतात, भरपूर मुलांना
त्रास होत असेल. जेव्हा तीर्थ यात्रेवर जातात तर कुठे चेंगराचेंगरी होते, अतिवृष्टी
होते, कधी वादळे येतात. जे खरे भक्त असतील ते तर म्हणतील - काही हरकत नाही,
भगवंताकडे जात आहोत. भगवान समजूनच यात्रेवर जातात. मनुष्यांचे असंख्य भगवान आहेत.
तर जे चांगले मजबूत असतात ते तर म्हणतात - हरकत नाही, चांगल्या कामामध्ये नेहमी
विघ्न पडतात, परत थोडेच जाणार. कोणी-कोणी तर मागे परत निघून जातातही. कधी विघ्न
पडतात, कधी पडतही नाहीत. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, ही देखील तुमची यात्रा आहे’.
तुम्ही म्हणाल - ‘आम्ही बेहदच्या बाबांकडे जातो ते बाबा सर्वांचे दुःख हरणारे आहेत’.
हा निश्चय आहे, आज-काल बघा मधुबनमध्ये किती गर्दी आहे, बाबांना काळजी वाटते,
बऱ्याचजणांना त्रास देखील होत असेल. जमिनीवर झोपावे लागते. बाबांना थोडेच असे वाटते
की मुलांना जमिनीवर झोपवावे. परंतु ड्रामा अनुसार गर्दी झाली आहे, कल्पापूर्वी
देखील झाली होती पुन्हा होईल, यासाठी काही दुःख होता कामा नये. हे देखील जाणतात
शिकणारे कोणी तर राजा बनतील, कोणी मग रंक देखील बनतील. कोणाचे पद मोठे, कोणाचे कमी.
परंतु सुख जरूर असेल. हे देखील बाबा जाणतात, कोणी खूप कच्चे आहेत, जे काहीच सहन करू
शकत नाहीत. त्यांना काही त्रास झाला की म्हणतील आम्ही तर उगीचच इथे आलो किंवा
म्हणतील आम्हाला ब्राह्मणी जबरदस्तीने घेऊन आली. असे देखील असतील जे म्हणतील आम्हाला
ब्राह्मणीने उगीचच अडकवले. पूर्णपणे ओळखलेले नाहीये की विश्वविद्यालयामध्ये आलो
आहोत. यावेळच्या शिक्षणाने भविष्यामध्ये कोणी तर राव (श्रीमंत) बनतील, कोणी रंक (गरीब)
देखील बनणार आहेत. इथल्या गरीब-श्रीमंतांमध्ये आणि तिथल्या गरीब-श्रीमंतांमध्ये
रात्रं-दिवसाचा फरक असतो. इथले श्रीमंत देखील दुःखी आहेत तर गरीब देखील दुःखी आहेत.
तिथे दोघेही सुखी असतात. इथे तर आहेच पतित विकारी दुनिया. भले कोणाकडे खूप संपत्ती
आहे, बाबा समजावून सांगतात हे धन-संपत्ती सर्व मातीमध्ये मिसळून जाणार आहे. हे शरीर
देखील नष्ट होईल. आत्मा काही मातीमध्ये मिसळत नाही, किती मोठ-मोठे श्रीमंत आहेत,
बिर्ला सारखे, परंतु त्यांना काय माहित की आता ही जुनी दुनिया बदलत आहे. माहित असते
तर लगेचच आले असते. म्हणतात - इथे भगवान आलेले आहेत तरी देखील जातील कुठे? बाबा
आल्या शिवाय कोणालाही सद्गती मिळू शकत नाही. जर कोणी रागावला तर म्हणतील सद्गतीवर
रागावला. असे खूप जण रागावत राहतील, कोसळत राहतील (अधोगती होत राहील). आश्चर्यवत्
सुनन्ती, निश्चय होवन्ती… कोणीतर समजतात - खरोखर, यांच्या शिवाय दुसरा कोणता मार्गच
नाही. यांच्याकडून तर सुख आणि शांतीचा वारसा मिळेल. यांच्याशिवाय सुख-शांती मिळणे
असंभव आहे. जेव्हा पुष्कळ धन असेल तेव्हाच तर सुख मिळेल. धनामध्येच सुख असते ना.
तिथे (मूलवतन मध्ये) तर आत्मे शांतीमध्ये बसले आहेत. कोणी म्हणतील आमचा पार्ट नसता
तर आम्ही कायम तिथेच राहिलो असतो, परंतु असे म्हणून थोडेच चालेल. मुलांना समजावून
सांगितले गेले आहे - हा पूर्वनियोजित खेळ आहे. असे पुष्कळ आहेत जे कोणत्या ना
कोणत्या संशयामध्ये येऊन सोडून जातात. ब्राह्मणीवर रागावून बसतात किंवा आपसामध्ये
रागावून शिक्षणच सोडून देतात.
