27-06-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे, त्यामुळे फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ वाया
घालवू नका”
प्रश्न:-
मनुष्यापासून
देवता बनण्याकरिता बाबांकडून कोणते श्रीमत मिळाले आहे?
उत्तर:-
मुलांनो, तुम्ही जेव्हा मनुष्यापासून देवता बनत आहात तर १. कोणताही आसुरी स्वभाव
असता कामा नये, २. कोणावरही रागवायचे नाही. ३. कोणालाही दुःख द्यायचे नाही. ४.
कोणत्याही फालतू गोष्टी कानाने ऐकायच्या नाहीत. बाबांचे श्रीमत आहे - हिअर नो
इव्हील…
ओम शांती।
तुम्हा मुलांना साधारण रीतीने बसायचे आहे. कुठेही बसू शकता. भले जंगलात बसा,
टेकडीवर बसा, घरामध्ये बसा नाहीतर झोपडीमध्ये बसा, कुठेही बसू शकता. असे बसल्यामुळे
तुम्ही मुले ट्रान्सफर होता. तुम्ही मुले जाणता आता आपण मनुष्य, भविष्यासाठी देवता
बनत आहोत. आपण काट्यांपासून फूल बनत आहोत. बाबा बागवान देखील आहेत, माळी देखील आहेत.
आपण बाबांची आठवण केल्याने आणि ८४ जन्मांचे चक्र फिरविल्यामुळे ट्रान्सफर होत आहोत.
इथे बसा, नाहीतर कुठेही बसा तुम्ही ट्रान्सफर होता-होता मनुष्यापासून देवता बनत जाता.
बुद्धीमध्ये एम ऑब्जेक्ट आहे, आपण असे बनत आहोत. काहीही कामकाज करा, स्वयंपाक करा,
बुद्धीमध्ये फक्त बाबांची आठवण करा. मुलांना हे श्रीमत मिळाले आहे - चालता-फिरता
सर्वकाही करत असताना फक्त आठवणीमध्ये रहा. बाबांच्या आठवणीने वारशाची देखील आठवण
येते, ८४ च्या चक्राची देखील आठवण येते. यामध्ये आणखी कोणता त्रास आहे, काहीच नाही.
जेव्हा की आपण देवता बनत आहोत, तर कोणताही आसुरी स्वभाव देखील असता कामा नये.
कोणावरही क्रोध करायचा नाही, कोणाला दुःख द्यायचे नाही, कोणत्याही फालतू गोष्टी
कानाने ऐकायच्या नाहीत. फक्त बाबांची आठवण करा. बाकी संसारातील झरमुई-झगमूई (व्यर्थ
गोष्टी) तर खूप ऐकल्यात. अर्ध्या कल्पापासून या ऐकता-ऐकता तुम्ही खाली घसरला आहात (पतन
झाले आहे). आता बाबा म्हणतात या व्यर्थ गोष्टी करू नका. अमका असा आहे, यांच्यामध्ये
हे आहे. कोणत्याही फालतू गोष्टी करायच्या नाहीत. हे जसे की वेळ वाया घालवणे आहे.
तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे. शिक्षणामध्येच आपले कल्याण आहे, यामुळेच पद प्राप्त
कराल. त्या (लौकिक) शिक्षणामध्ये खूप मेहनत करावी लागते. परीक्षा पास करण्यासाठी
परदेशात जातात. तुम्हाला तर कोणताच त्रास देत नाही. बाबा आत्म्यांना म्हणतात - ‘मज
पित्याची आठवण करा, एकमेकांच्या समोर बसवतात, तेव्हा देखील बाबांच्या आठवणीमध्ये रहा.
आठवणीमध्ये बसता-बसता तुम्ही काट्यापासून फूल बनता. किती चांगली युक्ती आहे, तर
बाबांच्या श्रीमतावर चालले पाहिजे ना. प्रत्येकाचा आजार वेगळा-वेगळा असतो. तर
प्रत्येक आजारासाठीचे सर्जन आहेत. मोठ-मोठ्या व्यक्तींचे खास सर्जन असतात ना. तुमचा
सर्जन कोण बनले आहेत? भगवान. ते आहेत अविनाशी सर्जन. ते म्हणतात - मी तुम्हाला
अर्ध्या कल्पासाठी निरोगी बनवतो. फक्त माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. तुम्ही
२१ जन्मांसाठी निरोगी बनाल. ही गाठ बांधून ठेवली पाहिजे. आठवणीनेच तुम्ही निरोगी
बनाल. मग २१ जन्मांसाठी कोणताही आजार होणार नाही. भले आत्मा तर अविनाशी आहे, शरीरच
रोगी बनते. परंतु भोगते तर आत्माच ना. तिथे अर्धा कल्प तुम्ही कधीही रोगी बनणार नाही.
फक्त आठवणीमध्ये दक्ष रहा. सेवा तर मुलांना करायचीच आहे. प्रदर्शनीमध्ये सेवा
करता-करता गळे सुकून जातात. बरीच मुले मग समजतात आपण ही सेवा करता-करता बाबांकडेच
निघून जाणार. ही देखील सेवेची खूप चांगली पद्धत आहे. प्रदर्शनीमध्ये देखील मुलांनी
समजावून सांगायचे आहे. प्रदर्शनीमध्ये सर्वात पहिले हे लक्ष्मी-नारायणाचे चित्र
दाखवले पाहिजे. हे ए-वन चित्र आहे. भारतामध्ये आजपासून ५००० वर्षांपूर्वी बरोबर
यांचे राज्य होते. अथाह धन होते. पवित्रता-सुख-शांती सर्वकाही होते. परंतु
भक्तीमार्गामध्ये सतयुगासाठी लाखो वर्षे दिली आहेत तर कोणतीही गोष्ट आठवेल तरी कशी;
हे लक्ष्मी-नारायणाचे चित्र फर्स्ट क्लास आहे. सतयुगामध्ये १२५० वर्षे या
डायनेस्टीने (घराण्याने) राज्य केले होते. आधी तुम्ही देखील जाणत नव्हता. आता
बाबांनी तुम्हा मुलांना स्मृती करून दिली आहे की तुम्ही साऱ्या विश्वावर राज्य केले
होते, तुम्ही विसरले आहात काय? ८४ जन्म देखील तुम्हीच घेतले आहेत. तुम्हीच सूर्यवंशी
होता. पुनर्जन्म तर घेताच. तुम्ही ८४ जन्म कसे घेतले आहेत, हे समजून घेणे खूप सोपी
गोष्ट आहे. खाली उतरत आलात, आता पुन्हा बाबा चढत्या कलेमध्ये घेऊन जातात. गातात
देखील - ‘चढ़ती कला तेरे भाणे सर्व का भला’. शिवाय शंख इत्यादी वाजवतात. आता तुम्ही
मुले जाणता हाहा:कार होईल, पाकिस्तानमध्ये बघा काय झाले होते - सर्वांच्या तोंडून
हेच निघत होते - ‘हे भगवान, हाय राम आता काय होणार’. आता हा विनाश तर खूप मोठा आहे,
नंतर मग जयजयकार होणार आहे. बाबा मुलांना समजावून सांगत आहेत - या बेहदच्या दुनियेचा
आता विनाश होणार आहे. बेहदचे बाबा बेहदचे ज्ञान तुम्हाला ऐकवतात. हदच्या गोष्टी
इतिहास-भूगोल तर ऐकत आला आहात ना. हे कोणालाही माहित नव्हते की, लक्ष्मी-नारायणाने
कसे राज्य केले. त्यांचा इतिहास-भूगोल कोणीही जाणत नाहीत. तुम्ही चांगल्या रीतीने
जाणता - इतके जन्म राज्य केले नंतर मग हे धर्म येतात, याला म्हटले जाते स्पिरिच्यूल
नॉलेज, जे स्पिरिच्यूल फादर मुलांना देत आहेत. तिथे (जुन्या दुनियेमध्ये) तर मनुष्य,
मनुष्याला शिकवतात, इथे आम्हा आत्म्यांना परमात्मा आप समान बनवत आहेत. टीचर जरूर आप
समान बनवतील.