आता तुम्ही इथे फूल
बनण्यासाठी आला आहात. अनुभव करता - बरोबर आपण काट्यापासून फूल बनत आहोत. फूल जरूर
बनायचे आहे. कोणाला काही संशय आहे, अमका असे करतो, हे असे आहेत, म्हणून आम्ही येणार
नाही. बस चिडून मग घरातच बसून राहतात. बाबा म्हणतात - इतर सर्वांवर भले चिडा परंतु
एका बाबांवर कधीही चिडू नका. बाबा वॉर्निंग देतात, खूप कठोर सजा आहेत. गर्भामध्ये
देखील ज्या सजा मिळतात, त्या सर्वांचा साक्षात्कार करवितात. साक्षात्काराशिवाय सजा
मिळू शकत नाही. इथला देखील साक्षात्कार होईल. तू शिकत असताना आपसामध्ये भांडण-तंटा
करून, चिडून शिक्षण सोडून दिले होतेस. तुम्ही मुले समजता आपल्याला बाबांकडून शिकायचे
आहे. शिक्षण कधीही सोडायचे नाही. तुम्ही इथे शिकताच मुळी मनुष्यापासून देवता
बनण्यासाठी. अशा सर्वोच्च बाबांकडे तुम्ही भेटण्यासाठी येता. कधी जास्त येतात, मग
ड्रामा अनुसार काही त्रास होतो. मुलांना अनेक वादळांचा सामना करावा लागतो. अमकी
वस्तू मिळाली नाही, हे मिळाले नाही…, अरे, हे तर काहीच नाही. जेव्हा मृत्यूची वेळ
येईल तर अज्ञानी लोक म्हणतील आम्ही काय गुन्हा केला आहे, जे नाहक आम्हाला मारता.
त्या अखेरच्या पार्टलाच म्हटले जाते - खुने नाहेक पार्ट (विनाकारण रक्तपाताचा पार्ट).
अचानक बॉम्ब पडतील. असंख्य मरतील. हा विनाकारण रक्तपात झाला ना. अज्ञानी लोक असे
दुःखाने ओरडतील. तुम्ही मुले तर खूप आनंदीत होता, कारण तुम्ही जाणता या दुनियेचा
विनाश होणारच आहे, अनेक धर्मांचा विनाश झाला नाही तर मग एका सत्य धर्माची स्थापना
कशी होईल. सतयुगामध्ये एक आदि सनातन देवी-देवता धर्म होता. कोणाला काय माहित
सतयुगाच्या सुरुवातीला काय होते. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. बाबा आलेलेच आहेत
सर्वांना पुरुषोत्तम बनविण्यासाठी. सर्वांचे पिता आहेत ना. ड्रामाला तर तुम्हीच
जाणले आहे. सगळेच काही सतयुगामध्ये येणार नाहीत. इतके करोड आत्मे सतयुगामध्ये थोडेच
येतील. या आहेत डिटेलमधल्या गोष्टी. अशा बऱ्याच मुली आहेत ज्या काहीही समजत नाहीत.
भक्तिमार्गाची सवय लागली आहे. ज्ञान बुद्धीमध्ये बसू शकत नाही. भक्तीची सवय लागलेली
आहे. म्हणतात - ‘भगवान काय करू शकत नाहीत. मेलेल्याला जिवंत करू शकतात’. बाबांकडे
येतात म्हणतात अमक्या व्यक्तीने मेलेल्याला जिवंत केले, तर काय भगवान करू शकत नाहीत.
कोणी चांगले काम केले तर बस्स, त्याची महिमा करु लागतात. मग त्यांचे हजारो फॉलोअर्स
बनतात. तुमच्याकडे तर फार थोडे येतात. भगवान शिकवतात मग इतके कमी कशामुळे? असे
अनेकजण म्हणतात - ‘अरे, इथे तर मरावे लागते’. तिथे तर कनरस आहे. अगदी दिमाखात बसून
गीता ऐकवतात, भक्त लोक ऐकतात. इथे (या ज्ञानामध्ये) कनरसाची गोष्टच नाही. तुम्हाला
फक्त एवढेच सांगितले जाते - बाबांची आठवण करा. गीतेमध्ये देखील हा शब्द आहे - ‘मनमनाभव’.
बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. बाबा म्हणतात - अच्छा, ब्राह्मणीवर किंवा
सेंटरवर रागावता, ठीक आहे, एवढे तर काम करा बाकी सर्व संग तोडून, स्वतःला आत्मा समजा,
एका बाबांची आठवण करा. बाबाच पतित-पावन आहेत. बस्स, बाबांची आठवण करत रहा. स्वदर्शन
चक्र फिरवत रहा. एवढी आठवण केली तरीही स्वर्गामध्ये जरूर याल. स्वर्गामध्ये उच्च पद
तर पुरुषार्थानुसारच मिळेल. प्रजा बनवावी लागेल. नाही तर राज्य कोणावर कराल. जे खूप
मेहनत करतात, उच्च पद देखील तेच प्राप्त करतील. उच्च पदासाठीच किती धडपड करतात.
पुरुषार्था शिवाय कोणीही राहू शकत नाही. तुम्ही मुले जाणता - उच्च ते उच्च
पतित-पावन बाबाच आहेत. मनुष्य महिमा भले गातात परंतु अर्थ समजत नाहीत. भारत किती
श्रीमंत होता, भारत आहे स्वर्ग, वंडर ऑफ वर्ल्ड (जगातील आश्चर्य). ती ७ वंडर्स
मायेची. संपूर्ण ड्रामामध्ये उच्च ते उच्च आहे स्वर्ग, नीच ते नीच आहे नरक. आता
तुम्ही बाबांकडे आला आहात, जाणता गोड बाबा इतके उच्च ते उच्च घेऊन जातात. त्यांना
कोण विसरेल. भले कुठेही बाहेर जा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा - बाबांची आठवण करा.
बाबाच श्रीमत देतात - ‘O’ (शिव) भगवानुवाच, ना की ब्रह्मा भगवानुवाच.
बेहदचे बाबा मुलांना
विचारतात - मुलांनो, मी तुम्हाला इतके श्रीमंत बनवून गेलो मग तुमची दुर्गती कशी झाली?
परंतु असे ऐकतात जणू काहीच समजत नाही. तर मुलांना थोडा त्रास होतो, सुख-दुःख,
निंदा-स्तुती सर्वकाही सहन करावे लागते. इथली लोकं पहा कशी आहेत प्राईम मिनिस्टरला
देखील दगड मारायला वेळ लावत नाहीत. म्हणतात - शाळेतील मुलांचे न्यू ब्लड (गरम रक्त)
आहे. त्यांची खूप महिमा करतात. समजतात की हे भविष्याचे नवीन रक्त आहे. परंतु तेच
स्टुडंट दुःख देणारे निघतात. कॉलेजांना आग लावून टाकतात. एकमेकांना शिव्या देत
राहतात. बाबा दुनियेची काय हालत आहे ते समजावून सांगतात. ड्रामाचे ॲक्टर असून देखील
ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला आणि मुख्य ॲक्टर्स इत्यादींना जाणत नाहीत तर त्यांना
काय म्हणावे! मोठ्यात मोठे कोण आहेत त्यांची बायोग्राफी (जीवन चरित्र) तर जाणली
पाहिजे ना. काहीच जाणत नाहीत. ब्रह्मा, विष्णु, शंकराचा काय पार्ट आहे, धर्म
स्थापकांचा काय पार्ट आहे. मनुष्य तर अंधश्रद्धेमध्ये येऊन सर्वांना प्रीसेप्टर (गुरु)
म्हणतात. गुरु तर ते जे सद्गती करतात. आता सर्वांचे सद्गतीदाता तर एकच परमपिता
परमात्मा आहेत. ते परम गुरु देखील आहेत, शिवाय नॉलेज देखील देतात. तुम्हा मुलांना
शिकवतात देखील, त्यांचा पार्टच वंडरफुल आहे. धर्म देखील स्थापन करतात बाकी सर्व
धर्मांना खलास देखील करतात. बाकीचे तर केवळ धर्म स्थापन करतात. स्थापना आणि विनाश
करणाऱ्यालाच गुरु म्हटले जाईल ना. बाबा म्हणतात - मी काळांचाही काळ आहे. एका धर्माची
स्थापना आणि बाकी सर्व धर्मांचा विनाश होईल अर्थात या ज्ञान यज्ञामध्ये स्वाहा
होतील. मग ना कोणते युद्ध लागणार, ना यज्ञ रचला जाणार. तुम्ही संपूर्ण विश्वाच्या
आदि-मध्य-अंताला जाणता. बाकीचे तर सर्व नेती-नेती म्हणतात. तुम्ही असे थोडेच म्हणाल.