बाबा म्हणतात - मी
तुम्हाला माझ्यापेक्षाही उच्च डबल मुकुटधारी बनवतो. लाईटचा ताज मिळतो आठवणीद्वारे,
आणि ८४ च्या चक्राला जाणल्याने तुम्ही चक्रवर्ती बनता, आता तुम्हा मुलांना
कर्म-अकर्म-विकर्माची गती देखील समजावून सांगितली आहे. सतयुगामध्ये कर्म हे अकर्म
होते. रावण राज्यामध्येच कर्म विकर्म होते. शिडी उतरत आले आहेत, कला कमी होत-होत
उतरायचेच आहे. किती छि-छि (विकारी) बनतात. मग बाबा येऊन भक्तांना फळ देतात.
दुनियेमध्ये तर सगळेच भक्त आहेत. सतयुगामध्ये कोणीही भक्त असत नाही. भक्ती कल्ट (भक्ती
पंथ) इथेच आहे. तिथे तर ज्ञानाचे प्रारब्ध असते. आता तुम्ही जाणता आपण बाबांकडून
बेहदचे प्रारब्ध घेत आहोत. कोणालाही सर्वप्रथम या लक्ष्मी-नारायणाच्या चित्रावर
समजावून सांगा. आज पासून ५००० वर्षांपूर्वी यांचे राज्य होते, विश्वामध्ये
सुख-शांती-पवित्रता सर्वकाही होते, दुसरा कोणताही धर्म नव्हता. यावेळी तर अनेक धर्म
आहेत, तो सुरुवातीचा पहिला धर्म राहिलेला नाही, आता पुन्हा या धर्माला जरूर यायचे
आहे. आता बाबा किती प्रेमाने शिकवतात. युद्धाची काही गोष्टच नाही, गरीब जीवन आहे,
परके राज्य आहे, आपले सर्वकाही गुप्त आहे. बाबा देखील गुप्त आलेले आहेत. आत्म्यांना
बसून समजावून सांगतात. आत्माच सर्वकाही करते. शरीराद्वारे पार्ट बजावते. ती आता
देह-अभिमानामध्ये आली आहे. आता बाबा म्हणतात - देही-अभिमानी बना. बाप अजून कोणताही
त्रास देत नाहीत. बाबा जेव्हा गुप्त रूपामध्ये येतात तेव्हा तुम्हा मुलांना
गुप्तदानामध्ये विश्वाची बादशाही देतात. तुमचे सर्व गुप्त आहे म्हणून रिवाजाच्या
रूपामध्ये कन्येला जेव्हा हुंडा देता तर तो गुप्तच देतात. खरेतर गायले जाते -
‘गुप्त दान महापुण्य’. दोन-चार लोकांना माहिती झाले की मग ती ताकद कमी होते.
बाबा म्हणतात -
‘मुलांनो, तुम्ही प्रदर्शनीमध्ये सर्वात आधी या लक्ष्मी-नारायणाच्या चित्रावर
सर्वांना समजावून सांगा. तुम्हाला वाटते ना की, विश्वामध्ये शांती व्हावी. परंतु ती
केव्हा होती, हे कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही. आता तुम्ही जाणता - सतयुगामध्ये
पवित्रता, सुख, शांती सर्वकाही होते; इथे मात्र आठवण देखील करतात, ‘अमका स्वर्गवासी
झाला’, समजत काहीच नाहीत. ज्याला जे मनात आले ते बोलतात, अर्थ काहीच नाही. हा आहे
ड्रामा. गोड-गोड मुलांच्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे की आपण ८४ चे चक्र फिरतो. आता बाबा
आलेले आहेत - पतित दुनियेमधून पावन दुनियेमध्ये घेऊन जाण्याकरिता. बाबांच्या
आठवणीमध्ये राहत ट्रान्सफर होत जातात. काट्यापासून फूल बनतात. मग आपण चक्रवर्ती राजा
बनणार. बनविणारे आहेत बाबा. ते परम आत्मा तर सदैव प्युअर (पवित्र) आहेत. तेच पवित्र
बनविण्यासाठी येतात. सतयुगामध्ये तुम्ही सुंदर बनाल. तिथे नैसर्गिक सौंदर्य असते.