हे बाबांव्यतिरिक्त दुसरे कोणीही सांगू शकणार नाही. तर तुम्हा मुलांना खूप आनंद झाला
पाहिजे परंतु मायेचा सामना असा होतो जो आठवणच पुसून टाकतो. तुम्हा मुलांना सुख-दुःख,
मान-अपमान सहन करायचे आहे. तसे तर इथे काही अपमान केला जात नाही. जर अशी कोणतीही
गोष्ट असेल तर बाबांना रिपोर्ट करायचा आहे. रिपोर्ट करत नाही तर खूप पाप लागते.
बाबांना सांगितल्याने लगेच त्यांना सावधानी मिळेल. या सर्जन पासून लपवता कामा नये.
खूप जबरदस्त सर्जन आहे. ज्ञान इंजेक्शन, याला अंजन देखील म्हणतात. अंजनाला
ज्ञान-सुरमा देखील म्हटले जाते. जादू इत्यादीची तर काही गोष्टच नाहीये. बाबा
म्हणतात - मी आलो आहे तुम्हाला पतितापासून पावन बनण्याची युक्ती सांगण्याकरिता.
पवित्र बनला नाहीत तर धारणा देखील होणार नाही. याच कामामुळे मग पापे होतात. यावर
विजय प्राप्त करायचा आहे. स्वतःच विकारामध्ये जात असेल तर दुसऱ्या कोणाला सांगू
देखील शकणार नाही. ते तर महापाप होईल. बाबा एक कहाणी देखील ऐकवतात - पंडित म्हणाला
राम-राम म्हटल्याने सागर पार कराल. मनुष्य समजतात पाण्याचा सागर. ज्याप्रमाणे
आकाशाचा अंत नाही तसाच सागराचा देखील अंत मिळवू शकत नाही. ब्रह्म मह्तत्त्वाचा
देखील अंत नाही. इथे (जुन्या दुनियेमध्ये) मनुष्य अंत शोधून काढण्याचा पुरुषार्थ
करतात, तिथे कोणी पुरुषार्थ करत नाही. इथे कितीही दूरपर्यंत जातात आणि मग परत येतात.
पेट्रोलच नसेल तर येतील कसे? हा आहे वैज्ञानिकांचा अति अहंकार, त्यानेच विनाश करतात.
एरोप्लेनद्वारे सुख देखील आहे मग त्याद्वारे अति दुःख देखील आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कोणत्याही
कारणाने शिक्षण सोडायचे नाही. अतिशय कठोर सजा आहेत त्यापासून वाचण्यासाठी इतर सर्व
संग तोडून एका बाबांची आठवण करायची आहे. रागवायचे नाहीये.
२) ज्ञानाचे इंजेक्शन
किंवा अंजन देणारे एक बाबाच आहेत, त्या अविनाशी सर्जन पासून कोणतीही गोष्ट लपवायची
नाही. बाबांना सांगितल्याने ताबडतोब सावधानी मिळेल.
वरदान:-
शरीराची
तंदुरुस्ती, मनाची खुशी आणि धनाच्या समृद्धीद्वारे श्रेष्ठ भाग्यवान भव
संगमयुगावर कायम स्व
मध्ये स्थित राहिल्याने शरीराचा कर्मभोग सुळा पासून काटा होतो, शरीराचा रोग
योगामध्ये परिवर्तन करता म्हणून नेहमी स्वस्थ आहात. मनमनाभव असल्या कारणाने
आनंदाच्या खाणीने नेहमी संपन्न आहात म्हणून मनाची खुशी देखील प्राप्त आहे आणि ज्ञान
धन सर्व धनापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्ञानधनवाल्यांची प्रकृती स्वतः दासी बनते आणि इतर
सर्व संबंध देखील एका सोबतच आहेत, संपर्क देखील होली हंसांसोबत आहे… त्यामुळे
‘श्रेष्ठ भाग्यवान’चे वरदान स्वतः प्राप्त आहे.
बोधवाक्य:-
आठवण आणि सेवा
दोघांचा बॅलन्सच डबल लॉक आहे.
अव्यक्त इशारे -
आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-
जसे अनेक जन्म आपल्या
देहाच्या स्वरूपाची स्मृती नॅचरल राहिली आहे तसेच आपल्या खऱ्या स्वरूपाच्या स्मृतीचा
अनुभव थोडा वेळ सुद्धा करणार नाहीत का? हा पहिला पाठ कंप्लिट करा तेव्हाच आपल्या
आत्म-अभिमानी स्थिती द्वारे सर्व आत्म्यांना साक्षात्कार घडविण्यासाठी निमित्त बनाल.