आजकाल तर कृत्रिम शृंगार करतात ना. काय-काय फॅशन निघाली आहे. कसे-कसे ड्रेस घालतात.
पूर्वी बऱ्याच स्त्रिया बुरख्यात (घोशामध्ये) राहत होत्या जेणेकरून कोणाची नजर पडू
नये. आता तर आणखीनच मोकळीक दिली आहे, तर जिथे-तिथे घाण वाढली आहे. बाबा म्हणतात -
‘हिअर नो इव्हील’.
राजामध्ये ताकद असते.
ईश्वर अर्थ दान करतात तर त्यामध्ये शक्ती असते. इथे तर कोणामध्येच ती ताकद राहिलेली
नाहीये, ज्याला जे येईल ते करत राहतात. खूप घाणेरडे लोक आहेत. तुम्ही खूप
सौभाग्यशाली आहात जो खिवय्याने (नावाड्याने) हात पकडला आहे. तुम्हीच कल्प-कल्प
निमित्त बनता. तुम्ही जाणता पहिला मुख्य आहे देह-अभिमान, त्यानंतरच बाकी सर्व भुते
येतात. मेहनत करायची आहे स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, हे काही कडू औषध
नाहीये. फक्त एवढेच सांगतात - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. मग कितीही
बाबांच्या आठवणीमध्ये पायी चालत जा, कधीही पाय थकणार नाहीत. हलके व्हाल. खूप मदत
मिळते. तुम्ही मास्टर सर्वशक्तिमान बनता. तुम्ही जाणता - आम्ही विश्वाचे मालक बनतो,
बाबांपाशी आलो आहोत. जास्त काही त्रास देत नाहीत, फक्त मुलांना म्हणतात - ‘हियर नो
इव्हील’. जी सेवाभावी मुले आहेत त्यांच्या मुखातून सदैव ज्ञान रत्नच निघतील.
ज्ञानाच्या गोष्टींशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट मुखावाटे निघू शकत नाही. तुम्हाला
वाह्यात इकडच्या-तिकडच्या गोष्टी कधीही ऐकायच्या नाहीत. सेवा करणाऱ्यांच्या मुखातून
सदैव रत्नच निघतात. ज्ञानाच्या गोष्टींशिवाय बाकी सर्व आहे दगड मारणे. दगड मारत नाही
तर जरूर ज्ञान रत्न देता; एक तर दगड माराल नाहीतर अविनाशी ज्ञान रत्न द्याल, ज्याची
किंमत वर्णन करू शकत नाही. बाबा येऊन आता तुम्हाला ज्ञान रत्न देतात.
मुले जाणतात बाबा
खूप-खूप गोड आहेत, अर्धा कल्प गात आले आहेत - ‘तुम मात-पिता…’ परंतु अर्थ काहीही
समजत नव्हता. पोपटासारखे केवळ गात होते. तुम्हा मुलांना किती आनंद झाला पाहिजे. बाबा
आम्हाला बेहदचा वारसा विश्वाची बादशाही देतात. ५ हजार वर्षांपूर्वी आपण विश्वाचे
मालक होतो, आता नाही आहोत, पुन्हा बनणार. शिवबाबा ब्रह्मा द्वारे वारसा देतात.
ब्राह्मण कुळ पाहिजे ना. भागीरथ म्हटल्याने देखील समजू शकणार नाहीत म्हणून ब्रह्मा
आणि मग त्यांचे ब्राह्मण कुळ आहे. ब्रह्मा तनामध्ये प्रवेश करतात म्हणून त्यांना
भागीरथ म्हटले जाते. ब्रह्माची मुले ब्राह्मण आहेत. ब्राह्मण आहेत शेंडी. विराट रूप
देखील असे असते, वरती बाबा मग संगमयुगी ब्राह्मण जे ईश्वरीय संतान बनतात. तुम्ही
जाणता आता आपण ईश्वरीय संतान आहोत नंतर मग दैवी संतान बनणार तेव्हा डिग्री कमी होईल.
हे लक्ष्मी-नारायण यांची सुद्धा डिग्री कमी आहे, कारण यांच्यामध्ये ज्ञान नाहीये.
ज्ञान ब्राह्मणांमध्ये आहे. परंतु लक्ष्मी-नारायणाला अज्ञानी म्हणता येणार नाही.
यांनी ज्ञानाद्वारे हे पद प्राप्त केले आहे. तुम्ही ब्राह्मण किती उच्च आहात आणि मग
देवता बनता तर काहीही ज्ञान राहत नाही, त्यांच्यामध्ये जर ज्ञान असते तर ते दैवी
वंशामध्ये परंपरेने चालत आले असते. गोड-गोड सिकीलध्या मुलांना सर्व रहस्ये, सर्व
युक्त्या सांगतात. ट्रेनमध्ये बसल्यावरही तुम्ही सेवा करू शकता. एका चित्रावर आपसात
बसून चर्चा कराल तर पुष्कळजण गोळा होतील. जो या कुळाचा असेल तो चांगल्या रीतीने
धारणा करून प्रजा बनेल. सेवा करण्यासाठी चित्रे तर खूप चांगली-चांगली आहेत. आपण
भारतवासी पहिले देवी-देवता होतो, आता आपण काहीच नाही आहोत. इतिहास पुन्हा रिपीट होतो.
मध्येच हे संगमयुग आहे, ज्यामध्ये तुम्ही पुरुषोत्तम बनता. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) ज्ञानाच्या
गोष्टींशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट मुखातून काढायची नाही. कधीही झरमुई-झगमुई (व्यर्थ)
गोष्टी ऐकायच्या नाहीत. मुखावाटे सदैव रत्ने निघत रहावीत, दगड नाही.
२) सेवे सोबतच
आठवणीच्या यात्रेमध्ये राहून स्वतःला निरोगी बनवायचे आहे. २१ जन्म निरोगी
बनवण्यासाठी अविनाशी सर्जन स्वयं भगवान आम्हाला भेटले आहेत… याच नशेमध्ये किंवा
आनंदामध्ये रहायचे आहे.
वरदान:-
प्रत्येक
कर्मामध्ये फॉलो फादर करून स्नेहाचा रिस्पॉन्स देणारे तीव्र-पुरुषार्थी भव
ज्याच्यावर प्रेम असते
त्याला आपणहून फॉलो करावे लागेल. नेहमी लक्षात रहावे की, मी हे जे कर्म करत आहे ते
फॉलो फादर आहे का? जर नसेल तर स्टॉप करा. बाबांना कॉपी करत बाप समान बना. कॉपी
करण्यासाठी जसे कार्बन पेपर घालतात तसा अटेंशनचा पेपर घाला तर कॉपी होईल कारण आताच
तीव्र पुरुषार्थी बनून स्वतःला प्रत्येक शक्तीने संपन्न बनविण्याची वेळ आहे. जर आपण
आपल्याला संपन्न करू शकत नसाल तर मदत घ्या. नाहीतर पुढे जाऊन टू लेट व्हाल.
बोधवाक्य:-
संतुष्टतेचे
फळ प्रसन्नता आहे, प्रसन्नचित्त बनल्याने प्रश्न समाप्त होतात.
अव्यक्त इशारे -
आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-
कोणत्याही कमजोर
आत्म्याच्या कमजोरीला पाहू नका. हे लक्षात रहावे की व्हरायटी आत्मे आहेत.
सर्वांप्रती आत्मिक दृष्टी रहावी. आत्म्याच्या रूपामध्ये त्यांना स्मृतीमध्ये
आणल्याने शक्ती देऊ शकाल. आत्मा बोलत आहे, आत्म्याचे हे संस्कार आहेत, हा धडा पक्का
करा तर सर्वांप्रती स्वतः शुभ भावना राहतील.